Congress List: काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४साठी(loksabha election 2024) काँग्रेसने उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली आहे. बुधवारी रात्री उशिरा आलेल्या या यादीत एकूण १४ नावांचा समावेश आहे. हे उमेदवार एकूण चार राज्यांतील आहेत. यात झारखंड, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशातील जागांचा समावेश आहे.


केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याविरोधात मध्य प्रदेशच्या गुना जागेवरून राव यादवेंद्र सिंह यांना संधी देण्यात आली आहे. तर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याविरोधात काँग्रेसने विदिशा प्रताप भानू शर्मा यांना उमेदवार बनवले आहे.


झारखंड (खूंटी)- कालीचरण मुंडा
झारखंड (लोहरदगा) - सुखदेव भगत
झारखंड (हजारीबाग) - जय प्रकाश पटेल
मध्य प्रदेश (गुना)- राव यादवेंद्र सिंह
मध्य प्रदेश (दमोह)- तरवर सिंह लोधी
मध्य प्रदेश (विदिशा)- प्रताप भानू शर्मा
तेलंगाना (अदीलाबाद)- एस कुमारी चैलिमला
तेलंगाना (निजामाबाद)- टी जीवन रेड्डी
तेलंगान (भोंगीर) - सी किरण कुमार रेड्डी
तेलंगाना(मेदक)- नीलम मधु
उत्तर प्रदेश (गाजियाबाद)- डॉली शर्मा
उत्तर प्रदेश (बुलंदशहर)- शिवराम वाल्मिकी
उत्तर प्रदेश (सीतापुर)- नकुल दुबे
उत्तर प्रदेश (महराजगंज)- वीरेंद्र चौधरी



पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेसने कोणाला दिली उमेदवारी?


काँग्रेसने याआधी उत्तर प्रदेशातील ९ उमेदवारांची घोषणा केली होती. यात पक्षाचे अध्यक्ष अजय राय पंतप्रधान मोदींविरोधात पुन्हा निवडणूक लढवतील. चौथ्या यादीत वाराणसीसाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. १९ एप्रिलला लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. तर ४ जूनला निकाल घोषित केले जाणार आहेत.

Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी