PM Narendra Modi: कलम ३७० हटवल्यानंतर आज पहिल्यांदा काश्मीरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) गुरूवारी जम्मू-काश्मीरचा(jammu-kashmir) दौरा करतील. या दौऱ्या दरम्यान ते राज्याला ६४०० कोटी रूपयांच्या विकास परियोजनांची भेट देतील. तसेत १००० तरूणांना नोकरीसाठीचे नियुक्तीपत्रक देतील. पंतप्रधान श्रीनगरच्या बख्शी स्टेडियममध्ये लोकांना संबोधित करतील.


काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. याआधी २०१९मध्ये नरेंद्र मोदी प्रचारासाठी जम्मू-काश्मीरमध्ये आले होते. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे श्रीनगरमध्ये सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आले आहे. भाजपचा दावा आहे की या जनसभेमध्ये २ लाखाहून अधिक लोक सामील होतील.


मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान ७ मार्चला दुपारी १२ वाजता श्रीनगरच्या बख्शी स्टेडियममध्ये पोहोचतील. तेथे ते विकसित भारत विकसित जम्मू-काश्मीर कार्यक्रमात सहभागी होतील. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान जम्मू-काश्मीरमध्ये कृषी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तब्बल ५००० कोटी रूपयांचा कार्यक्रम- समग्र कृषी विकास कार्यक्रम राज्याला समर्पित करतील. अनेक योजनांचा यावेळी शुभारंभ करतील.


याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल १००० व्या सरकारी कर्मचाऱ्यांन नियुक्ती पत्र वितरित करतील तसेच विविध सरकारी योजनांच्या लाभार्थींशी चर्चाही करतील. भारतात पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने चलो इंडिया ग्लोबल डायस्पोरा अभियानाची सुरूवात करतील.

Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी