BJPने दोन राजघराण्यातील वंशजांना दिले तिकीट, त्रिपुराची महाराणी आणि मैसूरचे राजा पहिल्यांदा लढवणार निवडणूक

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. या दुसऱ्या यादीत दोन राजघराण्यातील वंशजांच्या नावांचा समावेश आहे. ७२ उमेदवारांच्या या लिस्टमध्ये त्रिपुराची महाराणी कृती सिंह देववर्मा आणि मैसूर शाही कुटुंबाचे प्रमुख यदुवीर कृष्णदत्त चामराज वाडियार यांच्या नावाचा समावेश आहे. भाजपने कृती सिंह देववर्मा यांना त्रिपुरा पूर्व येथून मैदानात उतरवले आहे तर वाडियार राजवंशाचे राजा मैसूर येथून निवडणूक लढवतील.


भाजपने आतापर्यंतच्या दोन्ही यादी मिळून एकूण २६७ नावांची घोषणा केली आहे. दरम्यान, यातील २ उमेदवारांनी आपले नाव मागे घेतले आहे. आतापर्यंत पक्षाने दोन्ही उमेदवारांच्या जागी दुसऱ्या कोणाचीही घोषणा केलेली नाही. भाजपने उमेदवारांची जी दुसरी यादी जाहीर केली त्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक येथून प्रत्येकी २०, हरयाण आणि तेलंगणा येथून प्रत्येकी ६, मध्य प्रदेशमधील ५, दिल्ली, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश येथून प्रत्येकी २, त्रिपुरा, दादरा नगर हवेली येथून प्रत्येकी १ उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.



कोण आहेत महाराणी कृती सिंह


महाराणी कृती सिंह देववर्मा टिपरा मोथा पक्षाचे संस्थापक आणि त्रिपुरा शाही कुटुंबाचे प्रमुख मणिक्य देववर्मा यांच्या मोठ्या बहीण आहेत. तया आगामी लोकसभा निव़णुकीत पहिल्यांदा मैदानात उतरत आहे. दरम्यान, त्यांचे आई-वडिल राजकारणात सक्रिय होते आणि काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. त्यांचे वडील किरीट विक्रम देववर्मा तीन वेळा खासदार होते. तसेच त्यांची आई कुमारी देवी दोन वेळा काँग्रेसच्या आमदार होते.



मैसूरचे शाही २७वे राजे यदुवीर


भाजपच्या दुसऱ्या यादीत सामील असलेले दुसरे नाव मैूसरचे शाही कुटुंबातील यदुवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार आहेत. ३२ वर्षीय यदुवीर जयरामचंद्र वाडियार यांचे नातू आहेत. जयरामचंद्र वाडियार मैसूरचे २५वे आणि शेवटचे राजा होते.

Comments
Add Comment

उड्डाणानंतर दिल्ली - मुंबई विमानात बिघाड, इंजिन हवेतच पडलं बंद

नवी दिल्ली : दिल्लीहून मुंबईकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात उड्डाणानंतर अवघ्या ४० मिनिटांत तांत्रिक

"दिपू दासच्या मृत्यूला जबाबदार कोण?" बंगालमधील हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कोलकाता : भारतीय राजकारणात पश्चिम बंगाल हे नेहमीच संघर्षाचे केंद्र राहिले आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी

माजी अग्निवीरांना सीमा सुरक्षा दलातील भरतीत ५० टक्के कोटा

मोदी सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली : माजी अग्निवीरांना आता सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) ५० टक्के कोटा निश्चित

विवाह हे केवळ शारीरिक संतुष्टीचे साधन नव्हे...

‘लिव्ह-इन रिलेशनशिप’वर सरसंघचालक मोहन भागवत यांचे स्पष्ट मत कोलकाता : "कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक

रेल्वे प्रवासभाड्यात वाढ

२६ डिसेंबरपासून अंमलबजावणी नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने रेल्वे प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार