Nanded Accident : बाप-लेकाच्या मृत्यूमुळे गाढे कुटुंबियांवर कोसळला दुखाःचा डोंगर

  92

रुग्णालयात उपचारासाठी जात असतानाच झाला अपघात


नांदेड : रुग्णालयात उपचारासाठी जात असतानाच नांदेडच्या (Nanded) गाढे बाप-लेकावर काळाने घाला घातला. नांदेड-नागपूर राष्ट्रीय मार्गावरून जाणाऱ्या त्यांच्या दुचाकीला समोरुन येत असलेल्या भरधाव आयसर ट्रकने जोरदार धडक दिली आणि अपघात झाला. या अपघातात दोघांनाही प्राण गमवावे लागले आहेत. आज सकाळच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस (Nanded Police) करत आहेत.


अर्धापूर तालुक्यातील भोगाव येथील दाजीबा शंकरराव गाढे (वय ६५ वर्षे) यांचा मोठा मुलगा गोपीनाथ दाजीबा गाढे (वय ४० वर्षे) हे आपल्या वडिलांना वैद्यकीय तपासणीसाठी नांदेड येथील खाजगी रुग्णालयात घेऊन जात होते. दरम्यान, असना पुलावर नांदेड-अर्धापूर मार्गे भरधाव जाणाऱ्या आयसरने (ट्रक क्रमांक एम.एच.४५ ए.ई-८८११) त्यांच्या दुचाकीला समोरासमोर येत जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात दाजीबा गाढे हे असना पुलावरून ४५ ते ५० फूट उंचीवरून खाली पडले, तर मुलगा गोपीनाथ गंभीर जखमी झाला व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


अपघात घडल्यानंतर या महामार्गावर एकच गर्दी झाली. उपस्थितांपैकी गोविंद टेकाळे यांनी अपघाताची माहिती महामार्ग पोलिसांना दिली. त्यानंतर अपघातस्थळाच्या हद्दीतील विमानतळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. सोबतच, नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रुग्णवाहिका देखील दाखल झाली. दोन्ही जखमींना तात्काळ नांदेड येथील शासकीय रुग्णालय दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील दोघाही कर्त्या पितापुत्राचा अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्याने गाढे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या