Gautam Gambhir : मला राजकीय कर्तव्यापासून मुक्त करा; जेणेकरुन...

गौतम गंभीरची जे. पी. नड्डा यांच्याकडे मागणी


नवी दिल्ली : भारताचे माजी क्रिकेटपटू (Cricketer) आणि भाजपा खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ते पूर्व दिल्लीतील भाजप खासदार असून आता २०२४ ची लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढणार नसल्याची त्यांनी घोषणा केली आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वीच गौतम गंभीर यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. तशी विनंती त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी ट्विटद्वारे कळवले आहे.


गौतम गंभीर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी माननीय पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना विनंती केली आहे की, मला माझ्या राजकीय कर्तव्यातून मुक्त करा जेणेकरून मी माझ्या आगामी क्रिकेट वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करू शकेन. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माननीय गृहमंत्री अमित शाह यांनी मला जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद!, असं म्हणत त्यांनी राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.


गौतम गंभीर यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पूर्व दिल्लीच्या जागेवर दमदार विजय मिळाला होता. तर क्रिकेटमध्ये त्यांनी भारतासाठी ५८ कसोटी, १४७ एकदिवसीय आणि ३७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. गौतम गंभीर २०११ च्या वनडे वर्ल्ड कप विजेत्या टीमचे भाग होते. याशिवाय ते २००७ च्या टी-२० वर्ल्ड चॅम्पियन टीमचेही एक भाग होते. ते सध्या पुन्हा एकदा क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार आहेत.

Comments
Add Comment

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे

नाताळला गालबोट; महाराष्ट्र, केरळ आिण काही राज्यांत तोडफोडीच्या घटना

नवी दिल्ली : देशभरात ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच, छत्तीसगड, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान