PM Narendra Modi: कलम ३७० हटवल्यानंतर आज पहिल्यांदा काश्मीरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) गुरूवारी जम्मू-काश्मीरचा(jammu-kashmir) दौरा करतील. या दौऱ्या दरम्यान ते राज्याला ६४०० कोटी रूपयांच्या विकास परियोजनांची भेट देतील. तसेत १००० तरूणांना नोकरीसाठीचे नियुक्तीपत्रक देतील. पंतप्रधान श्रीनगरच्या बख्शी स्टेडियममध्ये लोकांना संबोधित करतील.


काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. याआधी २०१९मध्ये नरेंद्र मोदी प्रचारासाठी जम्मू-काश्मीरमध्ये आले होते. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे श्रीनगरमध्ये सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आले आहे. भाजपचा दावा आहे की या जनसभेमध्ये २ लाखाहून अधिक लोक सामील होतील.


मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान ७ मार्चला दुपारी १२ वाजता श्रीनगरच्या बख्शी स्टेडियममध्ये पोहोचतील. तेथे ते विकसित भारत विकसित जम्मू-काश्मीर कार्यक्रमात सहभागी होतील. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान जम्मू-काश्मीरमध्ये कृषी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तब्बल ५००० कोटी रूपयांचा कार्यक्रम- समग्र कृषी विकास कार्यक्रम राज्याला समर्पित करतील. अनेक योजनांचा यावेळी शुभारंभ करतील.


याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल १००० व्या सरकारी कर्मचाऱ्यांन नियुक्ती पत्र वितरित करतील तसेच विविध सरकारी योजनांच्या लाभार्थींशी चर्चाही करतील. भारतात पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने चलो इंडिया ग्लोबल डायस्पोरा अभियानाची सुरूवात करतील.

Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच