मुंबई : आयुष्मान खुराना (Ayushman Khurrana) हा बॉलिवूडमधील (Bollywood) आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. चित्रपटांतून दर्जेदार काम करणाऱ्या कलाकारांच्या यादीत त्यांचं नाव हमखास घेतलं जातं. मनोरंजनासोबतच आयुष्मानने आता एक मोठी जबाबदारी स्विकारली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान (Loksabha Elections) तो एक महत्त्वाची कामगिरी बजावणार आहे. निवडणुकीत लोकांनी मतदान करावं यासाठी तो समाजप्रबोधन (Social Awareness) करणार आहे. आयुष्मान खुरानाचा पोस्ट केलेला लेटेस्ट व्हिडिओ हा त्याच्याशीच संबंधित आहे.
मतदारांना जागरुक करण्यासाठी, निवडणुकीसंदर्भात जागरूकता वाढवण्यासाठी आणि मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी आयुष्मान खुराना निवडणूक आयोगाच्या (Election Commission) व्हिडिओमध्ये दिसला. २०२४ लोकसभा निवडणुकीत तरुणांना मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने आयुष्मानची निवड केली आहे. हा व्हिडिओ निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया हँडलवरूनही शेअर करण्यात आला आहे.
मतदान न करण्याचे अनेक बहाणे आहेत आणि आयुष्मान याच कारणांबद्दल भाष्य करताना दिसला. एक मतही दिले नाही तर काय होईल, असंही तो उपहासात्मक पद्धतीने म्हणताना दिसला. तो पुढे म्हणाला की, ‘मतदान न करण्यासाठी १०१ कारणे आहेत, पण मतदान करण्यासाठी एकच कारण पुरेसे आहे आणि ते म्हणजे ही आपली जबाबदारी आहे, देशासाठी आणि आपल्या भविष्यासाठी.’
आयुष्मानने पुढे असे म्हटले की, ‘प्रत्येकाने मतदान केले पाहिजे आणि राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेत सहभागी होऊन जागरूक नागरिक बनले पाहिजे. संसदेत देशाचे प्रतिनिधित्व करणारे आणि आपल्या गरजांचे प्रतिनिधित्व करणारे नेते निवडून आणण्याचा अधिकार आपल्याकडे आहे. प्रत्येक मत मोजले जाते आणि प्रत्येक मत महत्वाचे आहे. आपल्यासारख्या लोकशाही देशात मतदान हे सक्षमीकरणाचे प्रतीक आहे.’ आयुष्मानच्या व्हिडिओवर कमेंट करत अनेक मतदारांनी आणि सोशल मीडिया युजर्सनी त्यांची मतं मांडली आहेत.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…