मध्य प्रदेशात भीषण रस्ते अपघात, पिकअप वाहन पलटल्याने १४ जणांचा मृत्यू

डिंडोरी : मध्य प्रदेशच्या डिंडोरी येथून मोठी बातमी समोर येत आहे. येथे बिछिया-बूडझर गावात एक भीषण अपघात झाला आहे. या परिसरात पिकअप व्हॅनचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे.


अपघातात मृत्यूमुखी पडलेले हे लोक एका कार्यक्रमात सामील झाल्यानंतर परतत होते. या अपघातात जखमी झालेल्या लोकांवर शाहपुरा सामूहिक आरोग्य केंद्रावर उपचार सुरू आहेत. यातील काही जणांची स्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही.


मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात बिछिया चौकाजवळ झाला. या अपघातात १४ जण मृत्यूमुखी पडले. यात ९ पुरूष आणि ५ महिलांचा समावेश आहे. तर २१ जण जखमी झाले.


मृतांमध्ये मदनसिंह (४५ वर्ष, निवासी अम्हाइ देवरी), पीतम ( १६ वर्ष निवासी पोंडी माल), पुन्नू लाल ( ५५ वर्ष, अम्हाइ देवरी), महदी बाई ( ३५ वर्ष सजानिया जिला उमरिया), सेम बाई (४० वर्ष अम्हाइ देवरी), लालसिंह ( ५५ वर्ष अम्हाइ देवरी), मुलिया (६० वर्ष अम्हाइ देवरी), तितरी बाई (५० वर्ष निवासी धमनी जिला उमरिया), सावित्री (५५ वर्ष पोंडी जिला उमरिया), सरजू ( ४५ वर्ष अम्हाइ देवरी), सम्हर ( ५५ वर्ष पोंडी), महासिंह ( ७२ वर्ष पोंडी), लालसिंह ( २७ वर्ष पोंडी) किरपाल ( ४५ वर्ष अम्हाइ देवरी) यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव