Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना EDने केली अटक

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल(arvind kejriwal) यांना केंद्रीय तपास विभाग ईडीने दारू घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. ईडीने केजरीवाल यांची तब्बल दोन तास चौकशी केली आणि यानंतर त्यांची टीम त्यांना घेऊन ईडी कार्यालयात पोहोचली.


स्वतंत्र भारताच्या इतिहासात हे पहिले प्रकरण आहे जेव्हा मुख्यमंत्री असताना एखाद्या नेत्याला केंद्रीय तपास विभागाने अटक केली आहे.


आपने स्पष्ट केले की अटकेनंतरही केजरीवाल आपल्या पदाचा राजीनामा देणार नाहीत. सोबतच पक्षानेही या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपने म्हटले की निवडणुकीमुळे ही अटक झाली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचा झटका बसल्यानंतर ईडीची टीम गुरूवारी संध्याकाळी सात वाजता केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचली. या दरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.



राजीनामा देणार नाहीत केजरीवाल


अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षाने स्पष्ट केले की केजरीवाल मुख्यमंत्रीपदावर कायम राहतील.मंत्री आतिशी म्हणाल्या की केजरीवाल मुख्यमंत्री होते, आहेत आणि राहतील. त्यांनी सांगितले की अरविंद केजरीवाल एक विचार आहे त्यांना संपवले जाऊ शकत नाही.


या प्रकरणात ईडीची ही चौथी मोठी कारवाई आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आधी ईडीने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांना अटक केली आहे. नुकत्याच ईडीच्या टीमने या संबंधित प्रकरणात बीआरएसचे नेता कविता यांना अटक केली होती.

Comments
Add Comment

PM Kisan Yojana : बिहारमध्ये 'विजयाच्या त्सुनामी'नंतर PM मोदींचं मोठं गिफ्ट! ११ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे

बिहार : बिहार निवडणुकीत एनडीएच्या भव्य विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर

Nowgam Police Station Blast : चार दिवसांत देशाला दुहेरी धक्का! श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्टेशन स्फोटाचे नेमकं कारण काय?

श्रीनगर : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी, १० नोव्हेंबर रोजी i-२० कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात १२ जणांचा

बिहारमध्ये भाजप अव्वल, महाराष्ट्रासह १३ राज्यांवर भाजपची सत्ता! जाणून घ्या सविस्तर...

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर आघाडी घेतल्याने एनडीएचा दणदणीत विजय झाला.

Maithili Thakur Win Bihar Election 2025 : वय फक्त २५… अन् ११ हजारांच्या आघाडीने विक्रमी विजय; बिहारला मिळाली सर्वात तरुण आमदार! काय म्हणाली मैथिली?

पटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत २०२५ (Bihar Election Result 2025) मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) एकतर्फी वर्चस्व

मोदींचा विरोधकांवर थेट हल्लाबोल, येत्या काळात काँग्रेसमध्ये पडू शकते फुट?

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर दणदणीत विजय मिळला. तर बिहारमधील २४३ जागांपैकी