कै.भास्करराव स्मृतिप्रीत्यर्थ शास्त्रीय मैफीलीचे आयोजन

नवी मुंबई : शास्त्रीय संगीताचा वारसा लाभलेले आणि शास्त्रीय संगीताची परंपरा आपल्या गायकीतून निर्माण करणारे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक पंडित डॉ. प्रकाश संगीत यांनी आपले वडील आणि गुरू, कै. भास्करराव संगीत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रविवार 31 मार्च रोजी, सायंकाळी 6 वाजता, वाशी येथील योग विद्या निकेतनमधे शास्त्राrय संगीत मैफीलीचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध बासरीवादक पं. संतोष संत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.


दरम्यान, ग्वाल्हेर घराण्याची गायकी आत्मसात करण्यासाठी त्यांनी ग्वाल्हेरला जाऊन कुंडल गुरू आणि राजाभैया पूछवाले यांच्याकडे गायकीचे धडे गिरवले. स्वातंत्र्यपूर्व काळात वर्धा या आपल्या मूळ गावी परतल्यानंतर भास्कररावांनी ब्रिटिश सरकारची नोकरी न पत्करता आर्थिक धस सोसून खाजगी शाळेत संगीत अध्यापनाला सुरुवात केली.


1940 साली त्यांनी शिवानंद संगीत विद्यालयाची स्थापना करून संगीत प्रचार आणि प्रसार करत शेकडो विद्यार्थी तयार केले. भास्करराव संगीत सेवाग्रामला, तिथल्या आश्रमवासियांना भजनावली शिकवण्यासाठी जात असत. निस्पृहपणे अनेक वर्षे त्यांनी हे दायित्व स्वीकारून आनंदाने पार पाडले.


सदर कार्यक्रमात पं. डॉ. प्रकाश संगीत स्वत, तसेच त्यांचे सुपुत्र डॉ. चैतन्य शास्त्राrय गायन सादर करणार आहेत. सदर कार्यक्रम विनामुल्य असून अधिक माहितीसाठी नंदिनी नारायणी, मो.नं. 9511649570 यांच्याशी संपर्क साधावा.

Comments
Add Comment

Megablock : विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मुंबईत आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वेने मुंबई विभागातील तिन्ही उपनगरीय मार्गांवर रविवारी १२ एप्रिल रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल

Maharashtra : अवजड वाहनांमध्ये क्लीनर बंधनकारक नाही, महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : अवजड मोटार वाहन (एचएमव्ही) चालकांना मोठा दिलासा देत महाराष्ट्र सरकारने क्लिनर ठेवण्याची अट रद्द केली आहे.

RTE साठी महाराष्ट्रातील १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांची निवड

मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया

परिणामकारक महसूल सेवेसाठी राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवर बंधने

मुंबई : महसूल विभागातील राजपत्रित अधिकारी वारंवार आणि दीर्घकाळ इतर विभाग किंवा महामंडळांमध्ये प्रतिनियुक्तीवर

BMC : स्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांनी स्वयंशिस्त मोडमध्ये यावे!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : नागरी स्वच्छता ही अत्यंत महत्वाची बाब असल्याचे नमुद केले. स्वच्छतेकडे एखाद्या

BMC : 'मुंबईत एकही गटाराचे झाकण उघडे राहता कामा नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कोणत्याही परिस्थितीत एकही मनुष्य प्रवेशिका अर्थात गटाराची झाकणे उघडी राहणार नाही, याची