Thackeray Vs Shinde : निवडणुका जाहीर झाल्यानंतरही ठाकरे गटाला धक्का! आणखी एका आमदाराने सोडली साथ

मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत करणार प्रवेश


नंदुरबार : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तारखा जाहीर झाल्या असून आता आचारसंहिताही (Code of conduct) लागू झाली आहे. त्यामुळे सर्व पक्ष निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करत आहेत. मात्र, या सगळ्यात ठाकरे गटाला (Thackeray group) अजूनही धक्के पचवावे लागत आहेत. शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून अनेकांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची साथ दिली. यानंतर आता पुन्हा एकदा एका आमदाराने ठाकरेंची साथ सोडली आहे. ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी हे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.


आमश्या पाडवी हे ठाकरे गटाचे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी चेहरा आहेत. आज आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईला पक्षप्रवेशासाठी जात असल्याचा व्हिडिओ त्यांनी आपल्या सोशल मिडीया इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेला आहे. त्यांच्या अधिकृत पेजवरसुद्धा हा व्हिडिओ शेअर करण्यात आल्यामुळे ते शिवसेनेत जाणार असल्याचं निश्चित झालं आहे.


आमश्या पाडवी गेल्या अनेक वर्षांपासून ते शिवसेनेत आहेत. पक्षफुटीनंतर ते ठाकरे गटात राहिले. नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना पक्ष तळागाळात पोहचवण्यासाठी त्यांनी मोठे कष्ट घेतले. २०२२ साली झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी आमश्या पाडवी यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली. मात्र, आज आमदार आमश्या पाडवी यांच्यासोबत नंदुरबार जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती गणेश पराडके तसेच जिल्ह्यातील ठाकरे गटातील अनेक मोठे चेहरे हे शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत.


महाविकास आघाडीत नंदुरबार लोकसभेची जागा काँग्रेसला सुटणार असून मविआचा घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाचे आमश्या पाडवी हे देखील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी नंदुरबार लोकसभेसाठी तिकिटाची मागणी केली होती. मात्र मविआकडून तिकीट मिळत नसल्याने ते नाराज होते. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांसोबत आज मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आता त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन