मध्य प्रदेशात भीषण रस्ते अपघात, पिकअप वाहन पलटल्याने १४ जणांचा मृत्यू

डिंडोरी : मध्य प्रदेशच्या डिंडोरी येथून मोठी बातमी समोर येत आहे. येथे बिछिया-बूडझर गावात एक भीषण अपघात झाला आहे. या परिसरात पिकअप व्हॅनचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे.


अपघातात मृत्यूमुखी पडलेले हे लोक एका कार्यक्रमात सामील झाल्यानंतर परतत होते. या अपघातात जखमी झालेल्या लोकांवर शाहपुरा सामूहिक आरोग्य केंद्रावर उपचार सुरू आहेत. यातील काही जणांची स्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही.


मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात बिछिया चौकाजवळ झाला. या अपघातात १४ जण मृत्यूमुखी पडले. यात ९ पुरूष आणि ५ महिलांचा समावेश आहे. तर २१ जण जखमी झाले.


मृतांमध्ये मदनसिंह (४५ वर्ष, निवासी अम्हाइ देवरी), पीतम ( १६ वर्ष निवासी पोंडी माल), पुन्नू लाल ( ५५ वर्ष, अम्हाइ देवरी), महदी बाई ( ३५ वर्ष सजानिया जिला उमरिया), सेम बाई (४० वर्ष अम्हाइ देवरी), लालसिंह ( ५५ वर्ष अम्हाइ देवरी), मुलिया (६० वर्ष अम्हाइ देवरी), तितरी बाई (५० वर्ष निवासी धमनी जिला उमरिया), सावित्री (५५ वर्ष पोंडी जिला उमरिया), सरजू ( ४५ वर्ष अम्हाइ देवरी), सम्हर ( ५५ वर्ष पोंडी), महासिंह ( ७२ वर्ष पोंडी), लालसिंह ( २७ वर्ष पोंडी) किरपाल ( ४५ वर्ष अम्हाइ देवरी) यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे