Samruddhi Mahamarg : समृध्दी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाची तारीख ठरली!

कसा असणार तिसरा टप्पा?


मुंबई : समृध्दी महामार्ग (Samruddhi Mahamarg) हा महाराष्ट्र शासनाचा (Maharashtra Government) एक अत्यंत महत्त्वाकांक्षी अaसा प्रकल्प आहे. या महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाच्या (Inauguration) सर्वजण प्रतिक्षेत होते. अखेर ही प्रतिक्षा संपली आहे. या टप्प्याच्या लोकार्पण सोहळ्याची तारीख ठरली असून ४ मार्चला या त्याचे उद्घाटन होणार आहे.


महाराष्ट्राची राजधानी मुंबई (Mumbai) ते उपराजधानी नागपूर (Nagpur) या दरम्यान हा महामार्ग तयार होत असून आतापर्यंत समृद्धी महामार्गाचा सहाशे किलोमीटरचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. तर तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन ४ मार्च रोजी होणार आहे.

दरम्यान, समृद्धी महामार्गाचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण झालेलं असून आता भरवीर ते इगतपुरी असा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. हा २३ किलोमीटरचा टप्पा आहे. हा टप्पा ४ मार्च पासून वापरात येणार असल्याची माहिती आहे.

समृद्धी महामार्ग हा ७०१ किलोमीटर लांबीचा असून डिसेंबर २०२२ मध्ये त्यातील पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी ५२० किमीचा महामार्ग सुरु करण्यात आला होता. त्यानंतर शिर्डी ते भरवीर पर्यंत हा महामार्ग सुरू करून एकूण ६०० किलोमीटरचा समृद्धी महामार्ग सुरू आहे.
Comments
Add Comment

Pune Traffic : रस्तेबंदीच्या फलकांमुळे पुणेकर चक्रावले! सायकल स्पर्धेसाठी ९ ते ६ रस्ते बंद की टप्प्याटप्प्याने? पाहा नेमके बदल काय?

पुणे : पुणे शहरात आज, शुक्रवारी (२३ जानेवारी) 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर' या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा चौथा टप्पा

Thane-CSMT : ठाणे ते सीएसएमटी प्रवास सुसाट! १५० कोटींच्या नव्या समांतर पुलामुळे 'शीव'ची कोंडी फुटणार; मार्ग कसा असेल?

मुंबई : मुंबईतील सर्वात गजबजलेल्या आणि वाहतूककोंडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शीव (Sion) परिसरातील प्रवाशांसाठी एक

Special Trains :नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून धावणार विशेष गाड्या

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ आणि २५

पुण्यात डिजिटल अरेस्टची धमकी देत, ज्येष्ठ नागरिकाची कोटींची फसवणूक

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाला कोट्यवधींचा

नाशिक महापौरपदासाठी राजकीय हालचालींना वेग; भाजपमधील तीन प्रभावी चेहरे चर्चेत

नाशिक : महानगरपालिका निवडणुकीनंतर नाशिकच्या सत्तावर्तुळात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. स्पष्ट संख्याबळासह

Amrit Bharat Express Train Routes : मुंबईकरांची चांदी! 'अमृत भारत एक्सप्रेस'ने लांब पल्ल्याचा प्रवास होणार स्वस्त; जाणून घ्या कुठे-कुठे थांबणार गाडी?

मुंबई : भारतीय रेल्वेने सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी सुरू केलेल्या 'अमृत भारत एक्सप्रेस' ताफ्यात आता आणखी ९