रायगडमधील अलिबाग, नागाव, वरसोली, काशीद, श्रीवर्धन, दिवेआगर समुद्रकिनारे गजबजले

पर्यटकांचे लोंढे रायगडात दाखल; पर्यटकांनी परिसर हाऊसफुल्ल ; अर्थकारणाला गती


अलिबाग : मुलांच्या दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर पर्यटकांचे लोंढे पुन्हा एकदा रायगडात दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे येथील समुद्रकिनारे पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. अलिबाग, नागाव, वरसोली, काशीद, श्रीवर्धन, दिवेआगर या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. पर्यटक आल्याने परिसरातील हॉटेल, लॉजेस, रिसॉर्ट व्यावसायिकांना आता सुगीचे दिवस आल्याचे दिसत आहे.


रायगड जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून येथील निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक वास्तू, खाण्यास ताज्या मच्छीमुळे पर्यटक पर्यटनास येत असतात. सलग पडलेल्या सुट्ट्यांमुळे अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यात पर्यटक समुद्रकिनाऱ्यांचा आनंद लुटत आहेत. मुंबईपासून जवळ असल्याने रायगडला पर्यटकांची पहिली पसंती असते. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, पश्चिम महाराष्ट्र या भागांतून पर्यटक पर्यटनास आले आहेत. जिल्ह्यातील हॉटेल, रिसॉर्ट, लॉजेस हाऊसफुल्ल झाले आहेत. जिल्ह्यातील नागाव, काशीद, वरसोली या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांसाठी बोटिंग, घोडागाडी सवारी यांसारख्या सुविधा असल्यामुळे किनाऱ्यावर पर्यटक याचा लाभ घेत आहेत.


पर्यटकांमुळे हॉटेल, रिसॉर्ट यांच्यासोबत घरगुती लॉजेस चालवणाऱ्या स्थानिकांनाही आर्थिक फायदा होत आहे. तसेच, पर्यटनास आलेले पर्यटक परत माघारी फिरताना समुद्र किनाऱ्यालगतच असलेल्या स्टॅलमधून विविध प्रकारची लोणची, चिंचेचे गोळे, वाल, विविध प्रकारचे पापड, पांढरा कांदा या वस्तूंची खरेदी करतात.



हॉटेल, लॉज, रिसॉर्ट व्यावसायिकांना फायदा


अलिबागमध्ये पर्यटकांची जत्रा भरल्याचे चित्र समुद्रावर दिसत होते. समुद्रस्नानाचा आनंद बच्चे कंपनीसह मोठेही घेत होते. उंट, घोडा, तसेच एटीव्ही बाईकचा आनंद लुटताना पर्यटकांची धूम मस्ती सुरू होती. पर्यटक पुन्हा अलिबागेत येऊ लागल्याने स्थानिक व्यावसायिक आनंदीत आहेत. पर्यटक मोठ्या संख्येने येऊ लागल्याने हॉटेल, लॉज, रिसॉर्ट व्यावसायिक याना आर्थिक फायदा होऊ लागला आहे.



व्यवसायांना मिळणार उभारी


घोडागाडी, एटीव्ही बाईकवर स्वार होऊन समुद्रकिनाऱ्यांचा आनंद लुटताना पर्यटक दिसत आहेत. समुद्रकिनाऱ्यावरील स्टॉलवर वडापाव, भजी, पॅटीस असे वेगवेगळे प्रकारचे खाद्य पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. आर्थिक मंदीमुळे झालेल्या लहान-मोठ्या व्यवसायाला पुन्हा उभारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



Comments
Add Comment

हातपाय बांधले आणि चोर समजून तरुणाला मरेपर्यंत मारले

मुंबई : चोर सोडून संन्याशाला फाशी ही म्हण मुंबईतील गोरेगावमध्ये काही प्रमाणात खरी ठरली. गोरेगावच्या तीन डोंगरी

जागतिक प्रायव्हेट वेचंर कॅपिटल गुंतवणूकीत १२० अब्ज डॉलर्सने वाढ मात्र भारतात गुंतवणूक मंदावली - KPMG Report

प्रतिनिधी: केपीएमजी प्रायव्हेट एंटरप्राइझच्या व्हेंचर पल्सच्या नव्या रिपोर्ट आवृत्तीनुसार, जागतिक वेंचर

कधी आहे कार्तिक महिन्यातील विनायक चतुर्थी? जाणून घ्या मुहूर्त, योग आणि पूजा विधी

मुंबई : प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी गणपती बाप्पाला समर्पित असते. शुक्ल पक्षातील

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

माझ्या विजयात प्रतिका रावलचाही समान हक्क! स्मृती मानधनाच्या एका वाक्याने चाहते खूश

नवी मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी रविवार, २३ ऑक्टोबर रोजी भारत विरूद्ध न्यूझीलंड

एकाच कुटुंबातील पाचजणांनी केला सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न, एकाचा मृत्यू! पनवेलमधील धक्कादायक घटना

पनवेल: पनवेलमध्ये एका कुटुंबाने सामुहिक आत्महत्या करत स्वत:ला संपण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर