Prakash Ambedkar : मविआशी बोलणी फिस्कटल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी धरला 'हा' नवा मार्ग

लोकसभेसाठी वंचित कोणासोबत करणार युती?


मुंबई : वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) देत असलेल्या वागणुकीमुळे नाराज असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज केलेल्या वक्तव्यामुळे या गोष्टीला आणखी पुष्टी मिळाली. 'आमचा चार जागांचा प्रस्ताव वंचितने मान्य केला असता तर नक्की आनंद झाला असता', असं संजय राऊत म्हणाले. युतीबाबत भूतकाळ वापरल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यानंतर संजय राऊतांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत होऊ घातलेली युती फिस्कटल्याचे सर्वांच्या लक्षात आले.


वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी तर दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरील विश्वास उडाला असल्याचे विधान केले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला (Congress) पूर्ण पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. मात्र, आता प्रकाश आंबेडकर मविआचा हात पूर्णपणे सोडून वेगळ्या वाटेवर चालणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याचं कारण म्हणजे वंचितने बीएसआर (BRS) पक्षासोबत युतीच्या चर्चा सुरु केल्या आहेत.


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीआरएस पुन्हा 'अॅक्शन मोड'वर आली आहे. प्रकाश आंबेडकर आणि के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे. केसीआर यांचा निरोप घेऊन मराठवाड्यातील भारत राष्ट्र समितीचे नेते कदीर मौलाना अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला गेले आहेत.


महाविकास आघाडीशी सुरू असलेली बोलणी जवळपास फिस्कटल्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी आता अन्य पर्याय शोधण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी बीआरएस वंचितसोबत युती करण्यास इच्छुक असल्याचं कळतंय. मराठवाड्यातील बीआरएसचे नेते कदीर मौलाना यांनी आंबेडकरांची अकोल्यात भेट घेतली. कदीर यांच्यामार्फत केसीआर यांनी आंबेडकरांसमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी आंबेडकरांना दोन मोठ्या शासकीय कार्यक्रमांना देखील निमंत्रित केलं होतं. त्यामुळे आता भविष्यात बीसीआर-वंचित आघाडीची युती होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर

'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार; मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू