Ayushman Khurrana : लोकसभा निवडणुकीदरम्यान आयुष्मान खुरानाने स्विकारली 'ही' मोठी जबाबदारी!

म्हणाला, 'मतदान न करण्यासाठी १०१ कारणे आहेत, पण...


मुंबई : आयुष्मान खुराना (Ayushman Khurrana) हा बॉलिवूडमधील (Bollywood) आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. चित्रपटांतून दर्जेदार काम करणाऱ्या कलाकारांच्या यादीत त्यांचं नाव हमखास घेतलं जातं. मनोरंजनासोबतच आयुष्मानने आता एक मोठी जबाबदारी स्विकारली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान (Loksabha Elections) तो एक महत्त्वाची कामगिरी बजावणार आहे. निवडणुकीत लोकांनी मतदान करावं यासाठी तो समाजप्रबोधन (Social Awareness) करणार आहे. आयुष्मान खुरानाचा पोस्ट केलेला लेटेस्ट व्हिडिओ हा त्याच्याशीच संबंधित आहे.


मतदारांना जागरुक करण्यासाठी, निवडणुकीसंदर्भात जागरूकता वाढवण्यासाठी आणि मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी आयुष्मान खुराना निवडणूक आयोगाच्या (Election Commission) व्हिडिओमध्ये दिसला. २०२४ लोकसभा निवडणुकीत तरुणांना मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने आयुष्मानची निवड केली आहे. हा व्हिडिओ निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया हँडलवरूनही शेअर करण्यात आला आहे.



आयुष्मान म्हणाला, 'मतदान न करण्यासाठी १०१ कारणे आहेत, पण...


मतदान न करण्याचे अनेक बहाणे आहेत आणि आयुष्मान याच कारणांबद्दल भाष्य करताना दिसला. एक मतही दिले नाही तर काय होईल, असंही तो उपहासात्मक पद्धतीने म्हणताना दिसला. तो पुढे म्हणाला की, 'मतदान न करण्यासाठी १०१ कारणे आहेत, पण मतदान करण्यासाठी एकच कारण पुरेसे आहे आणि ते म्हणजे ही आपली जबाबदारी आहे, देशासाठी आणि आपल्या भविष्यासाठी.'





'प्रत्येक मत मोजले जाते आणि प्रत्येक मत महत्त्वाचे'


आयुष्मानने पुढे असे म्हटले की, 'प्रत्येकाने मतदान केले पाहिजे आणि राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेत सहभागी होऊन जागरूक नागरिक बनले पाहिजे. संसदेत देशाचे प्रतिनिधित्व करणारे आणि आपल्या गरजांचे प्रतिनिधित्व करणारे नेते निवडून आणण्याचा अधिकार आपल्याकडे आहे. प्रत्येक मत मोजले जाते आणि प्रत्येक मत महत्वाचे आहे. आपल्यासारख्या लोकशाही देशात मतदान हे सक्षमीकरणाचे प्रतीक आहे.' आयुष्मानच्या व्हिडिओवर कमेंट करत अनेक मतदारांनी आणि सोशल मीडिया युजर्सनी त्यांची मतं मांडली आहेत.

Comments
Add Comment

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि

८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी बांधकामात मशि‍दीचा अडथळा

कोलकाता: सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असणाऱ्या कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ

रेल्वेचा नवीन नियम लागू; आता खिडकीवर तिकीट खरेदी करताना सुद्धा लागणार 'ओटीपी'

मुंबई: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंगच्या