LPG Cylinder: लोकसभा निवडणुकीआधी सामान्य नागरिकांना खुशखबर, कमी झाले एलपीजी सिलेंडरचे दर

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा पहिला टप्पा सुरू होण्याआधीच सामान्य नागरिकांना आज मोठी खुशखबर मिळाली आहे. सरकारी तेल आणि गॅस विपणन कंपन्यांनी आज १ एप्रिलपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपातीची घोषणा केली आहे. यामुळे लोकांना दिलासा मिळणार आहे.



कमर्शियल सिलेंडरवर कपात लागू


सरकारे तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज देशातील विविध शहरांमध्ये एलपीजी सिलेंडरच्या दरात ३०.५० रूपयांपर्यंतची कपात करण्यात आली आहे. दरम्यान, या कपातीचा लाभ केवळ १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलेंडरवर मिळेल. घरगुती वापराच्या सिलेंडरच्या दरात यावेळी कोणताही बदल करण्यात आलेला नाही.



विविध शहरात आजपासून हे दर


ताज्या कपातीनंतर दिल्लीत १९ किलोच्या सिलेंडरचे दर कमी होऊन १,७६४.५० रूपये झालेत. याचपद्धतीने कोलकातामध्ये आजपासून कमर्शियल सिलेंडरचे दर १,८७९ रूपये असतील. मुंबईत हे दर १,७१७.५० रूपये झाले आहेत. तर चेन्नईत या सिलेंडरच्या दरात १९३० रूपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे.



निवडणुकीआधी केली कपात


कमर्शियल सिलेंडरच्या दरातील ही कपात महत्त्वाची आहे कारण थोड्याच दिवसात मतदानाला सुरूवात होत आहे. सात टप्प्यात होणारी ही लोकसभा निवडणूक या महिन्यात सुरू होऊन जूनपर्यंत चालणार आहे.

Comments
Add Comment

भारतासाठी आनंदाची बातमी ! चीन, पाकिस्तानची झोपच उडणार ; भारत आणि रशियामध्ये मोठा करार

Big deal between India and Russia : भारत आणि रशिया या दोन देशांतील मैत्रीपूर्ण संबंध संपूर्ण जगाला माहित आहे. जगाचा विरोध धुडकावत कधी

Heat Wave: पुढील तीन दिवस जरा जपूनच ! राज्यातील 'हे' शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत; नाशिकची स्थिती काय ?

Maharashtra Weather Update : राज्यभरात तपमानानं कहर केल्याचे चित्र आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या

West Bengal Election 2026 : विक्रमी मतदानामुळे ममता बॅनर्जींचे सरकार संपुष्टात येईल - अमित शाह

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यातील राणाघाट येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Karnataka : पादचारी पूल कोसळला, आठ जखमी

मंगळुरू : कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक अरुंद पादचारी पूल कोसळला. या

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये ठिकठिकाणी ईडीच्या धाडी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राजधानी कोलकात्यात

Indian History : सापडले दोन हजार वर्षे जुने तीन किलो वजनाचे प्राचीन ताम्रपत्र

बिलासपूर : छत्तीसगडच्या बिलासपूर येथील मल्हार परिसरातील रहिवासी संजीव पांडेय यांच्या ताब्यातून सुमारे २०००