Mumbai Metro : मेट्रो प्रवाशांसाठी खुशखबर, आता एकाच तिकीटावर कुठेही फिरा!

  139

मुंबई : मुंबईत मेट्रो (Mumbai Metro) सुरु झाल्यापासून प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. मात्र, मुंबईकरांना मेट्रोच्या वेगवेगळ्या मार्गीकांचे तिकीट काढण्यासाठी रांगेत थांबावे लागते. परंतु आता मेट्रोच्या सर्व मार्गांचे एक तिकीट मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.


सध्या मुंबईत मेट्रो १ सह मेट्रो २ अ व मेट्रो ७ (गुंदवली ते अंधेरी पश्चिम मार्गे दहिसर) या मेट्रो मार्गिका सुरू झाल्या आहेत. यापैकी मेट्रो २ अ व मेट्रो ७ या मार्गिका एमएमआरडीएकडे असल्याने त्या मार्गाचे संयुक्त तिकीट (Metro Ticket) काढता येते. परंतू मेट्रो १ मार्गिकेसाठी वेगळे तिकीट काढावे लागत होते. आता मात्र सर्व मार्गांचे एकच तिकीट मिळणार आहे.


मेट्रो १, मेट्रो २ अ व मेट्रो ७ या मार्गिका गुंदवली व अंधेरी पश्चिम या स्थानकाजवळ संलग्न होतात. मात्र तसे असतानादेखील मेट्रो १ चे तिकीट स्वतंत्र काढावे लागत होते. कारण, मेट्रो १ ही राज्य सरकारच्या ताब्यात होती. आता ही मार्गिका एमएमआरडीएकडे आल्यानंतर घाटकोपर-वर्सोवा (Ghatkopar-Versova Metro) व गुंदवली ते अंधेरी पश्चिम या तिन्ही मार्गिकांवरील स्थानकांचे एकत्रित तिकीट प्रवाशांना काढता येईल. ही मार्गिका खरेदी करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

Comments
Add Comment

प्रसिद्ध उद्योगपती काव्या मारन करणार लग्न

मुंबई : सनरायझर्स हैदराबादची मालकीण आणि प्रसिद्ध उद्योगपती काव्या मारन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती चर्चा

Video : कोस्टल रोडच्या बोगद्यात कार उलटली

मुंबई : कोस्टल रोडच्या बोगद्यात जोरदार पावसामुळे एक कार घसरून रस्त्याच्या मधोमध उलटल्याची घटना शुक्रवारी

मुंबईकरांनो रविवारी रेल्वे प्रवास करण्याआधी हे वाचा

मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहार आणि पनवेल ते

पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांवर २०० कॅमेरे ठेवणार नजर

मुंबई : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी राज्यातून सुमारे सहा लाख वारकरी सहभागी होण्याची शक्यता

मुंबई मेट्रो क्रमांक ९ मार्गिकेच्या कामाला वेग

दहिसर ते मीरा-भाईंदर मार्गाचे काम प्रगतिपथावर मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए)

कांदा धोरण ठरविण्यासाठी १९ सदस्यीय समितीची स्थापना

मुंबई : महाराष्ट्राने देशात सर्वाधिक कांदा उत्पादन देत असतानाही राज्यातील शेतकऱ्यांना अस्थिर बाजारभाव,