Mumbai-Goa highway: मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांबरोबर आता धुळीचे साम्राज्य

संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आता खड्ड्यांबरोबर धुळीचे साम्राज्य पसरले असून माभळे ते कोळंबे परिसरात धुळीचा सामना करावा लागत आहे.


मुंबई-गोवा महामार्गावर काही ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे. चौपदरीकरणाची कामे सुरू झाली आहेत. मात्र धूळ रोखण्यासाठी पुरेशी उपाययोजना केली जात नसल्याने प्रवाशांना व वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून श्वसनाचे आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे रस्त्याची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.


वाहनचालकांसह लोकांनी किती वर्षे त्रास सहन करावा याला काही मर्यादा आहेत. यात सर्वसामान्य प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. होणारा त्रास सांगणार तरी कोणाला आणि सांगून त्याची दखल तरी घेणार कोण? अशी अवस्था प्रवाशी आणि वाहनचालकांची झाली आहे. धामणी ते कोळंबे पर्यंत रस्त्याची कमालाची दुरवस्था
झाली आहे.


खड्ड्यांमधून बाहेर आलेले दगड ट्रकच्या चाकातून असे उडतात की समोरचा पादचारी किंवा मोटरसायकलवाला यांच्या डोळ्यांना, डोक्याला जबर मार बसून नाहक जीव जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संबंधित यंत्रणेने खड्ड्यांचा आणि धुळीचा होणारा त्रास कमी करण्यासाठी लवकरात लवकर चांगल्या कायमच्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद