Rohit Sharma: रोहित शर्मा या दिवशी म्हणणार क्रिकेटला अलविदा, रिटायरमेंटबाबत केला हा खुलासा

  97

मुंबई: भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी सलामीवीरांपैकी एक रोहित शर्माने(rohit sharma) आपल्या रिटायरमेंटबाबत उत्तर दिले आहे. खरंतर, धरमशाला येथे टीम इंडियाच्या विजयानंतर रोहित शर्माच्या रिटायरमेंटबाबत चर्चा सुरू आहेत. काही क्रिकेट पंडित असा दावा करत होते की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायननंतर भारताचा कर्णधार कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेईल. दरम्यान, यातच हिटमॅनने स्वत: आपल्या रिटायरमेंटबाबतचा खुलासा केला आहे.


भारताचा कर्णधार रोहित शर्माने म्हटले की यावेळेस तो आयुष्यातील सर्वोत्कृष्ट खेळ करत आहे. अशातच निवृत्ती घेण्याचा कोणताही विचार नाही. त्याने स्पष्टपणे म्हटले की ज्या दिवशी मला वाटेल की मी चांगला खेळत नाही आहे तो लगेचच निवृ्त्ती जाहीर करेल.


रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका ४-१ अशी जिंकली. शेवटच्या धरमशाला कसोटीत भारताने इंग्लंडला एक डाव आणि ६४ धावांनी हरवले. रोहित सामन्यानंतर म्हणाला, एक दिवस जेव्हा मी सकाळी उठेन आणि मला वाटले की मी आता चांगला खेळू शकत नाही मी लगेचच निवृत्त होईल. मात्र गेल्या काही वर्षांपासून मी माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळत आहे.


रोहितने २०१९नंतर कसोटी क्रिकेटमध्ये ९ शतके लगावली आहे. बीसीसीआयने दुजोरा दिला की रोहित या वर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचे नेतृत्व करेल.

Comments
Add Comment

'कॅप्टन कूल' या प्रसिद्ध टोपणनावाच्या ट्रेडमार्कसाठी धोनीचा अर्ज

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीने 'कॅप्टन कूल' या नावासाठी ट्रेडमार्क अर्ज दाखल केला आहे. हे नाव चाहते त्याच्या थंड

Ravi Shastri on Shubhaman Gill: शुभमन गिलला ३ वर्षे कर्णधारपदी कायम ठेवा – रवी शास्त्री

लंडन: भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलला पाठिंबा

आयसीसीकडून क्रिकेटच्या ६ नियमांमध्ये बदल

नवी दिल्ली : आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहे . हे नियम कसोटी, एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटसाठी

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या