महाराष्ट्रात रंगणार राजकीय धुळवड!

तीन-चार दिवसात जाहीर होणार जागावाटपासह उमेदवार


मुंबई : देशासहित राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्व राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे. सध्या राजकीय पक्षांनी जागावाटपांसाठी बैठकांचा धडाका लावला आहे. मात्र, राज्यातील युती, आघाडीचा जागावाटपाचा तिढा कायम असून येत्या २-३ दिवसांत हा तिढा मिटण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुढील २-३ दिवसांत ‘राजकीय धुळवड’ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.


लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांच्या चार याद्या जाहीर केल्या आहेत. भाजपने राज्यातील २० उमेदवार जाहीर केले आहेत. दुसरीकडे काँग्रेसने आतापर्यंत उमेदवारांच्या ३ याद्या जाहीर केल्या आहेत. काँग्रेसने राज्यातील ७ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे इतर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस, भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळते, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती, महाविकास आघाडीच्या जागावाटपासाठी बैठका सुरु आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी होईल का, हे देखील येत्या २-३ दिवसांत स्पष्ट होईल.


महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाला २२, काँग्रेसला १६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाला १० जागा सुटण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा ४ जागांवरून अडल्याचे सांगितले. जात आहे. येत्या दोन-तीन दिवसांत महाविकास आघाडीचा तिढा मिटण्याची शक्यता आहे.


महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय?


महायुतीच्या जागावाटपाचाही तिढा कायम आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप , शिंदे गट आणि अजित पवार गट अनुक्रमे ३१-१३-४ असा महायुतीचा फॉर्म्युला असण्याची शक्यता आहे. तर काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे लवकरच महायुतीमध्ये मनसे देखील सहभागी होण्याची शक्यता आहे. या महायुतीच्या जागावाटपात मनसेला किती जागा मिळतील, हे देखील पहावे लागेल.


देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?


महायुतीच्या प्रमुख नेत्यांची जागावाटपासाठी दिल्लीत महत्वाची बैठक आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला पोहोचले आहेत. या बैठकीसाठी दिल्लीला पोहोचलेल्या देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महायुतीच्या जागावाटपावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘आमचं ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. २० टक्के काम लवकरच पूर्ण करू. बैठकीमध्ये याचा निर्णय होईल. तीन पक्षांचे अंतिम जागावाटप बाकी आहे. येत्या दोन दिवसांत जागावाटप होईल.'


श्रीकांत शिंदे काय म्हणाले?


महायुतीच्या जागावाटपाविषयी खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, ‘महायुतीची जागा वाटप लवकरच होईल आणि उमेदवार देखील लवकरात लवकर जाहीर होईल’.


महाविकास आघाडीच्या जागावाटपावर नाना पटोले काय म्हणाले?


नाना पटोले म्हणाले, 'महाविकास आघाडीची जागावाटपावर चर्चा झाली आहे. वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पक्ष, माकप या पक्षांशी बोलणी सुरु आहे. काँग्रेसचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. सर्व मित्र पक्षांशी चर्चा करून महाविकास आघाडीचे जागावाटप आणि उमेदवार दोन-तीन दिवसांत जाहीर होतील, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

Comments
Add Comment

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर

'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार; मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू