Icecream: आईस्क्रीम खाल्ल्यानंतर चुकूनही करू नका या गोष्टींचे सेवन, नाहीतर आरोग्याला होईल हे नुकसान

  478

मुंबई: उन्हाळा येताच लोक थंड पदार्थ खाण्यास सुरूवात करतात. उन्हाळ्याच्या दिवसांत कोल्ड्रिंक, फ्रूट ज्यूस, लस्सी, शिकंजी, श्रीखंड तसेच आईस्क्रीम हे खाण्याला मोठी पसंती असते. अधिकतर लोक तर आईस्क्रीम खाणे पसंत करतात.


मात्र तुम्हाला माहीत आहे की आईस्क्रीम खाल्ल्यानंतर काही गोष्टींचे सेवन चुकूनही करू नये. जाणून घ्या आईस्क्रीम खाल्ल्यानंतर कोणत्या गोष्टींचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत आईस्क्रीम खाणे अधिक पसंत करतात. मात्र हे खाल्ल्यानंतर लगेचच काही गोष्टींचे सेवन करू नये.


आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेचच थंड पाणी पिऊ नये. असे केल्याने पोटदुखी, गॅस, अॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते.


याशिवाय तुम्ही आईस्क्रीम खाल्ल्यानंतर गरम पदार्थांचे सेवन करू नये. जसे चहा, कॉफी, सूप, ग्रीन टी इत्यादी. इतकंच नव्हे तर आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेचच संत्री, लिंबूपाणी, द्राक्षे या फळांचे सेवन करू नये. हे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.


आईस्क्रीम खाल्ल्यानंतर चुकूनही दारूचे सेवन करू नये. यामुळे उल्टीचा त्रास, पोटातील त्रास तसेच चक्कर येणे या समस्या सतावू शकतात. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर भोजनही करू नये जसे मटन, बटर, तुपात बनवलेले पदार्थ, बिर्याणी, चायनीज पदार्थ, जंक फूड खाऊ नयेत.


याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरजेपेक्षा अधिक आईस्क्रीमचे सेवन करू नये. कारण यामुळे शरीरास नुकसान होते. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर कमीत कमी ४० मिनिटांपर्यंत काही खाऊ नये.

Comments
Add Comment

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे

Uric Acid: शरीराकडून मिळतात 'हे' धोकादायक संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा वाढू शकतात गंभीर समस्या!

मुंबई : आजकाल उच्च युरिक अ‍ॅसिड (High Uric Acid) ही एक सामान्य समस्या बनली आहे, जी गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

Weight Loss: व्यायाम आणि डाएट न करताही वजन करा कमी, लक्षात ठेवा या ३ गोष्टी

मुंबई: आजच्या काळात वाढलेले वजन ही अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या

धोक्याची घंटा! भारतात ५ वर्षांत हृदयरोगाचे प्रमाण ५० टक्क्यांनी का वाढले?

मागील ५ वर्षांत हृदयरोगाच्या औषधांची मागणी ५० टक्क्यांनी वाढली; तरुणही धोक्यात! मुंबई : गेल्या पाच वर्षांत