Bank: बँकेची कामे राहिली आहेत का? तर हे नक्की वाचा

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार रविवारी ३१ मार्चलाही बँका सुरू राहणार आहेत. आरबीआयने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ट्वीट तर या निर्णयाची माहिती दिली. केंद्रीय बँकेने म्हटले की ३१ मार्च २०२४ला रविवार असतानाही सर्व बँका सुरू राहतील. चालू आर्थिक वर्ष २०२३-२४चा शेवटचा दिवस असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.


आरबीआयने म्हटले की ३१ मार्चला आर्थिक वर्षाची समाप्ती आहे. यासाठी सर्व बँका खुल्या राहतील. सर्व बँकांना पाठवलेल्या आदेशामध्ये म्हटले आहे की आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत होणारे व्यवहार त्याच दिवशी दिसले पाहिजे यासाठी सर्व बँकांना रविवारच्या दिवशी काम करण्यास सांगितले आहे. सर्व बँक ३१ मार्चला रविवारी आपल्या नियमित वेळेत उघडतील आणि बंद होतील. शनिवारीही सर्व बँका सुरू राहतील. याशिवाय एनईएफटी आणि आरटीजीएसचे व्यवहारही रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहतील. याशिवाय सरकारी चेक क्लिअरिंगसाठीही विशेष सोय केले जाईल. दरम्यान, स्टॉक मार्केट बंद राहील.



इनकम टॅक्स ऑफिसही सुरू राहणार


याआधी इनकम टॅक्स विभागानेही आपली सर्व कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. विभागाने गुड फ्रायडेच्या सुट्टीसहित शनिवारी आणि रविवारची सुट्टीही रद्द केली होती. इनकम टॅक्स विभागाने गुड फ्रायडेमुळे या महिन्यात येणाऱ्या लाँग वीकेंडला रद्द केले होते. गुड फ्रायडे २९ मार्चला आहे. ३० मार्चला शनिवार आणि ३१ मार्चला रविवार आहे. यासाठी ३ दिवसांची मोठी सुट्टी येत होती. मात्र इतकी सुट्टी असल्यास अनेक कामे रखडणार होती. त्यामुळे ही संपूर्ण सुट्टी रद्द करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू