Pension Scheme: या सरकारी पेन्शन योजनेत गुंतवा पैसे, म्हातारपणी दर महिन्याला मिळतील १० हजार रूपये

  399

मुंबई: जर तुम्हाला रिटायरमेंटनंतर आपले जीवन टेन्शनशिवाय घालवायचे आहे तर या सरकारी पेन्शन स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता. आम्ही तुम्हाला अशा सरकारी स्कीमबद्दल सांगत आहोत ज्यात तुम्ही पैसे गुंतवून वयाच्या ६० वर्षांनंतर गॅरंटेड पैसे मिळवू शकता.


तुमचे म्हातारपण सुरक्षित बनवण्यासाठी भारत सरकारच्या शानदार पेन्शन योजनेत पैसे गुंतवू शकता. या योजनेचे नाव आहे अटल पेन्शन योजना.


नुकतीच अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी अटल पेन्शन योजनेबाबत महत्त्वाची माहिती सांगितली. अर्थ मंत्री म्हणाल्या की योजनेंतर्गत कमीत कमी ८ टक्के रिटर्न मिळत आहे.


अटल पेन्शन योजना एक अशी योजना आहे जी मध्यम वर्गांच्या गरजा लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे. या योजनेमध्ये आतापर्यंत ७ कोटी लाभार्थी जोडले गेले आहेत.


या स्कीमची सुरूवात ९ मे २०१५ला झाली होती. या योजनेंतर्गत लाभार्थींना १ हजार रूपयांपासून ते ५ हजार रूपयांपर्यंत महिन्याला पेन्शन मिळू शकते. ही पेन्शन तुम्ही गुंतवणूक करत असलेल्या राशीवर अवलंबून असते.


या स्कीमअंतर्गत प्रत्येक गुंतवणूकदाराला वयाच्या ६०नंतर दर महिन्याला पेन्शन मिळते. या योजनेचा लाभ उचलण्यासाठी तुमचे वय कमीत कमी १८ ते ४० दरम्यान असले पाहिजे. जर तुम्ही वयाच्या १८व्या वर्षापासून दर महिन्याला २०१ रूपये गुंतवता तर ६० वर्षानंतर तुम्हाला दर महिन्याला ५ हजार रूपयांची पेन्शन मिळू शकते.


जर पती-पत्नी दोघेही या योजनेत गुंतवणूक करत असतील तर वयाच्या ६० वर्षानंतर दोघांना एकूण १० हजार रूपयांची पेन्शन मिळू शकते.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.