आयपीएलचा अंतिम सामना २६ मे रोजी चेन्नईला

नवी दिल्ली : आयपीएलच्या १७व्या हंगामाची अंतिम लढत २६ मे रोजी चेन्नई येथे होणार आहे. बीसीसीआयने सोमवारी आयपीएलच्या संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. लोकसभेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर बोर्डाने उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले.


आयपीएलच्या १७व्या हंगामाला २२ मार्चपासून दणक्यात सुरुवात झाली. देशात लोकसभा निवडणुका होत असल्यामुळे आयपीएलच्या पहिल्या १७ दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले होते. २१ सामन्यांचे ७ एप्रिलपर्यंतचे हे वेळापत्रक होते. निवडणुकांच्या तारखा स्पष्ट झाल्यानंतर उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल असे सांगण्यात आले होते. सोमवारी बीसीसीआयने उर्वरित वेळापत्रकाची घोषणा केली. त्यानुसार आयपीएलची यंदाच्या हंगामाची फायनल २६ मे रोजी चेन्नई येथे होणार आहे. लोकसभा निवडणुका १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत होणार आहेत.


सोमवारी बीसीसीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ८ एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या सामन्याने पुढच्या टप्प्याची सुरुवात होणार आहे. २६ मे २०२४ रोजी आयपीएलच्या १७व्या हंगामाची अंतिम लढत होणार आहे. हा सामना चेन्नईमध्ये खेळवला जाणार आहे. तब्बल १२ वर्षांनंतर आयपीएलची फायनल चेन्नईत होणार आहे.


क्वालिफायर १ आणि एलिमेटनर हे दोन सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अनुक्रमे २१ मे आणि २२ मे रोजी होणार आहेत. तर क्वालिफायर दोन हा सामना २४ मे रोजी चेन्नईला होणार आहे.

Comments
Add Comment

गांधीनगर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास आधुनिक सुविधांनी होणार सज्ज

सीमा पवार गांधीनगर : जयपूरमधील गांधीनगर रेल्वेस्थानक लवकरच आधुनिक सुविधांनी सज्ज होणार आहे.‘अमृत भारत स्टेशन

डेस्क, मीटिंग रूम आणि चॅट… ऑफिस अफेअर्समध्ये भारत आघाडीवर

नवी दिल्ली  : भारत ऑफिस रोमॅन्समध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. एशली मॅडिसन आणि युगोव्हच्या सर्व्हेनुसार ४०

राजस्थानच्या गौरवशाली इतिहासाची गाथा सांगणार जयपूर विधानसभेतील डिजिटल संग्रहालय

जयपूर : संपूर्ण विधानसभेचे कामकाज पेपरलेस करण्यासाठी आता डिजीटल पद्धतीचा वापर जयपूर विधानसभेत होणार आहे.

प्रयागराजमध्ये यमुना नदीच्या किनाऱ्यावर बनवणार पब्लिक प्लाझा पार्क

प्रयागराज : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने महाकुंभ २०२५च्या पार्श्वभूमीवर प्रयागराज येथे यमुना

‘अल फलाह’वर गुन्हे शाखेची कारवाई

नवी दिल्ली : दिल्ली स्फोट प्रकरणात फरिदाबादमधील अल फलाह युनिव्हर्सिटीही आरोपांच्या घेऱ्यात आहे. आहे. विद्यापीठ

बिहार निवडणूक पराभवाचा फटका: रोहिणी आचार्यने RJD आणि कुटुंबाचा त्याग केला

मुंबई : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत RJD च्या मोठ्या पराभवानंतर लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबात तणाव वाढला आहे.