३० मार्चपासून BJP फुंकणार निवडणुकीचे रणशिंग, पंतप्रधान मोदींची मेरठमध्ये मोठी रॅली

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्ष(bjp) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी(loksabha election 2024) सर्वाधिक जागा असलेले राज्य उत्तर प्रदेशातून आपल्या निवडणूक प्रचाराची सुरूवात करत आहे. याची सुरूवात ३० मार्चपासून होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मेरठ येथून एक मोठी रॅली काढून याची सुरूवात करतील. यादरम्यान जयंत चौधरीही त्यांच्यासोबत असतील. भाजपाने मेरठ लोकसभा मतदार संघातून अरूण गोविल यांना तिकीट दिले आहे.


भाजपने उत्तर प्रदेशातील ६४ जागांवर आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यात २४ मार्चला पक्षाने राज्यातील १३ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. येथे माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांना सुल्तानपूर येथून पुन्हा संधी मिळाली आहे. त्यांचे सुपुत्र आणि पिलभीतचे खासदार वरूण गांधी यांचे तिकीट कापण्यात आले आहे. त्यांच्या जागी जितीन प्रसाद यांना मैदानात उतरवण्यात आले आहे.


भाजपने पाचव्या यादीत उत्तर प्रदेशातील एकूण १३ उमेदवार घोषित केले होते. यात पक्षाने आपल्या ९ सध्याच्या खासदारांना संधी दिली नाही. पक्षाने ज्या नऊ खासदारांचे तिकीट कापले त्यात गाझियाबादचे खासदार वीके सिंह, पिलभीतचे खासदार वरूण गांधी, बरेलीचे खासदार संतोष गंगवार, कानपूरचे सत्यदेव पचौरी, बदायूंचे माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्या यांची सुपुत्री डॉक्टर संघमित्रा मौर्य, बाराबंकी येथून उपेंद्र सिंह रावत, हाथरस येथून राजवीर सिंह दिलेर, बहराईच येथून अक्षयवर लाल गौड आणि मेरठचे खासदार राजेंद्र अग्रवाल यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी