मध्य प्रदेशात भीषण रस्ते अपघात, पिकअप वाहन पलटल्याने १४ जणांचा मृत्यू

डिंडोरी : मध्य प्रदेशच्या डिंडोरी येथून मोठी बातमी समोर येत आहे. येथे बिछिया-बूडझर गावात एक भीषण अपघात झाला आहे. या परिसरात पिकअप व्हॅनचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे.


अपघातात मृत्यूमुखी पडलेले हे लोक एका कार्यक्रमात सामील झाल्यानंतर परतत होते. या अपघातात जखमी झालेल्या लोकांवर शाहपुरा सामूहिक आरोग्य केंद्रावर उपचार सुरू आहेत. यातील काही जणांची स्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही.


मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात बिछिया चौकाजवळ झाला. या अपघातात १४ जण मृत्यूमुखी पडले. यात ९ पुरूष आणि ५ महिलांचा समावेश आहे. तर २१ जण जखमी झाले.


मृतांमध्ये मदनसिंह (४५ वर्ष, निवासी अम्हाइ देवरी), पीतम ( १६ वर्ष निवासी पोंडी माल), पुन्नू लाल ( ५५ वर्ष, अम्हाइ देवरी), महदी बाई ( ३५ वर्ष सजानिया जिला उमरिया), सेम बाई (४० वर्ष अम्हाइ देवरी), लालसिंह ( ५५ वर्ष अम्हाइ देवरी), मुलिया (६० वर्ष अम्हाइ देवरी), तितरी बाई (५० वर्ष निवासी धमनी जिला उमरिया), सावित्री (५५ वर्ष पोंडी जिला उमरिया), सरजू ( ४५ वर्ष अम्हाइ देवरी), सम्हर ( ५५ वर्ष पोंडी), महासिंह ( ७२ वर्ष पोंडी), लालसिंह ( २७ वर्ष पोंडी) किरपाल ( ४५ वर्ष अम्हाइ देवरी) यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच