लोकसभेसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्रातील ७ उमेदवार जाहीर, पाहा कोणाला दिलंय तिकीट

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने गुरूवारी दुसरी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील सात जणांचा समावेश करण्यात आला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काँग्रेसच्या लोकसभेसाठी ५७ नावे ठरवण्यात आली. या यादीमध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार, नांदेड, अमरावती, पुणे, सोलापूर, लातूर आणि कोल्हापूर या मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.


पुणे येथून काँग्रेसने आमदार रवींद्र धंगेकर यांना तिकीट दिले आहे. नंदुरबार येथून गोवल के पडवी यांना रिंगणात उतरवले आहे तर नांदेड येथून वसंतराव चव्हाण, अमरावती येथून बलवंत वानखेडे, लातूर येथून शिवाजीराव काळगे, तर कोल्हापूर येथून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोलापूर येथून प्रणिती शिंदे यांना निवडणुकीचे तिकीट देण्यात आले आहे.


काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीच बिगुल वाजले. सात टप्प्यात देशात ही निवडणूक पार पडत आहे. संपूर्ण देशात १९ एप्रिलपासून मतदानाला सुरूवात होईल. सात टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर ४ जूनला मतमोजणी होणार आहे. राज्यात पाच टप्प्यात मतदान होत आहे.


काही दिवसांपूर्वी काँग्रेसने लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केली होती. मात्र त्यात महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश नव्हता.

Comments
Add Comment

समृद्धी महामार्गावर खिळे नाही, तर ॲल्युमिनिअम नोजल्स! बेशिस्त कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई

एमएसआरडीसीचे स्पष्टीकरण मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथील समृद्धी महामार्गावर खीळे लावण्यात आल्याचे काही

सागरी मंडळाच्या प्रकल्पांना विविध परवानगी मिळवण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करा

मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या सर्वसंबंधितांना सूचना मुंबई : महाराष्ट्र सागरी महामंडळाच्या

समृद्धी महामार्गावरील निष्काळजीपणानंतर खिळे काढले, वाहतूक पुन्हा सुरळीत

पुणे: नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग हा पुन्हा चर्चेत आला आहे. या महामार्गावर सतत वेगवेगळ्या कारणांमुळे अपघात

बंजारा समाजाचा धडक मोर्चा; मराठा समाजाप्रमाणे बंजारा समाजालाही हैदराबाद गॅझेट लागू करा

सोलापूर : बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून त्यांना अनुसूचित जमाती (एसटी) मधून आरक्षण द्यावे, अशी मागणी

भावी पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी 'नो पीयूसी... नो फ्युएल' उपक्रम राबवणार! म्हणजे नेमकं काय करणार? जाणून घ्या

मुंबई: भविष्यातील पिढीला प्रदूषण मुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतः वर पर्यावरण पूरक काही

मनोज जरांगे यांची आणखी एक नवी मागणी... ओबीसी नेत्यांमध्ये मोठी खळबळ

संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईतील आझाद मैदानात ५ दिवस उपोषण करत, सरकारकडून आपल्या मागण्या पूर्ण