Ayushman Khurrana : लोकसभा निवडणुकीदरम्यान आयुष्मान खुरानाने स्विकारली 'ही' मोठी जबाबदारी!

म्हणाला, 'मतदान न करण्यासाठी १०१ कारणे आहेत, पण...


मुंबई : आयुष्मान खुराना (Ayushman Khurrana) हा बॉलिवूडमधील (Bollywood) आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. चित्रपटांतून दर्जेदार काम करणाऱ्या कलाकारांच्या यादीत त्यांचं नाव हमखास घेतलं जातं. मनोरंजनासोबतच आयुष्मानने आता एक मोठी जबाबदारी स्विकारली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान (Loksabha Elections) तो एक महत्त्वाची कामगिरी बजावणार आहे. निवडणुकीत लोकांनी मतदान करावं यासाठी तो समाजप्रबोधन (Social Awareness) करणार आहे. आयुष्मान खुरानाचा पोस्ट केलेला लेटेस्ट व्हिडिओ हा त्याच्याशीच संबंधित आहे.


मतदारांना जागरुक करण्यासाठी, निवडणुकीसंदर्भात जागरूकता वाढवण्यासाठी आणि मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी आयुष्मान खुराना निवडणूक आयोगाच्या (Election Commission) व्हिडिओमध्ये दिसला. २०२४ लोकसभा निवडणुकीत तरुणांना मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने आयुष्मानची निवड केली आहे. हा व्हिडिओ निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया हँडलवरूनही शेअर करण्यात आला आहे.



आयुष्मान म्हणाला, 'मतदान न करण्यासाठी १०१ कारणे आहेत, पण...


मतदान न करण्याचे अनेक बहाणे आहेत आणि आयुष्मान याच कारणांबद्दल भाष्य करताना दिसला. एक मतही दिले नाही तर काय होईल, असंही तो उपहासात्मक पद्धतीने म्हणताना दिसला. तो पुढे म्हणाला की, 'मतदान न करण्यासाठी १०१ कारणे आहेत, पण मतदान करण्यासाठी एकच कारण पुरेसे आहे आणि ते म्हणजे ही आपली जबाबदारी आहे, देशासाठी आणि आपल्या भविष्यासाठी.'





'प्रत्येक मत मोजले जाते आणि प्रत्येक मत महत्त्वाचे'


आयुष्मानने पुढे असे म्हटले की, 'प्रत्येकाने मतदान केले पाहिजे आणि राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेत सहभागी होऊन जागरूक नागरिक बनले पाहिजे. संसदेत देशाचे प्रतिनिधित्व करणारे आणि आपल्या गरजांचे प्रतिनिधित्व करणारे नेते निवडून आणण्याचा अधिकार आपल्याकडे आहे. प्रत्येक मत मोजले जाते आणि प्रत्येक मत महत्वाचे आहे. आपल्यासारख्या लोकशाही देशात मतदान हे सक्षमीकरणाचे प्रतीक आहे.' आयुष्मानच्या व्हिडिओवर कमेंट करत अनेक मतदारांनी आणि सोशल मीडिया युजर्सनी त्यांची मतं मांडली आहेत.

Comments
Add Comment

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशात 100 वर्षे जुने घर कोसळले; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात मध्यरात्री घडलेल्या भीषण दुर्घटनेत 100 वर्षे जुने घर कोसळून

Devendra Fadnavis Gen Z : तरुणांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस सरकारचा 'मास्टरप्लॅन'; 'जेन Z' साठी ९ मोठे निर्णय ठरणार गेमचेंजर!

मुंबई : राज्यातील तरुण पिढी, विशेषतः 'जेन Z' (Gen Z) म्हणजेच नव्या युगातील युवक-युवतींमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता

Indian Space Station : 2035 पर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक; गगनयान मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात

मुंबई : भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांना वेग आला असून, 2035 पर्यंत देशाचे स्वतःचे अंतराळ स्थानक (भारतीय

India Weather : मुसळधार पाऊस थांबायचं नाव घेईना! देशातील 17 राज्यांना हाय अलर्टचा इशारा; आसाममधील पूरस्थिती गंभीर

मुंबई : देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम असून काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः

Central government plan on LPG LNG : आता हे काय नवीन ? एलपीजी अन् एलएनजीच्या आपत्कालीन साठ्यासाठी ग्राहकांवर कर ? केंद्र सरकारचा मोठा प्लॅन

भारतातील ऊर्जा संकट टाळण्यासाठी आणि इंधनाचा आपत्कालीन साठा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार ४२ अब्ज डॉलर

Central Government Operation Trishul : मोदी सरकारची मोठी कारवाई! 7 वर्षांत 36 देशांतून 274 फरार गुन्हेगार भारतात परत; 'ऑपरेशन त्रिशूल'ने वाढवली तपास यंत्रणांची ताकद

नवी दिल्ली : देशातून पळून गेलेल्या फरार गुन्हेगारांविरोधात केंद्र सरकारने मोठी मोहीम हाती घेतली असून, 2019 ते 2026 या