Leopard in Hinjewadi : हिंजवडी आयटी पार्क परिसरात आढळलं नवजात बिबट्याचं पिल्लू

बिबट्याचा वावर असल्याचं समजल्याने नागरिकांमध्ये घबराहट


हिंजवडी : हिंजवडी आयटी पार्क परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं अनेकदा विविध घटनांमधून समोर आलं आहे. त्यावर आज पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं आहे. कारण इथल्या परिसरात एका शेतात नवजात बिबट्याचं पिल्लू आढळून आलं. या बिबट्याच्या बछड्याला वनविभाग आणि अॅनिमल रेस्क्यू टीमने ताब्यात घेतलं आहे. बिबट्याच्या वावरामुळे येथील स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.


सध्या हिंजवडी परिसरात ऊसतोडणी वेगात असल्याने बिबट्या व त्यांचे बछडे आढळण्याचे प्रकार घडत आहेत. आज नेरे (मुळशी) येथील ऊसाच्या फडात बिबट्याच्या नर जातीचा एक नवजात बछडा आढळून आला. हिंजवडी आयटीलगत अगदी पाच किमी अंतरावरील नेरे येथील शेतकरी राहुल जाधव यांच्या शेतात ऊसतोड करताना एका मजुराला हा बछडा आढळला.


जाधव यांनी तात्काळ वनविभाला ही माहिती दिली त्यानुसार घटनास्थळी पौडचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण, वनपाल प्रज्ञा बनसोडे, आयटी पार्क हिंजवडीचे वनरक्षक पांडूरंग कोपनर, अॅनिमल रेस्क्यू टीम, वाईल्ड अॅनिमल अँड स्नेक प्रोटेक्शन, वन्यजीव रक्षक संघटेनेचे स्वयंसेवक दाखल झाले. गोंधळामुळे घाबरून बिबट मादी बछड्याला घ्यायला आली नसावी असा अंदाज वनरक्षक पांडुरंग कोपनर यांनी व्यक्त केला.


मात्र, त्या बछड्याला मातेची गरज असल्याने बछडा ज्या ठिकाणी सापडला त्याच ठिकाणी सायंकाळी त्याला सोडण्यात आलं आणि कॅमेरे सेट केले गेले याद्वारे त्यांची निरीक्षणं नोंदविली जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरू नये असं आवाहन पौडचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण यांनी केलं आहे. तसेच जोपर्यंत मादी बछड्याला घेऊन जात नाही तोपर्यंत दोन-तीन दिवस ऊसतोड बंद ठेवण्याच्या सूचना वन विभागाने शेतकरी जाधव यांना दिल्या आहेत.


बछड्याला मानवाचा हात लागला आणि त्याचा वास मादीला आल्यास ती त्यांना स्वीकारत नाही अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिल्याने पिलांना हाताळताना कमालीची खबरदारी घेण्यात आली. हातात कापडी व रबरी हँड ग्लोव्हज घालूनच त्यांना पिंजऱ्यात ठेवण्यात आलं.

Comments
Add Comment

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर