Ramtek News : काँग्रेस नेत्यांनी दबाव टाकल्याचा आरोप करत किशोर गजभिये अपक्ष लढणार

  84

रामटेकमध्ये काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का


रामटेक : रामटेक लोकसभा मतदारसंघातील (Ramtek Loksabha) काँग्रेसच्या (Congress) अडचणी थांबत नसल्याचे चित्र आहे. काँग्रेसने रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांना उमेदवारी जाहीर केली मात्र त्यांचं जात प्रमाणतपत्र पडताळणीत अपात्र ठरल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. हा काँग्रेससाठी एक धक्का होता. त्यानंतर आता रामटेकमध्येच काँग्रेसला दुसरा मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे नेते असलेले किशोर गजभिये (Kishor Gajbhiye) यांनी आपण याच मतदारसंघातून अपक्ष लढणार असल्याचं तसेच काँग्रेसच्या सदस्यत्वाचा लवकरच राजीनामा देणार असल्याचं म्हटलं आहे.


माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट करताना किशोर गजभिये म्हणाले, "रामटेक लोकसभा मतदारसंघातून मी माझा उमेदवारी अर्ज भरला होता. हा अर्ज आधिक स्विकृत झालेला आहे. यामध्ये निवडणूक चिन्हही मला मिळालं आहे. जे मुक्त चिन्ह आहेत त्यातील प्रेशर कुकर हे चिन्ह मला मिळालं आहे."


मला जिंकायचं आहे त्यामुळं कोणाला फटका बसतोय याची चिंता मी कशाला करु? मी सध्या काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला नाही. पण लवकरच देणार आहे. मी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी माझ्यावर दबाव होताच, त्यासाठी लोकांनी प्रयत्नही करुन पाहिले. पण यावर मी आत्ता जास्त भाष्य करणार नाही, असंही यावेळी गजभिये यांनी सांगितलं.



गजभिये यांनी का केली बंडखोरी?


किशोर गजभिये यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, माजी मंत्री सुनील केदार यांनी त्यांच्या नावाला कडाडून विरोध दर्शवला होता. त्यांनी रश्मी बर्वे यांच्या नावाचा आग्रह धरला होता. केदारांचा हट्ट काँग्रेसच्या नेत्यांनी पुरवल्याने गजभिये यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.


वंचित बहुजन आघाडीने त्यांना उमेदवारी देण्याचं जाहीरसुद्धा केलं होतं. पण अचानक वंचितच्या वतीनं भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर चहांदे यांनीही उमेदवारी दाखल केली. त्यामुळे वंचितकडूनही गजभिये यांना डावलण्यात आलं. त्यामुळं त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला.


२०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसने रामटेकमधून किशोर गजभिये यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी सुनील केदार आणि माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी त्यांच्या नावाला उघडपणे विरोध केला होता.

Comments
Add Comment

शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला

संगमनेर : संगमनेर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी ७.४०

विरार दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर

मुंबई : विरार भागात एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झालेला आहे, याबद्दल मुख्यमंत्री

Dagdusheth Halwai Ganpati Atharvashirsha : दगडूशेठ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे एकत्रित अथर्वशीर्ष पठण; खासदार सुनेत्रा पवारांचीदेखील खास उपस्थिती

पुणे : गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पुण्यात भक्तिभाव आणि मंत्रोच्चारांच्या गजरात झाली. शहरातील

गडचिरोली जिल्ह्यात चकमक, एवढे जहाल नक्षलवादी ठार

गडचिरोली : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत चार जहाल

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis : “शिवनेरीवरून शब्द देतो...” मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांना थेट इशारा!

पुणे : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, या प्रमुख मागणीसाठी अंतरवाली सराटीतून २७ ऑगस्ट रोजी मुंबईच्या

विरार इमारत दुर्घटना, मृतांचा आकडा १५ वर

वसई: वसई तालुक्याच्या विरार येथील नारंगी रोडवरील रमाबाई अपार्टमेंट इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा