Rohit Pawar : रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु!

राधाकृष्ण विखेपाटील यांचं वक्तव्य; काय आहे प्रकरण?


अहमदनगर : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे काही दिवसांपूर्वी म्हटले होते. यानंतर आज अहमदनगरमध्ये (Ahmednagar) माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती दिली. त्यामुळे आगामी काळात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तोंडावर रोहित पवार यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत.


कोणतेही पुरावे नसताना तलाठी भरती प्रक्रियेबाबत भ्रष्टाचार झाला असल्याची टीका रोहित पवार यांनी केली होती. याच प्रकरणी गुन्हा दाखल करणार असल्याचं राधाकृष्ण विखेपाटील यांनी स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले की, "तुम्ही एखादं बेताल वक्तव्य करता, मात्र जाहीरपणे त्याचे पुरावे मांडा. तुम्ही कोणाचे नातेवाईक आहे म्हणून तुम्हाला काहीही बोलण्याचं लायसन्स मिळालेलं नाही. पूर्वी आजोबा विधान करायचे आता नातवाने परंपरा पुढे नेण्याचे ठरवले आहे. आम्ही महसूल विभागामार्फत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु केलेली आहे. त्यामुळे पुरावे द्या अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जा", असा इशारा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.



राजेंद्र पवारांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर...


मला शरद पवारांनी राजकारणात येऊ दिलं नाही म्हणून अजित पवारांचा मार्ग सुकर झाला असं वक्तव्य राजेंद्र पवारांनी केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं. याबाबत बोलतांना राधाकृष्ण विखेपाटलांनी म्हटलं की, "मी त्यांचं विधान ऐकलं नाही. मात्र, रोहित पवारांना तो सूचक इशारा असला पाहिजे की, फार धावपळ करू नको, जशी अजित दादांची फसवणूक झाली तशी तुझी देखील फसगत झाल्याशिवाय राहणार नाही. हेच त्यांना त्यांच्या वक्तव्यातून सूचित करायचे असेल असे मला वाटते, असं विखेपाटलांनी म्हटलं आहे.

Comments
Add Comment

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला