अयोध्येत रामनवमीची तयारी जल्लोषात

अयोध्या : अयोध्येत राम मंदिरात रामललाचे दर्शन घेणाऱ्या भाविकांचा ओघ कमी होताना दिसत नाही. यातच राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदा श्रीराम नवमीचा उत्सव अयोध्येत मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी अयोध्या नगरी, प्रशासन आणि श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट सज्ज झाले आहेत. रामनवमीच्या कालावधीत अयोध्येत तब्बल १५ लाख भाविक रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी येऊ शकतात, असा कयास असून, त्यासाठी २४ राम मंदिर खुले ठेवण्याचे निर्णय घेण्यात आला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, १५ ते १७ एप्रिल या कालावधीत राम मंदिर २४ तास खुले राहणार आहे. त्यामुळे भाविकांना कोणत्याही वेळेस आले, तरी रामलल्लाचे दर्शन सुलभपणे घेता येणार आहे. आवश्यकता भासल्यास १८ एप्रिल रोजीही राम मंदिर दिवसभर खुले ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे. श्रीराम नवमीनिमित्त अयोध्येत १५ लाख भाविक येऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्या अनुषंगाने अयोध्या प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी सातत्याने बैठका घेत असून, सर्व गोष्टींचा सविस्तर पद्धतीने आढावा घेत आहेत, असे सांगितले जात आहे.



राम मंदिरात दररोज सुमारे २ लाखांच्या घरात भाविक दर्शनाला येतात. काहीवेळेस ही संख्या ४ ते ५ लाखांवर जाते. शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राम मंदिर संकल्प पूर्ण झाला असून, श्रीराम नवमीच्या दिवशी रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांचा महासागर लोटू शकतो, यादृष्टीने सर्व गोष्टींची तयारी केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. अयोध्या पोलिसांनीही तयारीचा आढावा घेतला आहे. १५ ते १७ एप्रिल या कालावधीत २४ तास मंदिर खुले ठेवल्याने अधिकाधिक भाविक रामलल्लाचे दर्शन करू शकतील, असे श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.



दरम्यान, राम मंदिराचे संपूर्ण काम लवकरच पूर्ण केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतर रामभक्तांना रामलल्लाचे दर्शन सुलभपणे घेता यावे, यासाठी अनेक सोयी, सुविधा, बदल, नियम करण्यात आले. याचा फायदा भाविकांना होत असल्याचे सांगितले जात आहे.

Comments
Add Comment

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत