Nanded Accident : बाप-लेकाच्या मृत्यूमुळे गाढे कुटुंबियांवर कोसळला दुखाःचा डोंगर

  87

रुग्णालयात उपचारासाठी जात असतानाच झाला अपघात


नांदेड : रुग्णालयात उपचारासाठी जात असतानाच नांदेडच्या (Nanded) गाढे बाप-लेकावर काळाने घाला घातला. नांदेड-नागपूर राष्ट्रीय मार्गावरून जाणाऱ्या त्यांच्या दुचाकीला समोरुन येत असलेल्या भरधाव आयसर ट्रकने जोरदार धडक दिली आणि अपघात झाला. या अपघातात दोघांनाही प्राण गमवावे लागले आहेत. आज सकाळच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस (Nanded Police) करत आहेत.


अर्धापूर तालुक्यातील भोगाव येथील दाजीबा शंकरराव गाढे (वय ६५ वर्षे) यांचा मोठा मुलगा गोपीनाथ दाजीबा गाढे (वय ४० वर्षे) हे आपल्या वडिलांना वैद्यकीय तपासणीसाठी नांदेड येथील खाजगी रुग्णालयात घेऊन जात होते. दरम्यान, असना पुलावर नांदेड-अर्धापूर मार्गे भरधाव जाणाऱ्या आयसरने (ट्रक क्रमांक एम.एच.४५ ए.ई-८८११) त्यांच्या दुचाकीला समोरासमोर येत जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात दाजीबा गाढे हे असना पुलावरून ४५ ते ५० फूट उंचीवरून खाली पडले, तर मुलगा गोपीनाथ गंभीर जखमी झाला व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


अपघात घडल्यानंतर या महामार्गावर एकच गर्दी झाली. उपस्थितांपैकी गोविंद टेकाळे यांनी अपघाताची माहिती महामार्ग पोलिसांना दिली. त्यानंतर अपघातस्थळाच्या हद्दीतील विमानतळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. सोबतच, नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रुग्णवाहिका देखील दाखल झाली. दोन्ही जखमींना तात्काळ नांदेड येथील शासकीय रुग्णालय दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील दोघाही कर्त्या पितापुत्राचा अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्याने गाढे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली