बेजबाबदार खासदार राहुल गांधींना वायनाडचे लोक कंटाळले!

परदेशात फिरणारे राहुल गांधी वायनाडला टुरिस्ट व्हिसावर येतात


भाजपा उमेदवार सुरेंद्रन यांची राहुल गांधींवर टीका


केरळ भाजपाचे अध्यक्ष आणि वायनाड मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार के सुरेंद्रन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधला. यंदा राहुल गांधी पर्यटक व्हिसावरून येत असल्यामुळे ते वायनाडमधली लोकसभेत पराजित होत असल्याचे के सुरेंद्रन यांनी सांगत राहूल गांधीवर खोचक टीका केली आहे.

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना "राहुल गांधी देशभर आणि परदेशात फिरतात. ते वायनाडला टुरिस्ट व्हिसावर येतात, पण मी येथील स्थानिक नागरिक आहे आणि माझ्याकडे कायमस्वरूपी व्हिसा आहे'' असे केरळ भाजपाचे अध्यक्ष आणि वायनाड मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार के सुरेंद्रन यांनी सांगितले.

के सुरेंद्रन यांचा दावा

के सुरेंद्रन यांनी दावा केला, “वायनाडच्या लोकांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींना संधी दिली होती, पण त्यांनी काहीही केले नाही. वायनाडचे लोक राहुल गांधींना कंटाळले आहेत. अशा स्थितीत ते यावेळी जिंकणार नाही. असा दावा के सुरेंद्रन यांनी केला आहे.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी आणि वायनाडमधून निवडणूक लढवली होती. ते अमेठीमधून स्मृती इराणी यांच्याकडून पराभूत झाले होते, परंतु वायनाडमधून त्यांनी मोठा विजय नोंदवला होता. यावेळीही काँग्रेसने राहुल गांधी यांना वायनाडमधून उमेदवारी दिली आहे.

के सुरेंद्रन यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत ते बेजबाबदार खासदार असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी वायनाडमध्ये किती वेळा आले आणि इथे काय विकास झाला. वायनाडमधील २० टक्के लोक अनुसूचित जमाती श्रेणीतील आहेत. राहुल गांधी यांनी त्यांच्यासाठी काय केले? असा प्रश्न के सुरेंद्रन यांनी केला आहे.

 

 

 
Comments
Add Comment

ॲमेझॉन इंडिया ने आर्मी विमेन्स वेल्फेयर असोसिएशन बरोबर केला सहकार्य करार

- सैन्यदलातल्या कुटूंबातील महिलांमध्ये व्यावसायिक संधी वाढीस लागण्यासाठी करणार मदत बंगळुरु : आंतरराष्ट्रीय

मॅरियट बॉनव्हॉय आणि स्विगीची भागीदारी; दैनंदिन जीवनात मिळणार आनंद

स्विगीच्या विविध ऑफरिंग्समधून मिळणार मॅरियट बॉनव्हॉयचे फायदे मुंबई : मॅरियट इंटरनॅशनलचा पुरस्कारप्राप्त

धक्कादायक! १२ वर्षाच्या विद्यार्थ्याने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, कारण ऐकून थक्क व्हाल...

सिनेमातले कथानकालाही लाजवेल असा एक प्रकार पवनी तालुक्यात समोर आला आहे. एका नामांकित शाळेतील १२ वर्षीय

गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते महामंडळे पुढील अधिवेशनाच्या आत स्थापन करणार

-- मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही; पत्रकारांच्या समस्यांवर व्यापक बैठक घेणार मुंबई : पत्रकार आणि वृत्तपत्र

हा फक्त राष्ट्रपतींचा नव्हे, तर संविधानाचा अपमान, पंतप्रधान मोदींचा ममता सरकारवर घणाघात

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याच्या मुद्द्यावरून