लोकसभेसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्रातील ७ उमेदवार जाहीर, पाहा कोणाला दिलंय तिकीट

  82

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने गुरूवारी दुसरी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील सात जणांचा समावेश करण्यात आला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काँग्रेसच्या लोकसभेसाठी ५७ नावे ठरवण्यात आली. या यादीमध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार, नांदेड, अमरावती, पुणे, सोलापूर, लातूर आणि कोल्हापूर या मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.


पुणे येथून काँग्रेसने आमदार रवींद्र धंगेकर यांना तिकीट दिले आहे. नंदुरबार येथून गोवल के पडवी यांना रिंगणात उतरवले आहे तर नांदेड येथून वसंतराव चव्हाण, अमरावती येथून बलवंत वानखेडे, लातूर येथून शिवाजीराव काळगे, तर कोल्हापूर येथून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोलापूर येथून प्रणिती शिंदे यांना निवडणुकीचे तिकीट देण्यात आले आहे.


काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीच बिगुल वाजले. सात टप्प्यात देशात ही निवडणूक पार पडत आहे. संपूर्ण देशात १९ एप्रिलपासून मतदानाला सुरूवात होईल. सात टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर ४ जूनला मतमोजणी होणार आहे. राज्यात पाच टप्प्यात मतदान होत आहे.


काही दिवसांपूर्वी काँग्रेसने लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केली होती. मात्र त्यात महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश नव्हता.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या