Thackeray Vs Shinde : निवडणुका जाहीर झाल्यानंतरही ठाकरे गटाला धक्का! आणखी एका आमदाराने सोडली साथ

  160

मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत करणार प्रवेश


नंदुरबार : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तारखा जाहीर झाल्या असून आता आचारसंहिताही (Code of conduct) लागू झाली आहे. त्यामुळे सर्व पक्ष निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करत आहेत. मात्र, या सगळ्यात ठाकरे गटाला (Thackeray group) अजूनही धक्के पचवावे लागत आहेत. शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून अनेकांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची साथ दिली. यानंतर आता पुन्हा एकदा एका आमदाराने ठाकरेंची साथ सोडली आहे. ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी हे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.


आमश्या पाडवी हे ठाकरे गटाचे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी चेहरा आहेत. आज आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईला पक्षप्रवेशासाठी जात असल्याचा व्हिडिओ त्यांनी आपल्या सोशल मिडीया इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेला आहे. त्यांच्या अधिकृत पेजवरसुद्धा हा व्हिडिओ शेअर करण्यात आल्यामुळे ते शिवसेनेत जाणार असल्याचं निश्चित झालं आहे.


आमश्या पाडवी गेल्या अनेक वर्षांपासून ते शिवसेनेत आहेत. पक्षफुटीनंतर ते ठाकरे गटात राहिले. नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना पक्ष तळागाळात पोहचवण्यासाठी त्यांनी मोठे कष्ट घेतले. २०२२ साली झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी आमश्या पाडवी यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली. मात्र, आज आमदार आमश्या पाडवी यांच्यासोबत नंदुरबार जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती गणेश पराडके तसेच जिल्ह्यातील ठाकरे गटातील अनेक मोठे चेहरे हे शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत.


महाविकास आघाडीत नंदुरबार लोकसभेची जागा काँग्रेसला सुटणार असून मविआचा घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाचे आमश्या पाडवी हे देखील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी नंदुरबार लोकसभेसाठी तिकिटाची मागणी केली होती. मात्र मविआकडून तिकीट मिळत नसल्याने ते नाराज होते. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांसोबत आज मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आता त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित