Rohit Pawar : रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु!

राधाकृष्ण विखेपाटील यांचं वक्तव्य; काय आहे प्रकरण?


अहमदनगर : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे काही दिवसांपूर्वी म्हटले होते. यानंतर आज अहमदनगरमध्ये (Ahmednagar) माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती दिली. त्यामुळे आगामी काळात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तोंडावर रोहित पवार यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत.


कोणतेही पुरावे नसताना तलाठी भरती प्रक्रियेबाबत भ्रष्टाचार झाला असल्याची टीका रोहित पवार यांनी केली होती. याच प्रकरणी गुन्हा दाखल करणार असल्याचं राधाकृष्ण विखेपाटील यांनी स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले की, "तुम्ही एखादं बेताल वक्तव्य करता, मात्र जाहीरपणे त्याचे पुरावे मांडा. तुम्ही कोणाचे नातेवाईक आहे म्हणून तुम्हाला काहीही बोलण्याचं लायसन्स मिळालेलं नाही. पूर्वी आजोबा विधान करायचे आता नातवाने परंपरा पुढे नेण्याचे ठरवले आहे. आम्ही महसूल विभागामार्फत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु केलेली आहे. त्यामुळे पुरावे द्या अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जा", असा इशारा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.



राजेंद्र पवारांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर...


मला शरद पवारांनी राजकारणात येऊ दिलं नाही म्हणून अजित पवारांचा मार्ग सुकर झाला असं वक्तव्य राजेंद्र पवारांनी केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं. याबाबत बोलतांना राधाकृष्ण विखेपाटलांनी म्हटलं की, "मी त्यांचं विधान ऐकलं नाही. मात्र, रोहित पवारांना तो सूचक इशारा असला पाहिजे की, फार धावपळ करू नको, जशी अजित दादांची फसवणूक झाली तशी तुझी देखील फसगत झाल्याशिवाय राहणार नाही. हेच त्यांना त्यांच्या वक्तव्यातून सूचित करायचे असेल असे मला वाटते, असं विखेपाटलांनी म्हटलं आहे.

Comments
Add Comment

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई

शेतकऱ्यांसाठी मंत्री महाजनांचा मोठा निर्णय, सुपूर्द केला वर्षभराचा ‘पगार’

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी मंत्री गिरीश महाजन यांनी

अमरावती महानगरपालिकेला ई-बस डेपो-व चार्जींग सुविधेसाठी बडनेरा येथील जमीन

अमरावती : अमरावती महापालिकेला केंद्र शासन पुरस्कृत पी.एम.ई बस योजनेतून मिळालेल्या ई-बस डेपो व चार्जींग

दिवाळीच्या सुट्टीत फिरण्याचे नियोजन करताय ? 'या' चार जागांना नक्की भेट द्या

मुंबई : पावसाळ्यातली हिरवळ अनुभवल्यानंतर आता गुलाबी थंडीची चाहुल सर्वांना लागली आहे. त्यामुळे छान थंड हवेच्या

अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडून तब्बल ३१,६२८ कोटींची मदत; २५३ तालुक्यांना सरसकट मदत देणार

'खरडून गेलेल्या जमिनीला' मिळणार हेक्टरी ३.४७ लाखांची मदत; शेतकरी, घरे आणि जनावरांसाठी भरीव निधी मुंबई: