झारखंडमध्ये १२ जणांना रेल्वेची धडक, २ जणांचा मृत्यू

जामतारा: झारखंडमधील जामतारामध्ये रेल्वेची धडक बसल्याने २ जणाचा मृत्यू झाला आहे तर बरेच जण जखमी झाले आहेत. जामतारा आणि विद्यासागर या स्टेशनदरम्यान रेल्वेची रूळावरील काही प्रवाशांना धडक बसली. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी २ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले. त्यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, जामतारा अपघाताबद्दल ऐकून दु:ख झाले. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना कायम आहेत. जखमी लोक लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो.


 


जामतारा ते विद्यासागर स्थानकादरम्यान बचाव मोहीम सुरू आहे. या मार्गावरून बंगळुरू-यशवंतपुर एक्सप्पेस डाऊनच्या दिशेने प्रवास करत असताना रूळाच्या बाजूला असलेली माती उडत होती. दरम्यान, प्रवाशांना वाटले की रेल्वेला आग लागली असून धूर निघत आहे. त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी साखळी ओढली. तसेच रेल्वेतून प्रवाशांनी उड्याही मारल्या. याचवेळी बाजूच्या मार्गावरून ईएमयू ट्रेन जात होती. या ट्रेनखाली आल्याने काही प्रवाशांचा यात मृत्यू झाला.


रेल्वेने याबाबतचे निवेदन जाहीर केले. मात्र यात आगीचा कोणताही उल्लेख करण्यात आला नाही. प्रवाशांनी अलार्म चेन खेचल्याने रेल्वे नंबर १२२५४ थांबवण्यात आली होती. यानंतर प्रवासी रेल्वेतून उतरले आणि दुसऱ्या रूळावर आले. मात्र त्याच वेळी दुसऱ्या रूळावरून जाणाऱ्या रेल्वे या प्रवाशांना धडक दिली.

Comments
Add Comment

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

प्रदूषणाच्या विळख्यात जीवनवाहिन्या?

४६ % नद्यांसोबतच गंगा-यमुनाही दूषित नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांची जीवनवाहिनी आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या

भारत-पाक सीमेवर 'प्रचंड' हेलिकॉप्टरमध्ये सह-वैमानिक म्हणून राष्ट्रपती मुर्मू यांनी रचला इतिहास

जयपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी राजस्थान मधील जैसलमेर येथे स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर

RTO Rules Upadate : चालकांसाठी आरटीओचे 'हे' नवीन नियम; नितीन गडकरी यांची घोषणा

नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. गाड्यांच्या धडकेत निष्पाप नागरिक प्राण गमावत

Amit Shah : सीमांचलमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

सीमांचल भागातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम सुरू केली जाईल, असे विधान करत केंद्रीय

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर