Prakash Ambedkar : मविआशी बोलणी फिस्कटल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी धरला 'हा' नवा मार्ग

लोकसभेसाठी वंचित कोणासोबत करणार युती?


मुंबई : वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) देत असलेल्या वागणुकीमुळे नाराज असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज केलेल्या वक्तव्यामुळे या गोष्टीला आणखी पुष्टी मिळाली. 'आमचा चार जागांचा प्रस्ताव वंचितने मान्य केला असता तर नक्की आनंद झाला असता', असं संजय राऊत म्हणाले. युतीबाबत भूतकाळ वापरल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यानंतर संजय राऊतांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत होऊ घातलेली युती फिस्कटल्याचे सर्वांच्या लक्षात आले.


वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी तर दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरील विश्वास उडाला असल्याचे विधान केले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला (Congress) पूर्ण पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. मात्र, आता प्रकाश आंबेडकर मविआचा हात पूर्णपणे सोडून वेगळ्या वाटेवर चालणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याचं कारण म्हणजे वंचितने बीएसआर (BRS) पक्षासोबत युतीच्या चर्चा सुरु केल्या आहेत.


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीआरएस पुन्हा 'अॅक्शन मोड'वर आली आहे. प्रकाश आंबेडकर आणि के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे. केसीआर यांचा निरोप घेऊन मराठवाड्यातील भारत राष्ट्र समितीचे नेते कदीर मौलाना अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला गेले आहेत.


महाविकास आघाडीशी सुरू असलेली बोलणी जवळपास फिस्कटल्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी आता अन्य पर्याय शोधण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी बीआरएस वंचितसोबत युती करण्यास इच्छुक असल्याचं कळतंय. मराठवाड्यातील बीआरएसचे नेते कदीर मौलाना यांनी आंबेडकरांची अकोल्यात भेट घेतली. कदीर यांच्यामार्फत केसीआर यांनी आंबेडकरांसमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी आंबेडकरांना दोन मोठ्या शासकीय कार्यक्रमांना देखील निमंत्रित केलं होतं. त्यामुळे आता भविष्यात बीसीआर-वंचित आघाडीची युती होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

पुण्यात गुरुवारी पाणीबाणी, पाणी जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन

पुणे : पुणे शहरातील जलकेंद्रांच्या दुरुस्ती कामामुळे गुरुवार २० नोव्हेंबर रोजी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद

Maharashtra Cabinet Meeting : एकाच बैठकीत ६ मोठे निर्णय! परवडणारी घरे उपलब्ध होणार; फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात 'म्हाडा पुनर्विकास' धोरणावर शिक्कामोर्तब

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज, १८ नोव्हेंबर रोजी, राज्य मंत्रिमंडळाची

Hinjewadi Accident News : डंपरच्या जोरदार धडकेत बापलेकीची ताटातूट! मुलीचा जागीच मृत्यू, वडील जखमी; हिंजवडी हादरले

हिंजवडी : पुण्यातील हिंजवडी आयटी परिसरात (Hinjewadi Accident News) अवजड वाहनांच्या अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, काल

Suraj Chavan New House : 'गुलिगत किंग' बनला 'गृहस्थ'! भव्य हॉल, आकर्षक इंटिरिअर अन्... सूरज चव्हाणच्या हक्काच्या घराची 'पहिली झलक' पहाचं!

मुंबई : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातून घराघरात पोहोचलेले लोकप्रिय नाव म्हणजे सूरज चव्हाण. आपल्या खास "झापूक

Ladki Bahin Yojana E- KYC : लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! E-KYC ला ४३ दिवसांची मुदतवाढ, काय आहे संपूर्ण प्रक्रिया? वाचा

मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' (Majhi Ladki Bahin Yojna) अंतर्गत सुरू असलेल्या ई-केवायसी (E-KYC) प्रक्रियेसाठी सरकारने

इलेक्ट्रिक एसटी बसला राज्यातील द्रुतगती मार्गांवर टोलमाफी

मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याचा ई-शिवाई बसला फायदा मुंबई  : राज्य परिवहन महामंडळाच्या ई-बसला द्रुतगती