Loksabha Election : उद्या जाहीर होणार लोकसभा निवडणुकीच्या तारखा!

  85

निवडणूक आयोगाची उद्या महत्त्वाची पत्रकार परिषद


नवी दिल्ली : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) वारे वाहत आहेत. ही निवडणूक नेमकी कधी असणार याबाबत राजकीय पक्षांसह (Political Parties) जनताही उत्सुक आहे. याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता सर्वांचीच प्रतिक्षा संपली असून उद्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. त्यासंबंधी काही महत्त्वाच्या घोषणा करण्यासाठी निवडणूक आयोगाने (Election Commission of India) उद्या दुपारी ३ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.


लोकसभेच्या निवडणुका यावेळी ६ ते ७ टप्प्यात घेतल्या जातील असा अंदाज आहे. निवडणुका जाहीर होताच संपूर्ण देशात आचारसंहिताही (Code of Conduct) लागू होणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) 'दोन दिवसात आचारसंहिता लागू शकते' असं वक्तव्य केलं होतं, ते खरं ठरणार आहे. उद्या दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.


लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम आणि काही विधानसभा यांची घोषणा १६ मार्चला केली जाणार आहे. या कार्यक्रमानंतर निवडणुकीच्या राजकीय लढाईचे टप्पे जाहीर होतील. उद्या निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेकडे देशाचं लक्ष असणार आहे.



सुमारे ९७ कोटी लोक मतदान करणार


२०१९ मध्ये लोकसभा निवडणुका सात टप्प्यात पार पडल्या. गेल्या वेळी निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी तारखा जाहीर केल्या होत्या. पहिल्या टप्प्याचे मतदान ११ एप्रिलला तर शेवटच्या टप्प्यासाठी १९ मे रोजी मतदान झाले. २३ मे रोजी निकाल लागला. त्या निवडणुकीच्या वेळी देशात ९१ कोटींहून अधिक मतदार होते, त्यापैकी ६७ टक्के मतदारांनी मतदान केले होते. यावेळी लोकसभा निवडणुकीत सुमारे ९७ कोटी लोक मतदान करणार आहेत. यावेळी निवडणुकीत भ्रष्टाचार रोखण्यासाठी अनेक नवी पावले उचलली जातील, असा दावा आयोगाने केला आहे.


Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके