Mahashivratri 2024 : दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी उपवासाच्या दिवशी खा हे पदार्थ

मुंबई: आज संपूर्ण देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जात आहे. या दिवशी अनेकांचा उपवासदेखील असतो. महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुमचाही उपवास असेल तर संपूर्ण दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी काही पदार्थांचा आपल्या डाएटमध्ये जरूर समावेश करा.



साबुदाणा


साबुदाणा उपवासादरम्यान खाल्ला जाणारा पदार्थ आहे. साबुदाणा खिचडी अथवा खीर खाल्ल्याने तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही. तसेच यामुळे तुम्हाला एनर्जीही मिळते. यात कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात जे तुम्हाला दिवसभर सक्रिय ठेवण्यास मदत करतात. मात्र साबुदाणा आणि केळी खाल्ल्याने वजन वाढते. त्यामुळे वेट लॉस करणाऱ्यांनी थोड्या बेतानेच खावे.



मखाणे 


मखाण्याची खीर अथवा रोस्टेड मखाणे हे प्रोटीन आणि फायबरचा चांगला स्त्रोत आहे. यामुळे दीर्घकाळ एनर्जेटिक वाटते.



दही


दह्यामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम असते जे आपल्या बराच वेळ पोट भरल्याचे फील करून देते.



नट्स आणि ड्रायफ्रुट्स


बदाम, अक्रोड काजूसारख्या नट्स आणि ड्रायफ्रुट्समध्ये मोठ्या प्रमाणात एनर्जी असते. यामुळे भूक शांत होते.



फळे


उपवासादरम्यान तुम्ही सफरचंद, पपईसारखी फळे खाल्ली पाहिजेत. यात फायबर मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे बराच वेळ पोट भरलेले राहण्यास मदत होते.

Comments
Add Comment

International Yoga Day 2026 : 'Yoga for Healthy Ageing' या संकल्पनेतून निरोगी आयुष्याचा मंत्र

२१ जून हा दिवस संपूर्ण जगासाठी आरोग्याचा उत्सव म्हणून ओळखला जातो. 'आंतरराष्ट्रीय योग दिन' जवळ येत असताना,

Magic of Science : आता 'मेंढीची लोकर' जोडणार मानवाची तुटलेली हाडे; संशोधनाला मोठे यश

LONDON: स्वेटर किंवा शालीसाठी वापरली जाणारी मेंढीची लोकर आता मानवी शरीराच्या उपचारासाठी वापरली जाणार आहे, हे ऐकून

शहरी जीवनातील वाढता मानसिक तणाव: ८२ टक्के नागरिक विळख्यात; अहवालातून धक्कादायक वास्तव समोर

आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात प्रगतीची शर्यत जिंकण्याच्या नादात माणूस स्वतःच्या आरोग्याकडे

JAMUN : हवामान बदलाचा 'गोड' साक्षीदार: उन्हाळ्याचा निरोप घेताना जांभळाचा मनसोक्त आनंद घ्या!

कडक उन्हाचा तडाखा आता ओसरू लागला असून, पावसाळ्याच्या पहिल्या सरींची चाहूल लागली आहे. ऋतू बदलाच्या या काळात

EAT GOOD : तुम्ही तुमच्या अन्नामुळेच आजारी पडत आहात का? जाणून घ्या सुरक्षित आहाराचे महत्त्व!

अन्न हे केवळ भूक भागवण्याचे साधन नसून ते आपल्या आरोग्याचा मुख्य आधार आहे. निरोगी जीवनासाठी सुरक्षित, पौष्टिक आणि

Thyroid : थायरॉईडच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका ; वेळीच लक्ष द्या !

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत थकवा किंवा वजनातील बदल या गोष्टी सामान्य मानल्या जातात. मात्र अनेकदा ही लक्षणे