Samruddhi Mahamarg : समृध्दी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाची तारीख ठरली!

कसा असणार तिसरा टप्पा?


मुंबई : समृध्दी महामार्ग (Samruddhi Mahamarg) हा महाराष्ट्र शासनाचा (Maharashtra Government) एक अत्यंत महत्त्वाकांक्षी अaसा प्रकल्प आहे. या महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाच्या (Inauguration) सर्वजण प्रतिक्षेत होते. अखेर ही प्रतिक्षा संपली आहे. या टप्प्याच्या लोकार्पण सोहळ्याची तारीख ठरली असून ४ मार्चला या त्याचे उद्घाटन होणार आहे.


महाराष्ट्राची राजधानी मुंबई (Mumbai) ते उपराजधानी नागपूर (Nagpur) या दरम्यान हा महामार्ग तयार होत असून आतापर्यंत समृद्धी महामार्गाचा सहाशे किलोमीटरचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. तर तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन ४ मार्च रोजी होणार आहे.

दरम्यान, समृद्धी महामार्गाचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण झालेलं असून आता भरवीर ते इगतपुरी असा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. हा २३ किलोमीटरचा टप्पा आहे. हा टप्पा ४ मार्च पासून वापरात येणार असल्याची माहिती आहे.

समृद्धी महामार्ग हा ७०१ किलोमीटर लांबीचा असून डिसेंबर २०२२ मध्ये त्यातील पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी ५२० किमीचा महामार्ग सुरु करण्यात आला होता. त्यानंतर शिर्डी ते भरवीर पर्यंत हा महामार्ग सुरू करून एकूण ६०० किलोमीटरचा समृद्धी महामार्ग सुरू आहे.
Comments
Add Comment

Ambernath traffic: महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथच्या वाहतुकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्गांबद्दल

अंबरनाथ : महाशिवरात्री उत्सवानिमित्त अंबरनाथमधील प्राचीन अंबरेश्वर शिवमंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर

ISRO Science Trip: अंतराळ संशोधन क्षेत्रात ग्रामीण विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी इस्रो विज्ञान सहल

- विज्ञान प्रेरणा अभियानांतर्गत आश्रमशाळेतील १०० विद्यार्थी सहलीत सहभागी होणार मुंबई : इतर मागास बहुजन कल्याण

NCP Merger: शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून मोठा दावा, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे...

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला असतानाच,

Pune: बांगलादेशच्या झेंड्यावरून फूड स्टॉल्सची तोडफोड; पुण्यातील MIT कॉलेजमध्ये राडा

पुणे: पुण्यातील कोथरुड येथील एमआयटी महाविद्यालयात आयोजित वर्ल्ड कल्चरल फेस्टिवलमध्ये मोठा राडा झाला आहे. फूड

राज्यात हवामानात बदलाचे संकेत; फेब्रुवारीत 'या दिवशी' काही भागांत कोसळणार पावसाच्या सरी

मुंबई : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरडे वातावरण राहिल्यानंतर आता राज्यात हवामानाची घडी बदलताना दिसत आहे.

Nashik MNS Protest: शिक्षकाने मराठी बोलण्यास विरोध केल्याने मनसे कार्यकर्त्यांचा राडा

नाशिक: नाशिकमध्ये मराठीच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे. एका प्रसिद्ध कोचिंग क्लासमध्ये मनसे