राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा युगेंद्र पवारांना घेराव

  71

बारामतीमधील प्रतिष्ठेचे राजकारण रस्त्यावर उतरले


पुणे : लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच राजकीय पक्षांच्या प्रचारालाही सुरुवात झाली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा पवारविरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. त्यात अजित पवारांविरोधात त्यांच्या घरातील सख्ख्या भावासह इतर मंडळी उतरली आहेत. त्यात आता अजित पवारांची सोशल मीडियावर होणारी बदनामी पाहून काही कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना घेराव घातला.


युगेंद्र पवार हे श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना घेराव घालत अजितदादांची सोशल मीडियात बदनामी करणाऱ्यांना आवर घाला अशी मागणी त्यांनी केली. त्यावेळी युगेंद्र पवार यांनी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करू असं आश्वासन दिले. सोशल मीडियात श्रीनिवास पवारांचे भाषण सध्या व्हायरल होतंय. त्यामुळे अजितदादा समर्थक जाब विचारण्यासाठी आले होते.


युगेंद्र पवार सध्या सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात गावभेटी दौरा करत आहेत. तर पवार कुटुंबातील इतर मंडळीही सुप्रिया सुळेंच्या प्रचारात गुंतले आहेत. त्यात नुकतेच अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी काही गावकऱ्यांशी संवाद साधला. त्या संवादात श्रीनिवास पवारांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली. त्यानंतर माध्यमांमध्ये हा व्हिडिओ समोर आला. तेव्हापासून बारामतीत अजित पवारांचे कार्यकर्ते आणि शरद पवारांचे कार्यकर्ते यांच्यात कुरघोडी सुरू असल्याचे बोलले जाते.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या