रायगड जिल्ह्यातील स्मार्ट पोलीस स्टेशनचा आदर्श रत्नागिरी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांनी घ्यावा - पालकमंत्री उदय सामंत

दादर सागरी पोलीस ठाणे नुतन इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन


पेण(देवा पेरवी)- रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन हे स्मार्ट पोलीस स्टेशन झाले असून त्याचा आदर्श रत्नागिरी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांनी घ्यावा असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. पेण तालुक्यातील दादर सागरी पोलीस ठाणे नुतन इमारतीचे भूमिपूजन रायगडचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी व्यासपीठावर पेणचे आमदार रविंद्र पाटील, विशेष पोलीस महानिरिक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी प्रवीण पवार, अधीक्षक अभियंता अनिता परदेशी, उप विभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी, दादर सागरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नागेश कदम यांच्यासह पोलीस अधिकारी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, पोलीस विभाग अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवतांना नेहमी सर्वोत्तम कामगिरी करून आपली प्रतिमा उंचावावी. सागरी सुरक्षा ही अतिशय महत्वाची असून त्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन हे स्मार्ट पोलीस स्टेशन झाले असून त्याचा आदर्श रत्नागिरी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यानीही घ्यावा असेही पालकमंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले.

रायगड जिल्ह्यातील प्रकल्पासाठी भूसंपदान करताना स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल असेही शेवटी उदय सामंत यांनी सांगितले.आमदार रवींद्र पाटील यांनी बोलताना सांगितले की, हमरापूर, दादर,रावे विभाग हा पाहिले अतिसंवेदनशील होता, मात्र जोहे येथे दादर सागरी पोलीस स्टेशन झाल्यानंतर वादविवाद खूप कमी झाले. दादर सागरी पोलीस स्टेशनची नवीन इमारत होत आहे ही खूप महत्वाची बाब असून याचा फायदा महामार्गासह परिसरातील नागरिकांना होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

तर विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन इमारतीसाठी तसेच अत्यावश्यक साधन सामुग्री साठी निधी उपलब्ध होत असल्याचे सांगून सागरी सुरक्षेसाठी रायगड पोलीस दल कटीबद्ध आहे असे ही सांगितले.

मुंबई गोवा महामार्गावर अपघातग्रस्तांचे देवदूत म्हणून कार्य करत असलेले कल्पेश शरद ठाकूर, गोविर्ले महिला पोलीस पाटील वृषाली संजय ठाकूर, भाकरवड पोलीस पाटील संजय विष्णू पाटील, पिंपळगाव पोलीस पाटील अनिल कानेकर, गडब गावचे रोशन पाटील यांचाही विशेष सन्मान पालकमंत्री उदय सामंत व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

Comments
Add Comment

Dhule Crime News : कंपनीवर 'हा' मोठा आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवत म्हणाला...

Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील गिधाडे तापी नदीच्या पुलावरून उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

Tribal Reservation : धर्मांतर केलेल्या आदिवासींच्या सवलती बंद होणार?

- राज्य सरकार ऍक्शन मोडवर; सर्वसमावेशक धोरणासाठी २७ जणांची समिती मुंबई : धर्मांतरानंतरही अनुसूचित जमातीचे

Nanded Suicide : स्टेटस ठेवलं अन् शिक्षकाची दोन मुलांसह आत्महत्या; पोलीस तपास सुरु

नांदेडमध्ये शिक्षकाची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या; व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे खळबळ नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यातून

Jalgaon : छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील उमाळा घाटात भीषण अपघात, दोन ठार, चार गंभीर

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर–जळगाव महामार्गावर (Chhatrapati Sambhajinagar–Jalgaon Highway) भीषण अपघात घडल्याची माहिती समोर

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी