Ayodhya Ram Mandir: महाराष्ट्र ते अयोध्या केवळ साडेपाच तासांचा प्रवास

  97

भाविकांसाठी 'ही' खास सुविधा


अयोध्या : अनेक वर्षांपासून अयोध्या राम जन्मभूमीवर राममंदिर उभारण्यासाठी अथक प्रयत्न सुरु होते. २०२४ साली अयोध्येत रामलल्ला मूळ गर्भगृहामध्ये विराजमान झाले, त्यामुळे अयोध्या नगरीचं वेगळं रुप सर्वांसमोर आल आहे. देशभरातून अनेकांचे पाय या तीर्थक्षेत्राकडे वळले आहेत. तसेच परदेशी पर्यटकांनीसुद्धा ही अयोध्यानगरी पाहण्यासाठीची उत्सुकता दाखवली.


देशातील रेल्वे विभागानंही विविध राज्यांतून अयोध्येपर्यंत पोहोचण्यासाठीचे पर्याय उपलब्ध करून दिले आणि विमानसेवा पुरवणाऱ्या संस्थाही यात मागे राहिल्या नाहीत. याच अयोध्येत पोहोचण्यासाठीचा महाराष्ट्रातून सुरु होणारा प्रवासही आता अधिक सुलभ आणि सुकर झाला आहे. पर्यटक आणि भाविकांचा रामलल्ला अयोध्यानगरी साठीचा २१ तासांचा हा प्रवास आता केवळ साडेपाच तासांत पूर्ण करता येणार आहे.



असा करता येणार प्रवास


इंडिगोने (Indigo) अयोध्यानगरी प्रवासासाठी ७२ आसनक्षमता असणारं विमान सुरू केलं आहे. राज्यातील नाशिक विमानतळाहून सोमवारपासून थेट लखनऊ फ्लाइट सुरू झाल्याने आता नाशिककरांना आणि पर्यायी महाराष्ट्रातील नागरिकांना अवघ्या साडेपाच तासांत अयोध्येला पोहचता येणार आहे. नाशिक-नागपूर फ्लाइटचा सेवा विस्तार लखनऊ पर्यंत केल्यामुळे नागपूरमध्ये जाऊन विमान बदलण्याची गरज भासणार नाही.


नाशिक विमानतळावरून दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी नागपूरकरता विमान उड्डाण करेल. जे नागपूर विमानतळावर सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. तेथून हे विमान लखनऊला रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी पोहोचेल. विशेष म्हणजे रेल्वेच्या एसी बोगीतून प्रवास करण्यासाठी किमान दोन हजार रुपये मोजावे लागतात, तर विमानसेवेसाठी जवळपास ३७०० ते ४२०० रुपये सध्या मोजावे लागत आहेत, त्यामुळे अनेकांना ही तिकीटं खर्चाच्या बाबतीतही महाग वाटत नाहीयेत.


या मार्गावर सोमवारी पहिल्याच विमानाचं उड्डाण झालं असून, प्रवाशांनी या सेवेला कमाल प्रतिसाद दिला. अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेनंतर हजारो नाशिककर अयोध्येला जाण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांच्यासाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे हे नक्की.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित