अबकी बार ४०० पार हे मिशन यशस्वी होऊ दे!; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे भराडी देवीला साकडे

मसुरे : राजकारणातील यश भराडी देवीच्या आशीर्वादाने मिळाले आहे अशी माझी भावना आहे. राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांची सत्ता आहे. येणाऱ्या लोकसभेमध्ये अबकी बार ४०० पार हे मिशन यशस्वी होऊ दे! असे साकडे केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी आंगणेवाडी येथील भराडी देवीला घातले.


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास आंगणेवाडी येथे आई भराडी देवीचे दर्शन घेतले. यावेळी आंगणे कुटुंबियांच्या वतीने स्वागत कक्षात त्यांचे आनंद आंगणे यांनी स्वागत केले. यावेळी भाविकांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, येणाऱ्या लोकसभेसह राज्यात सुद्धा याच विचारांची सत्ता येऊ दे. देशाला आत्म निर्भर बनवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्या वेळी पुन्हा यश मिळु दे ही प्रार्थना आपण केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा उत्तम आरोग्य लाभून त्यांचा कारभार यशस्वी होऊ दे. लोकसभे संबंधी पक्ष जो निर्णय घेईल तो अंतिम असेल. हा मतदार संघ भाजपचा असल्याने लोकसभेचा उमेदवार भाजपचा असेल. येथील विरोधी खासदार आणि आमदार यांचा पराभव जनताच करणार आहे. तसेच आंगणे कुटुंबीयांनी सुयोग्य नियोजन केल्याने भाविकांना दर्शन सुलभ मिळत आहे. सर्व भक्तांना उत्तम आरोग्य लाभू दे अशी मनोकामना सुद्धा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली.


यावेळी सौ. नीलम राणे, आमदार निरंजन डावखरे, भाजप नेते डॉ. निलेश राणे, आनंद आंगणे, रघुनाथ आंगणे, दीपक आंगणे, दिनेश आंगणे, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, बाबा परब, अशोक सावंत अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी

ग्रामीण भागातील घरबांधणी आता होणार सुलभ; बांधकाम परवानगीचे अधिकार तालुका स्तरावर देण्याचे संकेत!

- मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या घराच्या

Jalna: गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले अन् ११० सिलिंडर चोरले, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना: जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा

Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने

लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे