Pension Scheme: या सरकारी पेन्शन योजनेत गुंतवा पैसे, म्हातारपणी दर महिन्याला मिळतील १० हजार रूपये

मुंबई: जर तुम्हाला रिटायरमेंटनंतर आपले जीवन टेन्शनशिवाय घालवायचे आहे तर या सरकारी पेन्शन स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता. आम्ही तुम्हाला अशा सरकारी स्कीमबद्दल सांगत आहोत ज्यात तुम्ही पैसे गुंतवून वयाच्या ६० वर्षांनंतर गॅरंटेड पैसे मिळवू शकता.


तुमचे म्हातारपण सुरक्षित बनवण्यासाठी भारत सरकारच्या शानदार पेन्शन योजनेत पैसे गुंतवू शकता. या योजनेचे नाव आहे अटल पेन्शन योजना.


नुकतीच अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी अटल पेन्शन योजनेबाबत महत्त्वाची माहिती सांगितली. अर्थ मंत्री म्हणाल्या की योजनेंतर्गत कमीत कमी ८ टक्के रिटर्न मिळत आहे.


अटल पेन्शन योजना एक अशी योजना आहे जी मध्यम वर्गांच्या गरजा लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे. या योजनेमध्ये आतापर्यंत ७ कोटी लाभार्थी जोडले गेले आहेत.


या स्कीमची सुरूवात ९ मे २०१५ला झाली होती. या योजनेंतर्गत लाभार्थींना १ हजार रूपयांपासून ते ५ हजार रूपयांपर्यंत महिन्याला पेन्शन मिळू शकते. ही पेन्शन तुम्ही गुंतवणूक करत असलेल्या राशीवर अवलंबून असते.


या स्कीमअंतर्गत प्रत्येक गुंतवणूकदाराला वयाच्या ६०नंतर दर महिन्याला पेन्शन मिळते. या योजनेचा लाभ उचलण्यासाठी तुमचे वय कमीत कमी १८ ते ४० दरम्यान असले पाहिजे. जर तुम्ही वयाच्या १८व्या वर्षापासून दर महिन्याला २०१ रूपये गुंतवता तर ६० वर्षानंतर तुम्हाला दर महिन्याला ५ हजार रूपयांची पेन्शन मिळू शकते.


जर पती-पत्नी दोघेही या योजनेत गुंतवणूक करत असतील तर वयाच्या ६० वर्षानंतर दोघांना एकूण १० हजार रूपयांची पेन्शन मिळू शकते.

Comments
Add Comment

रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा

BMC : मुंबईसाठी तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्यांची खरेदी

सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करताना या ठेवणार कुठे? मुंबई : मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून

Navi Mumbai: नवी मुंबईतील भोंदूची विकृती उघड; काळी जादू करण्यासाठी महिलांना विवस्त्र व्हायला सांगत...

नवी मुंबई: राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक

Ashok Kharat Case : भोंदूबाबा प्रकरणातील स्त्रिया मानसिक धक्क्यात; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे.....

मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे, भोंदूबाबा सोबतचे

मिठी नदी, नालेसफाईच्या कामांबाबत गैरप्रकार झाल्यास थेट कारवाई; महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिला इशारा

मुंबई: नालेसफाईच्या संपूर्ण प्रक्रियेवर अभियंत्यांचे वैयक्तिक लक्ष असणे आवश्यक आहे. तसेच नालेसफाईच्या

महापौरांनी ओळखला भविष्यातील पाणी टंचाईचा धोका; सन २००९च्या धर्तीवर मुंबईतील सर्व विहिरी तपासा, तात्काळ वापरात आणा

मुंबई: भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी मुंबईतील सर्व सार्वजनिक, शासकीय तसेच खासगी विहिरी आणि कूपनलिकांची