३० मार्चपासून BJP फुंकणार निवडणुकीचे रणशिंग, पंतप्रधान मोदींची मेरठमध्ये मोठी रॅली

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्ष(bjp) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी(loksabha election 2024) सर्वाधिक जागा असलेले राज्य उत्तर प्रदेशातून आपल्या निवडणूक प्रचाराची सुरूवात करत आहे. याची सुरूवात ३० मार्चपासून होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मेरठ येथून एक मोठी रॅली काढून याची सुरूवात करतील. यादरम्यान जयंत चौधरीही त्यांच्यासोबत असतील. भाजपाने मेरठ लोकसभा मतदार संघातून अरूण गोविल यांना तिकीट दिले आहे.


भाजपने उत्तर प्रदेशातील ६४ जागांवर आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यात २४ मार्चला पक्षाने राज्यातील १३ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. येथे माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांना सुल्तानपूर येथून पुन्हा संधी मिळाली आहे. त्यांचे सुपुत्र आणि पिलभीतचे खासदार वरूण गांधी यांचे तिकीट कापण्यात आले आहे. त्यांच्या जागी जितीन प्रसाद यांना मैदानात उतरवण्यात आले आहे.


भाजपने पाचव्या यादीत उत्तर प्रदेशातील एकूण १३ उमेदवार घोषित केले होते. यात पक्षाने आपल्या ९ सध्याच्या खासदारांना संधी दिली नाही. पक्षाने ज्या नऊ खासदारांचे तिकीट कापले त्यात गाझियाबादचे खासदार वीके सिंह, पिलभीतचे खासदार वरूण गांधी, बरेलीचे खासदार संतोष गंगवार, कानपूरचे सत्यदेव पचौरी, बदायूंचे माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्या यांची सुपुत्री डॉक्टर संघमित्रा मौर्य, बाराबंकी येथून उपेंद्र सिंह रावत, हाथरस येथून राजवीर सिंह दिलेर, बहराईच येथून अक्षयवर लाल गौड आणि मेरठचे खासदार राजेंद्र अग्रवाल यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

उड्डाणानंतर दिल्ली - मुंबई विमानात बिघाड, इंजिन हवेतच पडलं बंद

नवी दिल्ली : दिल्लीहून मुंबईकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात उड्डाणानंतर अवघ्या ४० मिनिटांत तांत्रिक

"दिपू दासच्या मृत्यूला जबाबदार कोण?" बंगालमधील हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कोलकाता : भारतीय राजकारणात पश्चिम बंगाल हे नेहमीच संघर्षाचे केंद्र राहिले आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी

माजी अग्निवीरांना सीमा सुरक्षा दलातील भरतीत ५० टक्के कोटा

मोदी सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली : माजी अग्निवीरांना आता सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) ५० टक्के कोटा निश्चित

विवाह हे केवळ शारीरिक संतुष्टीचे साधन नव्हे...

‘लिव्ह-इन रिलेशनशिप’वर सरसंघचालक मोहन भागवत यांचे स्पष्ट मत कोलकाता : "कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक

रेल्वे प्रवासभाड्यात वाढ

२६ डिसेंबरपासून अंमलबजावणी नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने रेल्वे प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार