Pension Scheme: या सरकारी पेन्शन योजनेत गुंतवा पैसे, म्हातारपणी दर महिन्याला मिळतील १० हजार रूपये

  404

मुंबई: जर तुम्हाला रिटायरमेंटनंतर आपले जीवन टेन्शनशिवाय घालवायचे आहे तर या सरकारी पेन्शन स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता. आम्ही तुम्हाला अशा सरकारी स्कीमबद्दल सांगत आहोत ज्यात तुम्ही पैसे गुंतवून वयाच्या ६० वर्षांनंतर गॅरंटेड पैसे मिळवू शकता.


तुमचे म्हातारपण सुरक्षित बनवण्यासाठी भारत सरकारच्या शानदार पेन्शन योजनेत पैसे गुंतवू शकता. या योजनेचे नाव आहे अटल पेन्शन योजना.


नुकतीच अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी अटल पेन्शन योजनेबाबत महत्त्वाची माहिती सांगितली. अर्थ मंत्री म्हणाल्या की योजनेंतर्गत कमीत कमी ८ टक्के रिटर्न मिळत आहे.


अटल पेन्शन योजना एक अशी योजना आहे जी मध्यम वर्गांच्या गरजा लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे. या योजनेमध्ये आतापर्यंत ७ कोटी लाभार्थी जोडले गेले आहेत.


या स्कीमची सुरूवात ९ मे २०१५ला झाली होती. या योजनेंतर्गत लाभार्थींना १ हजार रूपयांपासून ते ५ हजार रूपयांपर्यंत महिन्याला पेन्शन मिळू शकते. ही पेन्शन तुम्ही गुंतवणूक करत असलेल्या राशीवर अवलंबून असते.


या स्कीमअंतर्गत प्रत्येक गुंतवणूकदाराला वयाच्या ६०नंतर दर महिन्याला पेन्शन मिळते. या योजनेचा लाभ उचलण्यासाठी तुमचे वय कमीत कमी १८ ते ४० दरम्यान असले पाहिजे. जर तुम्ही वयाच्या १८व्या वर्षापासून दर महिन्याला २०१ रूपये गुंतवता तर ६० वर्षानंतर तुम्हाला दर महिन्याला ५ हजार रूपयांची पेन्शन मिळू शकते.


जर पती-पत्नी दोघेही या योजनेत गुंतवणूक करत असतील तर वयाच्या ६० वर्षानंतर दोघांना एकूण १० हजार रूपयांची पेन्शन मिळू शकते.

Comments
Add Comment

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

मुंबईत गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल, मेट्रो सुरू ठेवावी

जनता दरबारातील मागणीचा मंत्री मंगलप्रभात लोढा पाठपुरावा करणार मुंबई  : महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईतील रेल्वे प्रकल्पाचा खर्च महापालिकेच्या माथी

एमआरव्हीसीला द्यावा लागणार ९५० कोटी रुपये निधी मुंबई  : महाराष्ट्र शासनाच्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एम. यू.

मंत्रालय प्रवेशासाठी सर्वसामान्यांना आता ‘डीजी’ नोंदणी बंधनकारक

ऑफलाइन पास देणाऱ्या खिडक्या स्वातंत्र्यदिनापासून बंद मुंबई  : कामानिमित्त मंत्रालयात येत असाल तर ‘डीजी ॲप’वर

Devendra Fadnavis on Mumbai Kabutar Khana : "कबुतरखाने अचानक बंद करू नका", कबुतरांना खुराक देण्याची जबाबदारी बीएमसीचीच...फडणवीसांची सूचना

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिकेने शहरातील कबुतरखान्यांवर कठोर कारवाई सुरू केली होती.

Dattatray Bharane : दत्तात्रय भरणे कृषीमंत्री पदावर; "राज्यात विविध भागांमध्ये फिरा, मी पाठीशी"...फडणवीसांच आश्वासन

‘शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणार, निर्णय घेणार’ : मंत्री दत्तात्रय भरणे मुंबई : विधिमंडळाचे कामकाज सुरु असताना