Heat stroke : उष्णता वाढली! राज्य सरकारकडून उष्माघातापासून संरक्षणासाठी सूचना जारी

राज्यात उष्माघाताचे १३ रुग्ण


मुंबई : दिवसेंदिवस राज्यातील तापमानात मोठी वाढ (Temperature increased in Maharashtra) होताना दिसत आहे. सकाळच्या वेळेतही प्रखर ऊन जाणवत आहे. वाढत्या ऊनामुळे घराच्या बाहेर पडणं देखील मुश्किल झालं आहे. नागरिकांना वाढत्या उष्णतेचा त्रास होत असून उष्माघाताच्या (Heatstroke) रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने (Maharashtra Govt) काही मार्गदर्शक सूचना (Guidelines) जारी केल्या आहेत.


राज्यात यावर्षी उष्माघाताच्या १३ रुग्णांची नोंद झाली आहे. बीडमध्ये (Beed) सर्वाधिक चार रुग्ण तर रायगडात दोन रुग्णांची नोंद झाली आहे. अहमदनगर, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, धुळे आणि साताऱ्यात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.



उष्माघातापासून संरक्षणासाठी राज्य सरकारच्या सूचना :


१) तुम्हाला तहान लागली नसली तरीही दिवसभर भरपूर प्रमाणात पाणी प्या


२) दिवसाच्या सर्वात जास्त उष्णता असलेल्या वेळेत (सामान्यत: सकाळी उशिरा ते संध्याकाळ) म्हणजे सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत घरात किंवा सावलीच्या ठिकाणी राहा.


३) कापसासारख्या कपड्यांपासून बनवलेले हलके, सैल कपडे घाला. गडद रंगाचे कपडे परिधान करणे टाळा.


४) घराबाहेरील, विशेषत: दिवसाच्या सर्वात उष्ण वेळेत (सामान्यत: सकाळी उशिरा ते संध्याकाळ) कामे कमी करण्याचा प्रयत्न करा.


५) तुमच्या चेहऱ्याचे आणि डोळ्यांचे सूर्यापासून संरक्षण करण्यासाठी रुंद टोपी आणि सनग्लासेस घाला.


६) कुटुंबातील मुले, वृद्ध सदस्यांवर लक्ष ठेवा, कारण त्यांना उष्णतेशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते.


७) अती घाम येणे, अशक्तपणा येणे, चक्कर येणे, मळमळ होणे ही लक्षणे तुम्हाला किंवा इतर कोणाला आढळल्यास ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या. नाहीतर तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो.



काय काळजी घ्यावी?


तुमच्याकडे वातानुकूलन (एयर कंडिशनर) नसेल, तर हवा खेळती राहण्यासाठी पंखे वापरा आणि तुमची राहण्याची जागा थंड करा. स्थानिक हवामान अंदाज आणि अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या तापमानासंबंधीच्या सूचनांकडे लक्ष द्या. दिवसाच्या सर्वाधिक तापमान असलेल्या वेळेत सामाजिक मेळावे घेणं टाळा.

Comments
Add Comment

Seven Hills Hospital: सेव्हन हिल्स रुग्णालयाचे खासगीकरण?; रुग्णालय पूर्णपणे महापालिकेच्या ताब्यात घेण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या चालवण्यात येणारे सेव्हन हिल्स रुग्णालय हे आता खासगी संस्थेच्या ताब्यात

Mumbai: राजावाडी रुग्णालयाचा होणारा विलंब खपवून घेणार नाही; महापौरांनी भरला अधिकाऱ्यांना दम

मुंबई: घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयावर रुग्णसेवेचा भार अधिक आहे. अशा स्थितीत रुग्णालयाच्या पुनर्विकासाचे

मध्य रेल्वेचा विशेष ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर अर्थात मेन लाईनवर परळ आणि करी रोड स्थानकांदरम्यानच्या प्रभादेवीवरील

Metro : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९, डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो-२ बीचे उद्घाटन ६ एप्रिलला

मुंबई : मुंबईत मेट्रोचे जाळे झपाट्याने पसरत आहे. दरम्यान, आता दोन मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण पुन्हा लांबणीवर

सात जिल्ह्यांचे कलेक्टर बदलले; २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने बदल्यांचे सत्र सुरू ठेवले असून, गुरुवारी विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे

Mumbai : अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई

मुंबई( विशेष प्रतिनिधी) : अनधिकृत बांधकाम केल्यास किंवा त्या बांधकामांवर कारवाई करताना अडथळा आणल्यास