Cyber Crime: सावधान! +92 या क्रमांकांपासून सुरु होणारे कॉल घेऊ नका, सरकारने का दिला इशारा

मुंबई : सध्याच्या घडीला मोबाईल वापरणं मुलभूत गरज बनली आहे. आजकाल सर्वच काम मोबाईल वर होऊन जातात. मोबाईलच्या फायद्यांसह अनेक दुरुपयोगही होत आहेत. मोबाईल्समुळे सायबर क्राईम अधिक प्रमाणात वाढत असल्याने मोबाईल वापरकर्त्यांना दुरसंचार विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे. व्हॉट्सअॅपवर +92 सारख्या परदेशी मूळ क्रमांकावरुन कॉल येत असतील तर ते कॉल उचलू नका. या नंबरवरुन येणाऱ्या कॉलमुळे मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे, असे दुरसंचार विभागाने म्हटले.


+92 या नंबरवरुन कॉल आला आणि सरकारी अधिकारी असल्याचे सांगत असल्यास तरी देखील कोणतीही माहिती देऊ नका. टेलिकॉम विभागांची तोतयागिरी करणारे कॉलर मोबाईल वापरकर्त्यांना धमकावत आहेत. त्यांचे नंबर डिस्कनेक्ट केले जातील किंवा काही बेकायदेशीर कामांमध्ये त्यांच्या नंबरचा गैरवापर केला जात आहे. असे सांगून हे सायबर गुन्हेगार निष्पाप नागरिकांना धमकावत आहेत.


दूरसंचार विभाग आपल्या वतीने कोणालाही असे कॉल करण्यासाठी सहमती दिली नाही. त्यांनी लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे आणि कोणत्याही गोष्टी शेअर न करण्यास सांगितले. असे कॉल प्राप्त करणाऱ्या लोकांची प्रकरणे वाढत आहेत. सायबर गुन्हेगार आर्थिक फसवणूक करण्यासाठी या कॉलद्वारे लोकांना धमकावून वैयक्तिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे दुरसंचार विभागाने लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. असे कॉल आल्यास कुठलीही माहिती देऊ नका. सायबर क्राइम हेल्पलाइन नंबर 1930 किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार करण्याचा सल्ला दुरसंचार विभागाने दिला आहे.

Comments
Add Comment

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

जगभरात लोकप्रिय ‘रेडिओ सिलोन’ची शताब्दी

‘बिनाका गीतमाला’सह गाजलेले अनेक कार्यक्रम कोलंबो : भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या ‘रेडिओ

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ