LPG Cylinder: लोकसभा निवडणुकीआधी सामान्य नागरिकांना खुशखबर, कमी झाले एलपीजी सिलेंडरचे दर

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा पहिला टप्पा सुरू होण्याआधीच सामान्य नागरिकांना आज मोठी खुशखबर मिळाली आहे. सरकारी तेल आणि गॅस विपणन कंपन्यांनी आज १ एप्रिलपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपातीची घोषणा केली आहे. यामुळे लोकांना दिलासा मिळणार आहे.



कमर्शियल सिलेंडरवर कपात लागू


सरकारे तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज देशातील विविध शहरांमध्ये एलपीजी सिलेंडरच्या दरात ३०.५० रूपयांपर्यंतची कपात करण्यात आली आहे. दरम्यान, या कपातीचा लाभ केवळ १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलेंडरवर मिळेल. घरगुती वापराच्या सिलेंडरच्या दरात यावेळी कोणताही बदल करण्यात आलेला नाही.



विविध शहरात आजपासून हे दर


ताज्या कपातीनंतर दिल्लीत १९ किलोच्या सिलेंडरचे दर कमी होऊन १,७६४.५० रूपये झालेत. याचपद्धतीने कोलकातामध्ये आजपासून कमर्शियल सिलेंडरचे दर १,८७९ रूपये असतील. मुंबईत हे दर १,७१७.५० रूपये झाले आहेत. तर चेन्नईत या सिलेंडरच्या दरात १९३० रूपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे.



निवडणुकीआधी केली कपात


कमर्शियल सिलेंडरच्या दरातील ही कपात महत्त्वाची आहे कारण थोड्याच दिवसात मतदानाला सुरूवात होत आहे. सात टप्प्यात होणारी ही लोकसभा निवडणूक या महिन्यात सुरू होऊन जूनपर्यंत चालणार आहे.

Comments
Add Comment

India Weather : मुसळधार पाऊस थांबायचं नाव घेईना! देशातील 17 राज्यांना हाय अलर्टचा इशारा; आसाममधील पूरस्थिती गंभीर

मुंबई : देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम असून काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः

Central government plan on LPG LNG : आता हे काय नवीन ? एलपीजी अन् एलएनजीच्या आपत्कालीन साठ्यासाठी ग्राहकांवर कर ? केंद्र सरकारचा मोठा प्लॅन

भारतातील ऊर्जा संकट टाळण्यासाठी आणि इंधनाचा आपत्कालीन साठा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार ४२ अब्ज डॉलर

Central Government Operation Trishul : मोदी सरकारची मोठी कारवाई! 7 वर्षांत 36 देशांतून 274 फरार गुन्हेगार भारतात परत; 'ऑपरेशन त्रिशूल'ने वाढवली तपास यंत्रणांची ताकद

नवी दिल्ली : देशातून पळून गेलेल्या फरार गुन्हेगारांविरोधात केंद्र सरकारने मोठी मोहीम हाती घेतली असून, 2019 ते 2026 या

Mark Zuckerberg Apology : मेटाला PM मोदींचा व्हिडिओ हटवणे भोवले; केंद्र सरकार आक्रमक, झुकरबर्ग यांनी मागितली माफी

NEET परीक्षा पेपर लीक प्रकरणी दिल्लीतील जंतरमंतर येथे देशभरातून आंदोलनाचा भडका उडाला होता. या गंभीर पार्श्वभूमीवर

Foreigners Banned In Indian City : इंग्रजांनी वसवलेलं 'हे' निसर्गरम्य शहर; पण आज तिथेच परदेशी पर्यटकांना बंदी का ? कारण काय ?

देवभूमी म्हणून ओळखले जाणारे उत्तराखंड हे राज्य आपल्या निसर्गरम्य दऱ्या, शांत पर्वत आणि अप्रतिम निसर्ग

Dabur India FSSAI action : डाबर इंडियाला FSSAI चा मोठा दणका! ‘१००% शुद्धतेचे’ दावे करणाऱ्या मध, तुपासह अनेक उत्पादनांच्या विक्रीवर बंदी

नवी दिल्ली : ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि दाव्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक