Ayushman Khurrana : लोकसभा निवडणुकीदरम्यान आयुष्मान खुरानाने स्विकारली 'ही' मोठी जबाबदारी!

म्हणाला, 'मतदान न करण्यासाठी १०१ कारणे आहेत, पण...


मुंबई : आयुष्मान खुराना (Ayushman Khurrana) हा बॉलिवूडमधील (Bollywood) आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. चित्रपटांतून दर्जेदार काम करणाऱ्या कलाकारांच्या यादीत त्यांचं नाव हमखास घेतलं जातं. मनोरंजनासोबतच आयुष्मानने आता एक मोठी जबाबदारी स्विकारली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान (Loksabha Elections) तो एक महत्त्वाची कामगिरी बजावणार आहे. निवडणुकीत लोकांनी मतदान करावं यासाठी तो समाजप्रबोधन (Social Awareness) करणार आहे. आयुष्मान खुरानाचा पोस्ट केलेला लेटेस्ट व्हिडिओ हा त्याच्याशीच संबंधित आहे.


मतदारांना जागरुक करण्यासाठी, निवडणुकीसंदर्भात जागरूकता वाढवण्यासाठी आणि मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी आयुष्मान खुराना निवडणूक आयोगाच्या (Election Commission) व्हिडिओमध्ये दिसला. २०२४ लोकसभा निवडणुकीत तरुणांना मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने आयुष्मानची निवड केली आहे. हा व्हिडिओ निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया हँडलवरूनही शेअर करण्यात आला आहे.



आयुष्मान म्हणाला, 'मतदान न करण्यासाठी १०१ कारणे आहेत, पण...


मतदान न करण्याचे अनेक बहाणे आहेत आणि आयुष्मान याच कारणांबद्दल भाष्य करताना दिसला. एक मतही दिले नाही तर काय होईल, असंही तो उपहासात्मक पद्धतीने म्हणताना दिसला. तो पुढे म्हणाला की, 'मतदान न करण्यासाठी १०१ कारणे आहेत, पण मतदान करण्यासाठी एकच कारण पुरेसे आहे आणि ते म्हणजे ही आपली जबाबदारी आहे, देशासाठी आणि आपल्या भविष्यासाठी.'





'प्रत्येक मत मोजले जाते आणि प्रत्येक मत महत्त्वाचे'


आयुष्मानने पुढे असे म्हटले की, 'प्रत्येकाने मतदान केले पाहिजे आणि राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेत सहभागी होऊन जागरूक नागरिक बनले पाहिजे. संसदेत देशाचे प्रतिनिधित्व करणारे आणि आपल्या गरजांचे प्रतिनिधित्व करणारे नेते निवडून आणण्याचा अधिकार आपल्याकडे आहे. प्रत्येक मत मोजले जाते आणि प्रत्येक मत महत्वाचे आहे. आपल्यासारख्या लोकशाही देशात मतदान हे सक्षमीकरणाचे प्रतीक आहे.' आयुष्मानच्या व्हिडिओवर कमेंट करत अनेक मतदारांनी आणि सोशल मीडिया युजर्सनी त्यांची मतं मांडली आहेत.

Comments
Add Comment

NSG in Ayodhya : अयोध्येत NSG चे सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार

अयोध्या : उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येत NSG चे (National Security Guard) सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक

India 1500 km missile Private Company : संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय : मोदी सरकारकडून १५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र निर्मितीसाठी खासगी कंपन्यांना हिरवा कंदील!

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संरक्षण

Women's Equality Day : जाणून घ्या २६ ऑगस्ट 'महिला समानता दिन' म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१