Amit Shah : शरद पवारांनी महाराष्ट्राला हिशोब द्यावा

जळगाव : शरद पवार पवार हे पंतप्रधान मोदींकडे गेल्या दहा वर्षाचा हिशोब मागत आहेत. पण शरद पवार हे ५० वर्ष केंद्रात मंत्री होते, महाराष्ट्रातील जनता त्यांना सहन करत आहे. त्यांनी ५० राहिले निदान पाच वर्षाचा हिशेब महाराष्ट्राला द्यावा, अशी जोरदार टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी भाजपाने येथे आयोजित केलेल्या युवा संमेलनात बोलताना केली.


भाजपाने नंदुरबार, धुळे, रावेर, जळगाव लोकसभा मतदारसंधातील युवकांसाठी मंगळवारी युवा संवाद संमेलनाचे आयोजन सागरपार्क मैदानावर केले होते. प्रथमच मतदान करणा-या विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या संमेलनास मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली. यात युवतींची उपस्थिती लक्षणीय होती. अमित शहा यांचे सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.


युवकांना मेरे दिलके टुकडे संबोधत त्यांनी भाषणास प्रारंभ केला. २०२४ ची लोकसभा निवडणूक ही भारताला आत्मनिर्भर बनवणारी असल्याचे सांगत ही निवडणूक युवकांची आहे. युवकांच्या भविष्याची असल्याचे सांगितले. युवकांनो तुम्ही प्रथम मतदान करत आहात. लोकतंत्र मजबूत करणा-या पक्षाला मत देण्याचे आवाहन करताना आज घराणेशाही साठी एक आलेले पक्ष देश मजबूत ठेवू शकत नाही हे सांगताना काँग्रेसच्या सोनिया गांधी या राहुलला पंतप्रधान करू पाहत आहेत तर उध्दव ठाकरे हे आदित्यला मुख्यमंत्री आणि शरद पवार हे आपल्या कन्येला मुख्यमंत्री करू पाहतात. ममता बॅनर्जी भाच्याला मुख्यमंत्री करू पाहतात. यात घराणे आहे. प्रत्येकाचा स्वार्थ आहे. तुम्हा युवकांचा विचार आहे कुठे असा सवाल करत तुमच्यासाठी तुम्हाला मोदींना पंतप्रधान करायचे आहे, असे सांगितले.


महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर टीका करताना, तिचा उल्लेख करताना तीनही चाके पंक्चर असलेली रिक्षा असा केला. शरद पवार ५० वर्ष मंत्री होते. त्यांनी महाराष्ट्राला धो धो धुतले तरी जनता सहन करत आहे, असा आरोप करत आहे ते पवार मोदींकडे दहा वर्षाचा हिशोब मागत आहेत. त्यांनी पन्नास राहू दया पण निदान पाच वर्षाचा तरी हिशोब जनतेला दयावा, अशी मागणी अमित शहा यांनी केली. काँग्रेसची कारकिर्द व भाजपाची तुलना करतांना मनमोहनसिंग यांनी सत्ता सोडतांना देशाची अर्थव्यवस्था अकराव्या स्थानावर होती ती आज पाचव्या स्थानार आहे आपल्याला येत्या पाच वर्षात तिस-या स्थानावर आणायची असल्याचे सांगत भाजपाने युवकांसाठी केलेल्या विकास कार्याची माहिती दिली. आगामी काळात भाजप करू इच्छीत असलेले प्रकल्प सांगतांना सोनिया गांधी राहुलला तिस-यांना लाँच करत आहेत . इंडिया आघाडीतल्या पक्षांना आपल्या मुलांची चिंता आहे असे सांगत तुम्हाला काय हवंय, असा सवाल युवकांना करताच मोदी मोदी असा जल्लोष झाला.

Comments
Add Comment

Tragedy at Nagpur Bachelor Party : मैत्री की क्रूरता? पार्टीत अडथळा नको म्हणून बेशुद्ध मित्राला चादरीत गुंडाळून फेकून दिलं; बॅचलर पार्टीचा 'सैतानी' चेहरा समोर

नागपूर : नागपूर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मित्राच्या

आंदेकर कुटुंबिय उतरलं आगामी निवडणुकीच्या रिंगणात! कडक पोलीस बंदोबस्तात केला उमेदवारी अर्ज दाखल

पुणे: यावर्षीच्या गणपतीमध्ये झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर न्यायालयीन

आधी मतांसाठी सोनं वाटलं, पराभवानंतर धमकी देत.... अन त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ

नाशिक : निवडणुकीपूर्वी ‘कुबेर’ बनून मतदारांवर सोन्याची बरसात करणारा उमेदवार, पराभवानंतर मात्र मतदारांच्या

कोरेगाव भीमा विजयी दिनानिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल; कोणते पर्यायी मार्ग वापरावेत?

पुणे: कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला लाखो अनुयायी पुण्यात येत असतात.

Kolhapur Fire : आजऱ्यात पहाटे अग्नितांडव! ७ गाड्यांसह अनेक दुकाने जळून खाक; व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

आजरा : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा शहरात शनिवारी पहाटेच्या सुमारास आगीने भीषण रौद्ररूप धारण केले. या आकस्मिक

राज्य सेवा आयोगाची मेगाभरती! जाणून घ्या, अर्जाची शेवटची तारीख, पात्रता आणि जागा

मुंबई: राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत चर्चा सुरू असुन भरतीच्या