IPL 2024: RCBच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये झाला फेरबदल, जाणून घ्या अपडेट

मुंबई: सोमवारी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स हे दोन संघ आमनेसामने होते. आरसीबीने शिखर धवनच्या नेतृत्वात पंजाब किंग्सला ४ विकेटनी हरवले. या पद्धतीने फाफ डू प्लेसिसच्या संघाला पहिला विजय मिळवता आला. तर पंजाब किंग्सविरुद्ध विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानावर पोहोचले आहेत. राजस्थान रॉयल्स पहिल्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्स दुसऱ्या आणि गुजरात टायटन्स तिसऱ्या स्थानावर आहे.



आरसीबीच्या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये किती बदल?


श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्स चौथ्या स्थानावर आहे तर पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरू अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहे. दरम्यान, या सर्व संघांचे २-२ गुण आहेत. याशिवाय सनरायजर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांना पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. पॉईंट्स टेबलमधील टॉप ४ संघ प्लेऑफसाठी क्वालिफाय करतील.



बंगळुरूचा हंगामातील पहिला विजय


सोमवारच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सला ४ विकेटनी हरवले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर विजयासाठी १७७ धावांचे आव्हान होते. फाफ डू प्लेसिसच्या संघाने १९.२ षटकांत ६ विकेट गमावत हे आव्हान पूर्ण केले. आरसीबीसाठी विराट कोहलीने सर्वाधिक ४९ बॉलमध्ये ७७ धावा केल्या. तर दिनेश कार्तिकने शेवटच्या १० बॉलमध्ये २८ धावा करत सामना संपवला.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत