अयोध्या : अनेक वर्षांपासून अयोध्या राम जन्मभूमीवर राममंदिर उभारण्यासाठी अथक प्रयत्न सुरु होते. २०२४ साली अयोध्येत रामलल्ला मूळ गर्भगृहामध्ये विराजमान झाले, त्यामुळे अयोध्या नगरीचं वेगळं रुप सर्वांसमोर आल आहे. देशभरातून अनेकांचे पाय या तीर्थक्षेत्राकडे वळले आहेत. तसेच परदेशी पर्यटकांनीसुद्धा ही अयोध्यानगरी पाहण्यासाठीची उत्सुकता दाखवली.
देशातील रेल्वे विभागानंही विविध राज्यांतून अयोध्येपर्यंत पोहोचण्यासाठीचे पर्याय उपलब्ध करून दिले आणि विमानसेवा पुरवणाऱ्या संस्थाही यात मागे राहिल्या नाहीत. याच अयोध्येत पोहोचण्यासाठीचा महाराष्ट्रातून सुरु होणारा प्रवासही आता अधिक सुलभ आणि सुकर झाला आहे. पर्यटक आणि भाविकांचा रामलल्ला अयोध्यानगरी साठीचा २१ तासांचा हा प्रवास आता केवळ साडेपाच तासांत पूर्ण करता येणार आहे.
इंडिगोने (Indigo) अयोध्यानगरी प्रवासासाठी ७२ आसनक्षमता असणारं विमान सुरू केलं आहे. राज्यातील नाशिक विमानतळाहून सोमवारपासून थेट लखनऊ फ्लाइट सुरू झाल्याने आता नाशिककरांना आणि पर्यायी महाराष्ट्रातील नागरिकांना अवघ्या साडेपाच तासांत अयोध्येला पोहचता येणार आहे. नाशिक-नागपूर फ्लाइटचा सेवा विस्तार लखनऊ पर्यंत केल्यामुळे नागपूरमध्ये जाऊन विमान बदलण्याची गरज भासणार नाही.
नाशिक विमानतळावरून दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी नागपूरकरता विमान उड्डाण करेल. जे नागपूर विमानतळावर सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. तेथून हे विमान लखनऊला रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी पोहोचेल. विशेष म्हणजे रेल्वेच्या एसी बोगीतून प्रवास करण्यासाठी किमान दोन हजार रुपये मोजावे लागतात, तर विमानसेवेसाठी जवळपास ३७०० ते ४२०० रुपये सध्या मोजावे लागत आहेत, त्यामुळे अनेकांना ही तिकीटं खर्चाच्या बाबतीतही महाग वाटत नाहीयेत.
या मार्गावर सोमवारी पहिल्याच विमानाचं उड्डाण झालं असून, प्रवाशांनी या सेवेला कमाल प्रतिसाद दिला. अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेनंतर हजारो नाशिककर अयोध्येला जाण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांच्यासाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे हे नक्की.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…