Nanded Accident : बाप-लेकाच्या मृत्यूमुळे गाढे कुटुंबियांवर कोसळला दुखाःचा डोंगर

रुग्णालयात उपचारासाठी जात असतानाच झाला अपघात


नांदेड : रुग्णालयात उपचारासाठी जात असतानाच नांदेडच्या (Nanded) गाढे बाप-लेकावर काळाने घाला घातला. नांदेड-नागपूर राष्ट्रीय मार्गावरून जाणाऱ्या त्यांच्या दुचाकीला समोरुन येत असलेल्या भरधाव आयसर ट्रकने जोरदार धडक दिली आणि अपघात झाला. या अपघातात दोघांनाही प्राण गमवावे लागले आहेत. आज सकाळच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस (Nanded Police) करत आहेत.


अर्धापूर तालुक्यातील भोगाव येथील दाजीबा शंकरराव गाढे (वय ६५ वर्षे) यांचा मोठा मुलगा गोपीनाथ दाजीबा गाढे (वय ४० वर्षे) हे आपल्या वडिलांना वैद्यकीय तपासणीसाठी नांदेड येथील खाजगी रुग्णालयात घेऊन जात होते. दरम्यान, असना पुलावर नांदेड-अर्धापूर मार्गे भरधाव जाणाऱ्या आयसरने (ट्रक क्रमांक एम.एच.४५ ए.ई-८८११) त्यांच्या दुचाकीला समोरासमोर येत जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात दाजीबा गाढे हे असना पुलावरून ४५ ते ५० फूट उंचीवरून खाली पडले, तर मुलगा गोपीनाथ गंभीर जखमी झाला व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


अपघात घडल्यानंतर या महामार्गावर एकच गर्दी झाली. उपस्थितांपैकी गोविंद टेकाळे यांनी अपघाताची माहिती महामार्ग पोलिसांना दिली. त्यानंतर अपघातस्थळाच्या हद्दीतील विमानतळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. सोबतच, नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रुग्णवाहिका देखील दाखल झाली. दोन्ही जखमींना तात्काळ नांदेड येथील शासकीय रुग्णालय दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील दोघाही कर्त्या पितापुत्राचा अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्याने गाढे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

धक्कादायक! एसटीचे ७ कर्मचारी दारू पिऊन ड्युटीवर!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कारवाईचा बडगा मुंबई : अचानक केलेल्या तपासणीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना