Mumbai-Goa highway: मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांबरोबर आता धुळीचे साम्राज्य

संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आता खड्ड्यांबरोबर धुळीचे साम्राज्य पसरले असून माभळे ते कोळंबे परिसरात धुळीचा सामना करावा लागत आहे.


मुंबई-गोवा महामार्गावर काही ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे. चौपदरीकरणाची कामे सुरू झाली आहेत. मात्र धूळ रोखण्यासाठी पुरेशी उपाययोजना केली जात नसल्याने प्रवाशांना व वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून श्वसनाचे आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे रस्त्याची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.


वाहनचालकांसह लोकांनी किती वर्षे त्रास सहन करावा याला काही मर्यादा आहेत. यात सर्वसामान्य प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. होणारा त्रास सांगणार तरी कोणाला आणि सांगून त्याची दखल तरी घेणार कोण? अशी अवस्था प्रवाशी आणि वाहनचालकांची झाली आहे. धामणी ते कोळंबे पर्यंत रस्त्याची कमालाची दुरवस्था
झाली आहे.


खड्ड्यांमधून बाहेर आलेले दगड ट्रकच्या चाकातून असे उडतात की समोरचा पादचारी किंवा मोटरसायकलवाला यांच्या डोळ्यांना, डोक्याला जबर मार बसून नाहक जीव जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संबंधित यंत्रणेने खड्ड्यांचा आणि धुळीचा होणारा त्रास कमी करण्यासाठी लवकरात लवकर चांगल्या कायमच्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक