राम मंदिरातील आरतीचे दूरदर्शन करणार थेट प्रेक्षपण

नवी दिल्ली : दूरदर्शनने सांगितले की, “डीडी नॅशनल दररोज सकाळी ६.३० वाजता होणारी रामलल्लाची ‘आरती’ थेट प्रसारित करणार आहे.


केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, “प्रभू रामाच्या भक्तांची अपार श्रद्धा लक्षात घेऊन ही सुविधा दिली जाणार आहे. आता, तुम्हाला दररोज घरबसल्या प्रभू श्री रामाचे दर्शन घेता येईल,” ठाकूर यांनी एक्स वर पोस्ट केले की, “रामभक्तांची भगवान श्री रामावरील अपारश्रद्धा लक्षात घेऊन, प्रसार भारतीने हा निर्णय घेतला आहे. ही खूप मोठी सुविधा आहे.”


दूरदर्शवर दररोज धार्मिक कार्यक्रम प्रसारित करण्यामागील तर्काबद्दल माहिती देताना प्रसार भारतीचे सीईओ गौरव द्विवेदी म्हणाले की, दूरदर्शनवर वेळोवेळी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दिनदर्शिकेनुसार कार्यक्रम चालवले जातात. आता, रामनवमी जवळ आली आहे आणि राममंदिराच्या उद्घाटनानंतर, आरती प्रसारित करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे आम्हाला वाटले. या दृष्टीकोनामुळे आम्ही (श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र) ट्रस्टला त्यासाठी विनंती केली आणि त्यांनी संमती दिली. सुरुवातीला प्रसार भारती काही महिन्यांसाठी “मंगल आरती” प्रसारित करेल आणि नंतर ती पुढे कशी न्यावी यावर राम मंदिर ट्रस्ट निर्णय घेईल.


अयोध्येमधील राममंदिरमध्ये दि. २२ जानेवारी रोजी प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

स्मशानभूमीत जळत्या चितेशेजारी मुलांचा अभ्यास

अनोख्या शाळेची देशभरात चर्चा बिहार : सर्वसाधारणपणे शाळा म्हटलं की वर्ग येतात, कॅन्टीन असतं, मुलांना खेळायला

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याकडून भाजप, आरएसएसचे कौतुक!

जुना फोटो शेअर करत म्हणाले, ‘हीच संघटनेची शक्ती…’ नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार

देशात मल्टी-डोअर न्यायालये असावीत, विवादांची सुनावणी नको, ते सोडवावेत

गोव्यात 'मध्यस्थी' विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न पणजी : मध्यस्थता कायद्याच्या दुर्बळतेचे लक्षण नाही, तर तो

रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात बदल; आधार लिंक अनिवार्य

सणासुदीच्या काळात दलालांच्या गैरप्रकारांना आळा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची कन्फर्म तिकिटे मिळवणे म्हणजे जणू

गिग वर्करचा बुधवारी देशव्यापी संप

ऑनलाइन डिलिव्हरी सेवांवर परिणाम होण्याची शक्यता नवी दिल्ली : नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी केलेल्या

नीट-जेईईत फसवणुकीला आळा बसणार

२०२६ पासून ‘चेहरेपट्टीची ओळख’ बंधनकारक नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक महत्त्वाच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश