Kejriwal Government : दिल्लीच्या आणखी एका मंत्र्याला ईडीचे समन्स; केजरीवाल सरकार पुन्हा अडचणीत

नवी दिल्ली : दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी (Liquor scam) मनी लाँड्रिंगचा (Money laundering) तपास करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाची (ED) जोरदार कारवाई सुरू आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अटक केल्यानंतर त्यांच्या कोठडीची मुदतही वाढवण्यात आली. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढत असतानाच आता त्यात आणखी भर पडली आहे. ईडीने दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत (Kailash Gehlot) यांना समन्स (ED summons) पाठवले आहे. त्यांना आज चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.


कैलाश गहलोत यांच्यावर एक्साइज पॉलिसी ड्राफ्ट तयार केल्याचा आरोप आहे. तपास यंत्रणांचा आरोप आहे की आप नेता कैलाश गहलोत हे देखील त्याच गटाचा भाग होते ज्यांनी या पॉलिसीचा ड्राफ्ट तयार केला होता. इतकंच नाही तर गेहलोत यांच्यावर मद्य व्यापारी विजय नायर याला आपलं सरकारी घर दिल्याचा आरोप देखील आहे.


आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या कोठडीत आहेत. केजरीवाल यांना १ एप्रिलपर्यंत ईडीच्या ताब्यात राहावे लागणार आहे. तसेच कोठडीसाठीच्या नव्या अर्जात ईडीने म्हटले होते की, कोठडीत चौकशीदरम्यान मुख्यमंत्र्यांचे पाच दिवसांचे जबाब नोंदवण्यात आले होते आणि ते उत्तर देण्यास टाळाटाळ करत होते. ईडीने सांगितले की, कोठडीदरम्यान इतर तीन लोकांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च