Loksabha Election : उद्या जाहीर होणार लोकसभा निवडणुकीच्या तारखा!

निवडणूक आयोगाची उद्या महत्त्वाची पत्रकार परिषद


नवी दिल्ली : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) वारे वाहत आहेत. ही निवडणूक नेमकी कधी असणार याबाबत राजकीय पक्षांसह (Political Parties) जनताही उत्सुक आहे. याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता सर्वांचीच प्रतिक्षा संपली असून उद्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. त्यासंबंधी काही महत्त्वाच्या घोषणा करण्यासाठी निवडणूक आयोगाने (Election Commission of India) उद्या दुपारी ३ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.


लोकसभेच्या निवडणुका यावेळी ६ ते ७ टप्प्यात घेतल्या जातील असा अंदाज आहे. निवडणुका जाहीर होताच संपूर्ण देशात आचारसंहिताही (Code of Conduct) लागू होणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) 'दोन दिवसात आचारसंहिता लागू शकते' असं वक्तव्य केलं होतं, ते खरं ठरणार आहे. उद्या दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.


लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम आणि काही विधानसभा यांची घोषणा १६ मार्चला केली जाणार आहे. या कार्यक्रमानंतर निवडणुकीच्या राजकीय लढाईचे टप्पे जाहीर होतील. उद्या निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेकडे देशाचं लक्ष असणार आहे.



सुमारे ९७ कोटी लोक मतदान करणार


२०१९ मध्ये लोकसभा निवडणुका सात टप्प्यात पार पडल्या. गेल्या वेळी निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी तारखा जाहीर केल्या होत्या. पहिल्या टप्प्याचे मतदान ११ एप्रिलला तर शेवटच्या टप्प्यासाठी १९ मे रोजी मतदान झाले. २३ मे रोजी निकाल लागला. त्या निवडणुकीच्या वेळी देशात ९१ कोटींहून अधिक मतदार होते, त्यापैकी ६७ टक्के मतदारांनी मतदान केले होते. यावेळी लोकसभा निवडणुकीत सुमारे ९७ कोटी लोक मतदान करणार आहेत. यावेळी निवडणुकीत भ्रष्टाचार रोखण्यासाठी अनेक नवी पावले उचलली जातील, असा दावा आयोगाने केला आहे.


Comments
Add Comment

भारताची अमेरिकेला निर्यात थांबणार?

अमेरिकेकडून रशियावर ५०० टक्के आयात कर ब्राझिल आणि चीनलाही इशारा पुतिन निष्पाप लोकांची हत्या करत असल्याचा

देशातील पहिल्या ‘डिजिटल जनगणने’ला एक एप्रिलपासून सुरुवात

नवी दिल्ली : भारत सरकार २०२७ मध्ये जनगणना करणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा, म्हणजेच घरांची यादी बनवण्याचे काम, १

तामिळनाडूतील निवडणुकीसाठी भाजपची ५६ जागा आणि ३ मंत्रिपदांची मागणी

चेन्नई  : भाजपने मागील वर्षी तामिळनाडूत जयललिता यांचा पक्ष एआयडिएमके यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक

तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड

नवी दिल्ली  : पश्चिम बंगालच्या राजकारणात गुरुवारी पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे मोठी खळबळ

पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत ३ वर्षांची सवलत

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पोलीस दलात भरती होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी योगी सरकारने नववर्षाची

चलन निर्मितीत मोठा बदल; चलन कागदनिर्मिसाठी अत्याधुनिक तंत्र कार्यन्वयित

मुंबई : भारताच्या चलनात नाण्यांप्रमाणे कागदी नोटांनाही तितकेच महत्व आहे. पाचशे, दोन हजार यांसारख्या अनेक नोटा आज