Thackeray Vs Shinde : निवडणुका जाहीर झाल्यानंतरही ठाकरे गटाला धक्का! आणखी एका आमदाराने सोडली साथ

  164

मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत करणार प्रवेश


नंदुरबार : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तारखा जाहीर झाल्या असून आता आचारसंहिताही (Code of conduct) लागू झाली आहे. त्यामुळे सर्व पक्ष निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करत आहेत. मात्र, या सगळ्यात ठाकरे गटाला (Thackeray group) अजूनही धक्के पचवावे लागत आहेत. शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून अनेकांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची साथ दिली. यानंतर आता पुन्हा एकदा एका आमदाराने ठाकरेंची साथ सोडली आहे. ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी हे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.


आमश्या पाडवी हे ठाकरे गटाचे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी चेहरा आहेत. आज आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईला पक्षप्रवेशासाठी जात असल्याचा व्हिडिओ त्यांनी आपल्या सोशल मिडीया इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेला आहे. त्यांच्या अधिकृत पेजवरसुद्धा हा व्हिडिओ शेअर करण्यात आल्यामुळे ते शिवसेनेत जाणार असल्याचं निश्चित झालं आहे.


आमश्या पाडवी गेल्या अनेक वर्षांपासून ते शिवसेनेत आहेत. पक्षफुटीनंतर ते ठाकरे गटात राहिले. नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना पक्ष तळागाळात पोहचवण्यासाठी त्यांनी मोठे कष्ट घेतले. २०२२ साली झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी आमश्या पाडवी यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली. मात्र, आज आमदार आमश्या पाडवी यांच्यासोबत नंदुरबार जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती गणेश पराडके तसेच जिल्ह्यातील ठाकरे गटातील अनेक मोठे चेहरे हे शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत.


महाविकास आघाडीत नंदुरबार लोकसभेची जागा काँग्रेसला सुटणार असून मविआचा घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाचे आमश्या पाडवी हे देखील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी नंदुरबार लोकसभेसाठी तिकिटाची मागणी केली होती. मात्र मविआकडून तिकीट मिळत नसल्याने ते नाराज होते. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांसोबत आज मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आता त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक