लोकसभेसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्रातील ७ उमेदवार जाहीर, पाहा कोणाला दिलंय तिकीट

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने गुरूवारी दुसरी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील सात जणांचा समावेश करण्यात आला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काँग्रेसच्या लोकसभेसाठी ५७ नावे ठरवण्यात आली. या यादीमध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार, नांदेड, अमरावती, पुणे, सोलापूर, लातूर आणि कोल्हापूर या मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.


पुणे येथून काँग्रेसने आमदार रवींद्र धंगेकर यांना तिकीट दिले आहे. नंदुरबार येथून गोवल के पडवी यांना रिंगणात उतरवले आहे तर नांदेड येथून वसंतराव चव्हाण, अमरावती येथून बलवंत वानखेडे, लातूर येथून शिवाजीराव काळगे, तर कोल्हापूर येथून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोलापूर येथून प्रणिती शिंदे यांना निवडणुकीचे तिकीट देण्यात आले आहे.


काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीच बिगुल वाजले. सात टप्प्यात देशात ही निवडणूक पार पडत आहे. संपूर्ण देशात १९ एप्रिलपासून मतदानाला सुरूवात होईल. सात टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर ४ जूनला मतमोजणी होणार आहे. राज्यात पाच टप्प्यात मतदान होत आहे.


काही दिवसांपूर्वी काँग्रेसने लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केली होती. मात्र त्यात महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश नव्हता.

Comments
Add Comment

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी