Pension Scheme: या सरकारी पेन्शन योजनेत गुंतवा पैसे, म्हातारपणी दर महिन्याला मिळतील १० हजार रूपये

मुंबई: जर तुम्हाला रिटायरमेंटनंतर आपले जीवन टेन्शनशिवाय घालवायचे आहे तर या सरकारी पेन्शन स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता. आम्ही तुम्हाला अशा सरकारी स्कीमबद्दल सांगत आहोत ज्यात तुम्ही पैसे गुंतवून वयाच्या ६० वर्षांनंतर गॅरंटेड पैसे मिळवू शकता.


तुमचे म्हातारपण सुरक्षित बनवण्यासाठी भारत सरकारच्या शानदार पेन्शन योजनेत पैसे गुंतवू शकता. या योजनेचे नाव आहे अटल पेन्शन योजना.


नुकतीच अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी अटल पेन्शन योजनेबाबत महत्त्वाची माहिती सांगितली. अर्थ मंत्री म्हणाल्या की योजनेंतर्गत कमीत कमी ८ टक्के रिटर्न मिळत आहे.


अटल पेन्शन योजना एक अशी योजना आहे जी मध्यम वर्गांच्या गरजा लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे. या योजनेमध्ये आतापर्यंत ७ कोटी लाभार्थी जोडले गेले आहेत.


या स्कीमची सुरूवात ९ मे २०१५ला झाली होती. या योजनेंतर्गत लाभार्थींना १ हजार रूपयांपासून ते ५ हजार रूपयांपर्यंत महिन्याला पेन्शन मिळू शकते. ही पेन्शन तुम्ही गुंतवणूक करत असलेल्या राशीवर अवलंबून असते.


या स्कीमअंतर्गत प्रत्येक गुंतवणूकदाराला वयाच्या ६०नंतर दर महिन्याला पेन्शन मिळते. या योजनेचा लाभ उचलण्यासाठी तुमचे वय कमीत कमी १८ ते ४० दरम्यान असले पाहिजे. जर तुम्ही वयाच्या १८व्या वर्षापासून दर महिन्याला २०१ रूपये गुंतवता तर ६० वर्षानंतर तुम्हाला दर महिन्याला ५ हजार रूपयांची पेन्शन मिळू शकते.


जर पती-पत्नी दोघेही या योजनेत गुंतवणूक करत असतील तर वयाच्या ६० वर्षानंतर दोघांना एकूण १० हजार रूपयांची पेन्शन मिळू शकते.

Comments
Add Comment

कबुतर खान्यांसाठी जैन समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली मुंबई महापालिका आयुक्तांची भेट, केली ही मागणी...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा

इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी रोजी

मुंबई : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता

उद्धव ठाकरे हे स्वतःच 'अजगर'- बावनकुळेंचा जोरदार हल्ला, 'आयत्या बिळावर नागोबा' म्हणत शेलारांची टीका

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकारण अ‍ॅनाकोंडा, अजगर या शब्दांच्या टीकेवरून चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरेंनी

मुंबईच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांना मोठा दिलासा, रेल्वेकडून पर्यायी पादचारी पूल झाला खुला

मुंबई : शीव रेल्वे उड्डाणपुलाचे काम आता लवकरच सुरु होणार असून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने एक

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना ११ हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण : मुख्यमंत्री

मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यात

आदित्य ठाकरेंनी 'महाराष्ट्राचा पप्पू' बनू नये!

मतदार याद्यांच्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार; राहुल गांधींसारखे 'खोदा पहाड, चुहा भी नही निकला' मुंबई: शिवसेना