तुम्ही BSNL वापरता का? तर हे जरूर वाचा

मुंबई: भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलने(BSNL) आपल्या स्वस्त प्लानमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. याचा सरळ परिणाम त्यांच्या लाखो युजर्सवर पडणार आहे. खरंतर, या कंपनीने आपल्या ९९ रूपयांच्या प्लानची व्हॅलिडीटी कमी केली आहे. यामुळे जे युजर्स हा प्लान वापरत होते त्यांना आता हा प्लान आधीपेक्षा महाग पडणार आहे.



बीएसएनएलने महाग केला प्लान


दरम्यान, युजर्सला आता बीएसएनएलच्या या प्लानसाठी ९९ रूपयेच खर्च करावे लागतील मात्र त्याची व्हॅलिडिटी आधीपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे आता या प्लानसाठी आधीच्या तुलनेत जास्त पैसे खर्च करावे लागतील. बीएसएनएलच्या ९९ रूपयांच्या प्लानमध्ये आधी १८ दिवसांची व्हॅलिडिटी दिली जात होती. मात्र आता युजर्सला केवळ १७ दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. बीएसएनएलने या प्लानच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही मात्र व्हॅलिडिटी कमी करून या प्लानच्या डेली कॉस्टमध्ये वाढ केली आहे.


बीएसएनएलच्या युजर्सला या प्लानसाठी रोजचा खर्च ५.५० रूपये होत होता. आता त्यांचा हा खर्च ५.८२ रूपये इतका झाला आहे. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मइते. या प्लानमध्ये युजर्सला कोणतेही डेटाचे फायदे अथवा इतर फायदे मिळत नाहीत.


हा प्लान त्या लोकांसाठी आहे ज्यांना इंटरनेट डेटाची नव्हे तर केवळ कॉलिंगसाठी रिचार्ज प्लान हवा आहे. अशातच या युजर्सना आता हा बीएसएनएलचा प्लान महाग पडणार आहे.


काही दिवसांपूर्वी एअरटेलनेही आपल्या दोन रिचार्ज प्लानच्या किंमतीत वाढ केली आहे. एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की टेलिकॉम कंपन्यांना इंडस्ट्रीमध्ये टिकून राहायचे असेल तर रिचार्ज प्लानच्या किंमतीत वाढ करावीच लागेल.

Comments

V A Adake    March 16, 2024 01:13 PM

Very true.zero network always.the only govt.institution is working for नाम के वास्ते, ------------------most lover of BSNL.

Shreyas Sunil Khirid    March 15, 2024 11:51 AM

भारत सरकार बीएसएनएल च्या कर्मचाऱ्यांवर फुकट पैसे खर्च करत आहे. नेटवर्क प्रॉब्लेम, recharge, कस्टमर केअर ही बॅक office कर्मचारी सगळे आळशी आहे.

Add Comment

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,

माजी सैनिक आणि भूमिहीनांच्या जमिनी वर्ग १ होणार, महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा

मुंबई : राज्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना महाराष्ट्र शेत जमीन (सीलिंग) अधिनियमांतर्गत वाटप

प्रवासी आरक्षण सेवा इतके तास बंद राहणार

मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) दिनांक १२.०३.२०२६ रोजी २३.४५ वाजल्यापासून दिनांक १३.०३.२०२६ रोजी

एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! महामंडळात १७,७४२ पदांची होणार जंगी भरती

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी)