आयपीएलचा अंतिम सामना २६ मे रोजी चेन्नईला

नवी दिल्ली : आयपीएलच्या १७व्या हंगामाची अंतिम लढत २६ मे रोजी चेन्नई येथे होणार आहे. बीसीसीआयने सोमवारी आयपीएलच्या संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. लोकसभेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर बोर्डाने उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले.


आयपीएलच्या १७व्या हंगामाला २२ मार्चपासून दणक्यात सुरुवात झाली. देशात लोकसभा निवडणुका होत असल्यामुळे आयपीएलच्या पहिल्या १७ दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले होते. २१ सामन्यांचे ७ एप्रिलपर्यंतचे हे वेळापत्रक होते. निवडणुकांच्या तारखा स्पष्ट झाल्यानंतर उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल असे सांगण्यात आले होते. सोमवारी बीसीसीआयने उर्वरित वेळापत्रकाची घोषणा केली. त्यानुसार आयपीएलची यंदाच्या हंगामाची फायनल २६ मे रोजी चेन्नई येथे होणार आहे. लोकसभा निवडणुका १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत होणार आहेत.


सोमवारी बीसीसीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ८ एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या सामन्याने पुढच्या टप्प्याची सुरुवात होणार आहे. २६ मे २०२४ रोजी आयपीएलच्या १७व्या हंगामाची अंतिम लढत होणार आहे. हा सामना चेन्नईमध्ये खेळवला जाणार आहे. तब्बल १२ वर्षांनंतर आयपीएलची फायनल चेन्नईत होणार आहे.


क्वालिफायर १ आणि एलिमेटनर हे दोन सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अनुक्रमे २१ मे आणि २२ मे रोजी होणार आहेत. तर क्वालिफायर दोन हा सामना २४ मे रोजी चेन्नईला होणार आहे.

Comments
Add Comment

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही'

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा निर्णय कायम जबलपूर : "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे