Amit Shah : शरद पवारांनी महाराष्ट्राला हिशोब द्यावा

जळगाव : शरद पवार पवार हे पंतप्रधान मोदींकडे गेल्या दहा वर्षाचा हिशोब मागत आहेत. पण शरद पवार हे ५० वर्ष केंद्रात मंत्री होते, महाराष्ट्रातील जनता त्यांना सहन करत आहे. त्यांनी ५० राहिले निदान पाच वर्षाचा हिशेब महाराष्ट्राला द्यावा, अशी जोरदार टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी भाजपाने येथे आयोजित केलेल्या युवा संमेलनात बोलताना केली.


भाजपाने नंदुरबार, धुळे, रावेर, जळगाव लोकसभा मतदारसंधातील युवकांसाठी मंगळवारी युवा संवाद संमेलनाचे आयोजन सागरपार्क मैदानावर केले होते. प्रथमच मतदान करणा-या विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या संमेलनास मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली. यात युवतींची उपस्थिती लक्षणीय होती. अमित शहा यांचे सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.


युवकांना मेरे दिलके टुकडे संबोधत त्यांनी भाषणास प्रारंभ केला. २०२४ ची लोकसभा निवडणूक ही भारताला आत्मनिर्भर बनवणारी असल्याचे सांगत ही निवडणूक युवकांची आहे. युवकांच्या भविष्याची असल्याचे सांगितले. युवकांनो तुम्ही प्रथम मतदान करत आहात. लोकतंत्र मजबूत करणा-या पक्षाला मत देण्याचे आवाहन करताना आज घराणेशाही साठी एक आलेले पक्ष देश मजबूत ठेवू शकत नाही हे सांगताना काँग्रेसच्या सोनिया गांधी या राहुलला पंतप्रधान करू पाहत आहेत तर उध्दव ठाकरे हे आदित्यला मुख्यमंत्री आणि शरद पवार हे आपल्या कन्येला मुख्यमंत्री करू पाहतात. ममता बॅनर्जी भाच्याला मुख्यमंत्री करू पाहतात. यात घराणे आहे. प्रत्येकाचा स्वार्थ आहे. तुम्हा युवकांचा विचार आहे कुठे असा सवाल करत तुमच्यासाठी तुम्हाला मोदींना पंतप्रधान करायचे आहे, असे सांगितले.


महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर टीका करताना, तिचा उल्लेख करताना तीनही चाके पंक्चर असलेली रिक्षा असा केला. शरद पवार ५० वर्ष मंत्री होते. त्यांनी महाराष्ट्राला धो धो धुतले तरी जनता सहन करत आहे, असा आरोप करत आहे ते पवार मोदींकडे दहा वर्षाचा हिशोब मागत आहेत. त्यांनी पन्नास राहू दया पण निदान पाच वर्षाचा तरी हिशोब जनतेला दयावा, अशी मागणी अमित शहा यांनी केली. काँग्रेसची कारकिर्द व भाजपाची तुलना करतांना मनमोहनसिंग यांनी सत्ता सोडतांना देशाची अर्थव्यवस्था अकराव्या स्थानावर होती ती आज पाचव्या स्थानार आहे आपल्याला येत्या पाच वर्षात तिस-या स्थानावर आणायची असल्याचे सांगत भाजपाने युवकांसाठी केलेल्या विकास कार्याची माहिती दिली. आगामी काळात भाजप करू इच्छीत असलेले प्रकल्प सांगतांना सोनिया गांधी राहुलला तिस-यांना लाँच करत आहेत . इंडिया आघाडीतल्या पक्षांना आपल्या मुलांची चिंता आहे असे सांगत तुम्हाला काय हवंय, असा सवाल युवकांना करताच मोदी मोदी असा जल्लोष झाला.

Comments
Add Comment

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत होणार मुंबई:  स्थानिक स्वराज्य संस्था

आई म्हणाली अभ्यास कर, मुलीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अगदी लहान कारणामुळे एका १८ वर्षीय