Sanjay Nirupam: मी खिचडी चोराचं काम करणार नाही; निरुपम यांचा उबाठा गटाला इशारा

Share

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघांमध्ये उबाठा गटाकडून मुंबईतील उमेदवार घोषित केले आहेत. उबाठा गटाकडून अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्यामुळे महाविकास आघाडीत भांडणतंटेला सुरवात झाली आहे. अमोल किर्तीकर यांच्या उमेदवारीवरून काँग्रेस नेते संजय निरुपम प्रचंड आक्रमक झाले आहेत. काँग्रेस नेतृत्व उबाठा गटाला सरेंडर झालं असून, आता माझ्यासमोर सर्व पर्याय खुले असतील. आठवड्याभरात मी मोठी घोषणा करू शकतो, आता आरपारची वेळ आली असल्याचे निरुपम यांनी सांगितले.

मुंबईतील सहा पैकी पाच ठिकाणी उबाठा गट लढणार हे निश्चित झाले आहे. काँग्रेस पार्टीला खड्ड्यात घालण्याचे काम केले जात असून काँग्रेस पार्टीतून निगोशिएशन करणाऱ्या उबाठा गटाचा निषेध करतो. उबाठा गटाने ज्यांना उमेदवारी दिली आहे, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांनी खिचडी सप्लायरकडून दलाली घेतली आहे. अशा उमेदवाराला आमच्यावर थोपवलं आहे. मी खिचडी चोराचं काम करणार नाही, यासंदर्भात मी आत्ताच घोषणा करतोय, असे निरुपम म्हणाले.

न्यायाच्या गप्पा मारणारे आपल्याच कार्यकर्त्यांवर अन्याय करत आहेत. त्यांना मागील दहा दिवसात कोणीही फोन केला नसल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत न्याय होत नाही असे निरुपम यांनी सांगितले. याबाबत उबाठा गटाला जाब विचारायला हवा असा निरुपम यांनी वरिष्ठ नेत्यांना आग्रह केला. तसेच मी माझ्या नेतृत्वाला सांगू इच्छितो, माझ्याकडील सर्व पर्याय खुले असतील. एका आठवड्याहून अधिक वेळ मी नाही देऊ शकत. टफ निगोशिएटर आमचं नेतृत्व नव्हतं हे स्पष्ट दिसत आहे. आमच्या नेतृत्वाचं हे अपयश आहे हे मी मान्य करतोय. काँग्रेसला वाचवण्यात मुंबईतून आम्ही अपयशी झालोय हे दिसून येत आहे. सांगलीची जागा त्यांनी घोषणा केली यावरुन स्पष्ट दिसतंय की काँग्रेसची त्यांना गरज नाही, असं निरुपम म्हणाले.

काँग्रेस संपवण्याचा उबाठा गटाचा विचार
उबाठा गट एकट्याच्या दमावर लढू शकत नसल्याने काँग्रेसच्या सीट ओढून घेतल्या आहेत. उबाठा गटाचा काँग्रेस संपवण्याचा विचार असेल. प्रकाश आंबेडकर वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात जागांची मागणी केली. मात्र चर्चेवेळी त्यांना वाऱ्यावर सोडून दिलेलं दिसून येत आहे. एका आठवड्यानंतर काय होणार हे तुम्हाला कळणारच आहे. मुंबईत एकावेळी पाच खासदार काँग्रेसचे असायचे. पण आता काँग्रेसचा मतदार जाणार कुठे? उबाठा गटाकडे जाणार? या गोष्टीचा निरुपम यांना संभ्रम आहे. मी आवाहन करतोय तेव्हा माझे कार्यकर्तेही अमोल किर्तीकरचा प्रचार करणार नसल्याचे निरुपमांनी म्हणाले.

पार्टीला वाचवायचं असेल तर युती तोडा आणि मैदानात जाऊ
मायग्रेट लेबर हा काँग्रेसचा मतदार आहे. त्यांच्या आयुष्यासोबत जो व्यक्ती खेळला आहे त्यांना मतदारदेखील मतदान करणार नाही. उबाठा गट आणि काँग्रेसच्या युतीला मी आधीच विरोध केला होता. आता पाच वर्षांनंतर तेच दिसतंय. मात्र, आमचे काही नेते होते त्यांना सत्तेची मलाई खायची होती आणि हे घडलं. पार्टीला वाचवायचं असेल तर युती तोडा आणि मैदानात जाऊयात असेही निरुपम म्हणाले.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

54 minutes ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

2 hours ago