महायुतीत सामील होणार मनसे? राज ठाकरे दिल्लीत

नवी दिल्ली: राज ठाकरेंच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना(MNS) लोकसभा निवडणुकीच्या(Loksabha Election 2024) आधी भाजपच्या नेतृत्वातील एनडीएमध्ये सामील होऊ शकते. असे म्हटले जात आहे की दोन्ही पक्षांदरम्यान गठबंधनावर चर्चा सुरू आहे. सोमवारी मनसे प्रमुख राज ठाकरे मुंबईवरून दिल्लीत पोहोचले. अशाही शक्यता व्यक्त केल्या जात आहेत की मनसे आगामी लोकसभा निवडणुकीसाठा सत्तारूढ असलेल्या पक्षाकडून एक अथवा दोन जागेची मागणी करत आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार, मनसेची नजर महाराष्ट्रातील दक्षिण मुंबई आणि शिर्डी लोकसभेवर आहे. यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशभाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही दिल्लीत आहेत. भाजप तसेच मनसे हे दोनही पक्ष हिंदुत्वाच्या विचारधारेवर विश्वास ठेवतात. त्यामुळेत ते एकत्र येण्यासाठी इच्छुक आहे.


याआधी २०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मनसेने एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला नव्हता. मात्र राज्यात अनेक ठिकाणी भाजपविरोधात प्रचार केला होता.


काही दिवसांपूर्वी मनसेची महायुतीत सामील होण्याच्या चर्चा सुरू असतानाच मुंबईचे भाजप प्रमुख आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची त्यांच्या शिवाजी पार्क येथील घरात भेट घेतली होती. याआधी फेब्रुवारी महिन्यादरम्यान, मनसे नेत्यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सरकारी निवासस्थानी जात भेट घेतली होती.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात