लोकसभेसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्रातील ७ उमेदवार जाहीर, पाहा कोणाला दिलंय तिकीट

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने गुरूवारी दुसरी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील सात जणांचा समावेश करण्यात आला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काँग्रेसच्या लोकसभेसाठी ५७ नावे ठरवण्यात आली. या यादीमध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार, नांदेड, अमरावती, पुणे, सोलापूर, लातूर आणि कोल्हापूर या मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.


पुणे येथून काँग्रेसने आमदार रवींद्र धंगेकर यांना तिकीट दिले आहे. नंदुरबार येथून गोवल के पडवी यांना रिंगणात उतरवले आहे तर नांदेड येथून वसंतराव चव्हाण, अमरावती येथून बलवंत वानखेडे, लातूर येथून शिवाजीराव काळगे, तर कोल्हापूर येथून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोलापूर येथून प्रणिती शिंदे यांना निवडणुकीचे तिकीट देण्यात आले आहे.


काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीच बिगुल वाजले. सात टप्प्यात देशात ही निवडणूक पार पडत आहे. संपूर्ण देशात १९ एप्रिलपासून मतदानाला सुरूवात होईल. सात टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर ४ जूनला मतमोजणी होणार आहे. राज्यात पाच टप्प्यात मतदान होत आहे.


काही दिवसांपूर्वी काँग्रेसने लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केली होती. मात्र त्यात महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश नव्हता.

Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी