Ayodhya Ram Mandir: महाराष्ट्र ते अयोध्या केवळ साडेपाच तासांचा प्रवास

भाविकांसाठी 'ही' खास सुविधा


अयोध्या : अनेक वर्षांपासून अयोध्या राम जन्मभूमीवर राममंदिर उभारण्यासाठी अथक प्रयत्न सुरु होते. २०२४ साली अयोध्येत रामलल्ला मूळ गर्भगृहामध्ये विराजमान झाले, त्यामुळे अयोध्या नगरीचं वेगळं रुप सर्वांसमोर आल आहे. देशभरातून अनेकांचे पाय या तीर्थक्षेत्राकडे वळले आहेत. तसेच परदेशी पर्यटकांनीसुद्धा ही अयोध्यानगरी पाहण्यासाठीची उत्सुकता दाखवली.


देशातील रेल्वे विभागानंही विविध राज्यांतून अयोध्येपर्यंत पोहोचण्यासाठीचे पर्याय उपलब्ध करून दिले आणि विमानसेवा पुरवणाऱ्या संस्थाही यात मागे राहिल्या नाहीत. याच अयोध्येत पोहोचण्यासाठीचा महाराष्ट्रातून सुरु होणारा प्रवासही आता अधिक सुलभ आणि सुकर झाला आहे. पर्यटक आणि भाविकांचा रामलल्ला अयोध्यानगरी साठीचा २१ तासांचा हा प्रवास आता केवळ साडेपाच तासांत पूर्ण करता येणार आहे.



असा करता येणार प्रवास


इंडिगोने (Indigo) अयोध्यानगरी प्रवासासाठी ७२ आसनक्षमता असणारं विमान सुरू केलं आहे. राज्यातील नाशिक विमानतळाहून सोमवारपासून थेट लखनऊ फ्लाइट सुरू झाल्याने आता नाशिककरांना आणि पर्यायी महाराष्ट्रातील नागरिकांना अवघ्या साडेपाच तासांत अयोध्येला पोहचता येणार आहे. नाशिक-नागपूर फ्लाइटचा सेवा विस्तार लखनऊ पर्यंत केल्यामुळे नागपूरमध्ये जाऊन विमान बदलण्याची गरज भासणार नाही.


नाशिक विमानतळावरून दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी नागपूरकरता विमान उड्डाण करेल. जे नागपूर विमानतळावर सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. तेथून हे विमान लखनऊला रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी पोहोचेल. विशेष म्हणजे रेल्वेच्या एसी बोगीतून प्रवास करण्यासाठी किमान दोन हजार रुपये मोजावे लागतात, तर विमानसेवेसाठी जवळपास ३७०० ते ४२०० रुपये सध्या मोजावे लागत आहेत, त्यामुळे अनेकांना ही तिकीटं खर्चाच्या बाबतीतही महाग वाटत नाहीयेत.


या मार्गावर सोमवारी पहिल्याच विमानाचं उड्डाण झालं असून, प्रवाशांनी या सेवेला कमाल प्रतिसाद दिला. अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेनंतर हजारो नाशिककर अयोध्येला जाण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांच्यासाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे हे नक्की.

Comments
Add Comment

HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी; HSRP नंबर प्लेट बसवली नाही तर...

वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. तुम्ही जर अजूनही तुमच्या गाडीला नवीन नंबरप्लेट बसवून घेतली नसेल तर तुमचे

Jalna Black Magic News: जालन्यात एका हॉटेलसमोर लिंबू आणि बाहुल्या आढळल्या, काळ्या जादूने गावात खळबळ

जालना: जालना जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोकरदन तालुक्यामध्ये एका अज्ञात महिलेने हॉटेलसमोर

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू