Kolhapur Tirupati Air transport : कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा पुन्हा सुरू; मोठी गैरसोय दूर होणार

कसं असणार वेळापत्रक?


कोल्हापूर : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेली कोल्हापूर विमानतळावरून (Kolhapur Airport) कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा (Kolhapur Tirupati Airlines) आता पुन्हा सुरू होणार आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई (Shri Ambabai) आणि तिरुपतीमधील बालाजी (Tirupati Balaji) देवस्थानचं दर्शन घेऊ इच्छिणार्‍या भाविकांसाठी ही एक खुशखबर आहे. काही काळासाठी बंद झालेली ही सेवा आजपासून पूर्ववत होणार असल्याने भाविकांसह पर्यटक, उद्योजकांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे.


श्री अंबाबाई आणि बालाजी देवस्थानचा मोठा ऋणानुबंध आहे. दोन्हीकडे धार्मिक महत्त्व प्रचंड असल्याने या मार्गावर विमानसेवा पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने प्रवाशांकडून होत होती. त्यामुळे आता ही सेवा सुरू झाल्याने पर्यटकांची मोठी सोय होणार आहे. कोल्हापूर विमानतळावरून कोल्हापूर ते तिरुपती या मार्गावर आठवड्यातून मंगळवार, बुधवार आणि रविवार अशा तीन दिवसात ही सेवा उपलब्ध असणार आहे.



कसं असणार वेळापत्रक?


कोल्हापूर विमानतळावरून सकाळी ११ वाजता उड्डाण केल्यानंतर दुपारी १२:१० वाजता विमान तिरुपतीला पोहोचणार आहे. त्यानंतर परतीच्या प्रवासात तिरुपतीहून दुपारी साडेबारा वाजता विमान सुटून दुपारी पावणे दोनच्या सुमारास कोल्हापूर विमानतळावर पोहोचेल. त्यामुळे कोल्हापुर आणि तिरुपती ही दोन धार्मिक स्थळे या निमित्ताने पुन्हा एकदा जोडली जाणार आहेत. या सेवेला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर फेऱ्यांमध्ये वाढ केली जाणार आहे. या मार्गावरील २ हजार ९९९ रुपये तिकिट दर असेल.


यापूर्वी इंडिगो कंपनीकडून कोल्हापूर-तिरुपती सेवा सुरू होती. मात्र, प्रतिसाद मिळाला नसल्याने सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर उद्योजक पर्यटकांची मोठी गैरसोय झाली होती. त्यामुळे ही सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती.

Comments
Add Comment

संगमनेर येथील 'पोकळी हिस्से' नोंदीचा प्रश्न मार्गी

नागपूर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील इंदिरा नगर भागात सर्वे

पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरणी पोलिसांविरोधात मोठी कारवाई

पुणे : पुण्याच्या कल्याणीनगर भागात १९ मे २०२४ रोजी पोर्शे कारचा अपघात झाला होता. पोर्शे कारने अश्विनी कोस्टा आणि

नाशिक - पुणे रेल्वे मार्गात बदल, अहिल्यानगरचे नागरिक नाराज

नागपूर : कित्येक वर्षांपासून बहुचर्चित नाशिक - पुणे लोहमार्ग होण्याच्या दिशेने गंभीरपणे हालचाली सुरू झाल्या

दीपावलीला युनेस्कोचा दर्जा; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात केले निवेदन

नागपूर : युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत दीपावलीचा समावेश करण्यात आल्याने भारतीय संस्कृतीचा जगभर

महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांचा गंभीर प्रश्न; नागपूर अधिवेशनात आमदार सोनवणे यांनी वेधले लक्ष, 'राज्य आपत्ती' घोषित करण्याची मागणी

नागपूर : महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि त्यांच्या मानवी वस्तीत घुसून होणाऱ्या जीवघेण्या

बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत उपाय करा

नागपूर : बिबट्याची दहशत संपवा, राज्यात दोन बिबट्या रेस्क्यू सेंटर सुरू करा... बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत