Icecream: आईस्क्रीम खाल्ल्यानंतर चुकूनही करू नका या गोष्टींचे सेवन, नाहीतर आरोग्याला होईल हे नुकसान

मुंबई: उन्हाळा येताच लोक थंड पदार्थ खाण्यास सुरूवात करतात. उन्हाळ्याच्या दिवसांत कोल्ड्रिंक, फ्रूट ज्यूस, लस्सी, शिकंजी, श्रीखंड तसेच आईस्क्रीम हे खाण्याला मोठी पसंती असते. अधिकतर लोक तर आईस्क्रीम खाणे पसंत करतात.


मात्र तुम्हाला माहीत आहे की आईस्क्रीम खाल्ल्यानंतर काही गोष्टींचे सेवन चुकूनही करू नये. जाणून घ्या आईस्क्रीम खाल्ल्यानंतर कोणत्या गोष्टींचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत आईस्क्रीम खाणे अधिक पसंत करतात. मात्र हे खाल्ल्यानंतर लगेचच काही गोष्टींचे सेवन करू नये.


आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेचच थंड पाणी पिऊ नये. असे केल्याने पोटदुखी, गॅस, अॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते.


याशिवाय तुम्ही आईस्क्रीम खाल्ल्यानंतर गरम पदार्थांचे सेवन करू नये. जसे चहा, कॉफी, सूप, ग्रीन टी इत्यादी. इतकंच नव्हे तर आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेचच संत्री, लिंबूपाणी, द्राक्षे या फळांचे सेवन करू नये. हे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.


आईस्क्रीम खाल्ल्यानंतर चुकूनही दारूचे सेवन करू नये. यामुळे उल्टीचा त्रास, पोटातील त्रास तसेच चक्कर येणे या समस्या सतावू शकतात. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर भोजनही करू नये जसे मटन, बटर, तुपात बनवलेले पदार्थ, बिर्याणी, चायनीज पदार्थ, जंक फूड खाऊ नयेत.


याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरजेपेक्षा अधिक आईस्क्रीमचे सेवन करू नये. कारण यामुळे शरीरास नुकसान होते. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर कमीत कमी ४० मिनिटांपर्यंत काही खाऊ नये.

Comments
Add Comment

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर