MVA seat allocation : काँग्रेसला जागा मिळाली म्हणून ठाकरे गटाच्या नेत्याची बंडखोरी!

ठाकरे गट-काँग्रेसमधील वाद आले चव्हाट्यावर


रामटेक : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर जागावाटपावरुन ठाकरे गट (Thackeray Group) आणि काँग्रेसमध्ये (Congress) आलबेल नसल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसला विचारात न घेता ठाकरे गटाने सांगलीतून चंद्रहार पाटील आणि दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई यांना उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये आधीच नाराजीचं वातावरण असताना आणखी एका गोष्टीमुळे मविआतील वाद चव्हाट्यावर आले आहेत. रामटेकची (Ramtek) जागा ठाकरे गटाने काँग्रेसला दिल्यामुळे उबाठाच्या सुरेश साखरे (Suresh Sakhre) यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला आहे.


रामटेकमधून काँग्रेसने रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांना उमेदवारी दिली आहे. मात्र शिवशक्ती-भीमशक्तीचा नारा देत ठाकरे गटाच्या सुरेश साखरे यांनी या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरला आहे. सुरेश साखरे हे ठाकरे गटाचे विदर्भ संघटक म्हणून काम करत होते. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर साखरे म्हणाले की, हक्कासाठी अर्ज भरला म्हणून कुणी बंडखोरी म्हणत असेल तर ती मान्य आहे. आमचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. आम्हाला वरून कुणी आदेश दिले नाहीत. वरिष्ठांनी संपर्क साधला नाही. त्यामुळे शिवसैनिकांच्या आग्रहाखातर हा उमेदवारी अर्ज दाखल केला असं त्यांनी सांगितलं. त्याचसोबत अर्ज मागे घेणार नाही असं साखरेंनी स्पष्ट केलं.


ठाकरे गटाच्या बंडखोरीवर रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांनी भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या, माझी जनता माझ्या पाठिशी आहे. गोरगरीब जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे तोपर्यंत मला कुणी हरवू शकत नाही. आज महाविकास आघाडीने मला तिकीट दिलं असून जनतेच्या जोरावर मी संसदेत जाणार आहे. मविआचे सर्व नेते माझ्या पाठिशी ताकदीने उभे आहेत. तळागाळात काम करणारा उमेदवार दिला असून त्या उमेदवाराच्या पाठीशी मविआ नेते आहेत असं रश्मी बर्वे म्हणाल्या. यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे सुरेश साखरे यांना टोला लगावला आहे.



काँग्रेस आणि ठाकरे गटात वाद


ठाकरे गटाने आज जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत दोन जागांवर महाविकास आघाडीत चर्चा होत असताना उमेदवार जाहीर केले. त्याबाबत काँग्रेस नेते प्रचंड नाराज झाले. उद्धव ठाकरेंनी फेरविचार करावा, आघाडी धर्म पाळावा अशी आग्रही मागणी काँग्रेसने केली. 'तर आता चर्चा आमच्या दृष्टीने थांबली आहे, आणखी किती चर्चा करायची?' असा प्रतिसवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला. त्यामुळे जागावाटपावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आले आहेत.

Comments
Add Comment

Laadki Vihin Yojana : 'लाडकी बहीण योजना' गाजली, आता येतेय 'लाडकी विहीण योजना'; निर्मिती सावंत पुन्हा रंगभूमीवर धिंगाणा घालणार!

मुंबई : राज्यात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'ची मोठी हवा असतानाच, आता मनोरंजनाच्या क्षेत्रात 'लाडकी विहीण योजना'

Mobile museum of Maratha : मराठा आणि समकालीन शस्त्रांचे फिरते संग्रहालय; पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचा उपक्रम!

महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात संग्रहालय फिरणार मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक

Devendra Fadanvis : शिवरायांचे सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त करणार शिवनेरी किल्ल्यावरून मुख्यमंत्र्यांची घोषणा!

महाराजांची ४०० वी जयंती जागतिक स्तरावर साजरी होणार मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची साक्ष असलेले

Eknath Shinde: 'लोककल्याणकारी राज्यासाठी शिवरायांचा विचारच मार्गदर्शक'

पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आधारित लोककल्याणकारी विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे

Pune Crime: पुणे पोलिसांच्या सर्च मोहिमेला मोठे यश; ११ बांगलादेशी महिलांना अटक

पुणे: पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात पोलिसांनी बुधवार १८ फेब्रुवारीच्या रात्री विशेष सर्च मोहीम राबवत मोठी

Cotton Procurement Scheme: मुख्यमंत्र्यांकडून कापूस खरेदी योजनेला मुदतवाढ; खुल्या बाजारात दर कोसळण्याची भीती

अकोला: शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार रणधीर सावरकर यांनी केंद्र आणि राज्य