Bhandara News : भंडाऱ्याच्या बळीराम गौशाळेत चारा पाण्याविना ३० जनावरांचा मृत्यू!

निर्दयी अवस्थेत जनावरांना ठेवलं होतं बांधून


भंडारा : भंडाऱ्याच्या (Bhandara news) पवनी येथील बळीराम गौशाळेतून (Baliram cowshed) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चारा पाण्याविना ३० जनावरांचा मृत्यू (Animals dead) झाल्याने खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी गडचिरोलीतील (Gadchiroli) कुरखेडा पोलिसांनी कत्तलखान्यात नेल्या जाणाऱ्या जनावरांना ताब्यात घेऊन धानोरीतील बळीराम गौशाळेत पाठवलं होतं. मात्र, बळीराम गौशाळेत चारा आणि पाण्याची व्यवस्था नसल्याने ३० जनावरे मृत पावली. या प्रकरणी पवनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी गौशाळेच्या एका संचालकाला ताब्यात घेतलं आहे.


गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा पोलिसांनी कत्तलखान्याकडे जाणाऱ्या जनावरांची सुटका करुन भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील धानोरी या गावात असलेल्या बळीराम गौशाळेत त्यांना पाठवलं होतं. मात्र, गौशाळेत जनावरांना ठेवण्यासाठी शेड पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करणे गरजेचे असताना, या गौशाळेकडे स्वतःच्या मालकीचं शेड नव्हतं. त्यामुळे ही सर्व जनावरे निर्दयीपणे उघड्यावर ठेवण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. दरम्यान, यातील ३० जनावरांचा चारा पाण्याविना मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी समोर आली.


विशेष बाब म्हणजे, मागील वर्षी बळीराम गौशाळेच्या अध्यक्षांसह १३ संचालकांवर गौशाळेतील जनावरे विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा या गौशाळेकडून गुन्हा घडला आहे.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात