Bhandara News : भंडाऱ्याच्या बळीराम गौशाळेत चारा पाण्याविना ३० जनावरांचा मृत्यू!

  125

निर्दयी अवस्थेत जनावरांना ठेवलं होतं बांधून


भंडारा : भंडाऱ्याच्या (Bhandara news) पवनी येथील बळीराम गौशाळेतून (Baliram cowshed) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चारा पाण्याविना ३० जनावरांचा मृत्यू (Animals dead) झाल्याने खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी गडचिरोलीतील (Gadchiroli) कुरखेडा पोलिसांनी कत्तलखान्यात नेल्या जाणाऱ्या जनावरांना ताब्यात घेऊन धानोरीतील बळीराम गौशाळेत पाठवलं होतं. मात्र, बळीराम गौशाळेत चारा आणि पाण्याची व्यवस्था नसल्याने ३० जनावरे मृत पावली. या प्रकरणी पवनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी गौशाळेच्या एका संचालकाला ताब्यात घेतलं आहे.


गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा पोलिसांनी कत्तलखान्याकडे जाणाऱ्या जनावरांची सुटका करुन भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील धानोरी या गावात असलेल्या बळीराम गौशाळेत त्यांना पाठवलं होतं. मात्र, गौशाळेत जनावरांना ठेवण्यासाठी शेड पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करणे गरजेचे असताना, या गौशाळेकडे स्वतःच्या मालकीचं शेड नव्हतं. त्यामुळे ही सर्व जनावरे निर्दयीपणे उघड्यावर ठेवण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. दरम्यान, यातील ३० जनावरांचा चारा पाण्याविना मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी समोर आली.


विशेष बाब म्हणजे, मागील वर्षी बळीराम गौशाळेच्या अध्यक्षांसह १३ संचालकांवर गौशाळेतील जनावरे विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा या गौशाळेकडून गुन्हा घडला आहे.

Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची