Rohit Sharma: रोहित शर्मा या दिवशी म्हणणार क्रिकेटला अलविदा, रिटायरमेंटबाबत केला हा खुलासा

मुंबई: भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी सलामीवीरांपैकी एक रोहित शर्माने(rohit sharma) आपल्या रिटायरमेंटबाबत उत्तर दिले आहे. खरंतर, धरमशाला येथे टीम इंडियाच्या विजयानंतर रोहित शर्माच्या रिटायरमेंटबाबत चर्चा सुरू आहेत. काही क्रिकेट पंडित असा दावा करत होते की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायननंतर भारताचा कर्णधार कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेईल. दरम्यान, यातच हिटमॅनने स्वत: आपल्या रिटायरमेंटबाबतचा खुलासा केला आहे.


भारताचा कर्णधार रोहित शर्माने म्हटले की यावेळेस तो आयुष्यातील सर्वोत्कृष्ट खेळ करत आहे. अशातच निवृत्ती घेण्याचा कोणताही विचार नाही. त्याने स्पष्टपणे म्हटले की ज्या दिवशी मला वाटेल की मी चांगला खेळत नाही आहे तो लगेचच निवृ्त्ती जाहीर करेल.


रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका ४-१ अशी जिंकली. शेवटच्या धरमशाला कसोटीत भारताने इंग्लंडला एक डाव आणि ६४ धावांनी हरवले. रोहित सामन्यानंतर म्हणाला, एक दिवस जेव्हा मी सकाळी उठेन आणि मला वाटले की मी आता चांगला खेळू शकत नाही मी लगेचच निवृत्त होईल. मात्र गेल्या काही वर्षांपासून मी माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळत आहे.


रोहितने २०१९नंतर कसोटी क्रिकेटमध्ये ९ शतके लगावली आहे. बीसीसीआयने दुजोरा दिला की रोहित या वर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचे नेतृत्व करेल.

Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या