३० मार्चपासून BJP फुंकणार निवडणुकीचे रणशिंग, पंतप्रधान मोदींची मेरठमध्ये मोठी रॅली

  67

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्ष(bjp) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी(loksabha election 2024) सर्वाधिक जागा असलेले राज्य उत्तर प्रदेशातून आपल्या निवडणूक प्रचाराची सुरूवात करत आहे. याची सुरूवात ३० मार्चपासून होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मेरठ येथून एक मोठी रॅली काढून याची सुरूवात करतील. यादरम्यान जयंत चौधरीही त्यांच्यासोबत असतील. भाजपाने मेरठ लोकसभा मतदार संघातून अरूण गोविल यांना तिकीट दिले आहे.


भाजपने उत्तर प्रदेशातील ६४ जागांवर आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यात २४ मार्चला पक्षाने राज्यातील १३ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. येथे माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांना सुल्तानपूर येथून पुन्हा संधी मिळाली आहे. त्यांचे सुपुत्र आणि पिलभीतचे खासदार वरूण गांधी यांचे तिकीट कापण्यात आले आहे. त्यांच्या जागी जितीन प्रसाद यांना मैदानात उतरवण्यात आले आहे.


भाजपने पाचव्या यादीत उत्तर प्रदेशातील एकूण १३ उमेदवार घोषित केले होते. यात पक्षाने आपल्या ९ सध्याच्या खासदारांना संधी दिली नाही. पक्षाने ज्या नऊ खासदारांचे तिकीट कापले त्यात गाझियाबादचे खासदार वीके सिंह, पिलभीतचे खासदार वरूण गांधी, बरेलीचे खासदार संतोष गंगवार, कानपूरचे सत्यदेव पचौरी, बदायूंचे माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्या यांची सुपुत्री डॉक्टर संघमित्रा मौर्य, बाराबंकी येथून उपेंद्र सिंह रावत, हाथरस येथून राजवीर सिंह दिलेर, बहराईच येथून अक्षयवर लाल गौड आणि मेरठचे खासदार राजेंद्र अग्रवाल यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Air India Plane Crash : विमानाच्या उड्डाणमार्गातील अडथळे हटवण्यासाठी केंद्राची नवीन नियमावली!

विमानतळांच्या जवळचे अडथळे होणार दूर नवी दिल्ली : अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर एका

अ‍ॅक्सिओम-४ मिशन २२ जूनला लाँच होणार नाही, लवकरच होणार नव्या तारखेची घोषणा

नवी दिल्ली: भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर घेऊन जाणारे अ‍ॅक्सिओम-४

Ahmedabad Plane Crash: एअर इंडियाचा ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी अमेरिकेला पाठणार

अहमदाबाद: एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासासाठी अमेरिकेला पाठवला जाऊ शकतो. अपघातग्रस्त

विमान अपघात, असे सुरू आहे DNA द्वारे मृतांची ओळख पटवण्याचे काम

अहमदाबाद : एअर इंडियाच्या AI 171 या अहमदाबाद - लंडन विमानाला अपघात झाला. या अपघातात विमानातील २४२ जणांपैकी २४१ जणांचा

Air India To Cut Flights : विमान अपघातानंतर एअर इंडियाने १५% आंतरराष्ट्रीय उड्डाणे केली कमी!

नवी दिल्ली : अहमदाबादमध्ये ड्रीमलायनर विमानाच्या अपघातानंतर आणि इराण-इस्रायल संघर्ष सुरू असल्याने, एअर

Amit Shah : गृहमंत्री शहांचा हल्लाबोल! देशात इंग्रजी बोलणाऱ्यांना स्वतःची लाज वाटेल...

नवी दिल्ली : भारतीय भाषा या देशाच्या आत्म्याचे आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहेत. भारतीय भाषा ही आपली ओळख आहे